पाच - सहा महिन्यांनी तिला एक स्थळ आलं लग्नासाठी . तिची मानसिक तयारी नसली तरी घरच्यांच्या विरोधात जाणे जमणार नव्हतेच तिला . छानशी साडी नेसून आली ती त्या मुलासमोर . अगदी समोरासमोर बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती . गुलाबी रंगाची साडी , हातात दोन कंगन ,कपाळावर छोटुसी टिकली .
अगदी सिम्पल आणि सोबर तयारी केलेली होती तिने . राजीव, तिला पाहताक्षणीच हिच्याशीच लग्न करायचं असं ठरवलं त्याने . राजीवने तिला काही प्रश्न विचारले त्यानंतर तिलाही प्रश्न विचारायची संधी देण्यात आली .
तिचा एकच प्रश्न होता . घरच्यांनी तिला आधी बजावून ठेवल असल तरी तिला ते राजीव ला विचारायचं होतच .
ती-मला लग्नानंतरही शिकायची आवड आहे . मला इंजिनीरिंग पूर्ण करायची आहे .
राजीव - ऑफकोर्स .. माझा विरोध नाही राहणार . तुला हवं तेवढं शिकू शकतेस तू .
अभय ची इच्छा होती कि तिने इंजिनीरिंग पूर्ण करायला पाहिजे .तिला अजून अभय ची आठवण झाली . या पाच -सहा महिन्यात अभयने एकदाही तिला फोन केला नव्हता . त्यादिवसापासून त्यांच्यात बोलणं झालंच नाही .
--------------------------------------------------------------
सुदैवाने अभय त्यादिवशी वाचला होता . पण या गोष्टीचा त्याच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता . ज्या दिवशी आपण तिच्याशी साखरपुडा करणार होतो त्याच दिवशी हे असं संकट यावं !!!!
म्हणजे नक्कीच तिच्यामध्ये काहीतरी खोट असेल आणि म्हणूनच कि काय त्यानेसुद्धा तिला नाकारलं होत . तिने सांगितल्याप्रमाणे "तो" हि तिच्या प्रेमात होता हे कळत होत, पण त्याला समोर जायचं नव्हतं .
तिच्याशी लग्न करायचं नव्हतं त्याला . कदाचित त्याच्यासोबत हि असच काहीस घडलं तर नसेल ना .
अभय च्या मनात नको नको ते विचार यायला लागले होते आणि इकडे त्याच्या घरी हि बातमी कळल्यावर अभयच्या घरच्यांनी जाऊन तिच्या घरी सरळ नकार कळविला होता .
या सगळ्या गोष्टीनंतर तिच्यामध्ये अभय ला समजवायची हिम्मत उरली नव्हती . आधीही तिच्यासोबत त्याने relation
तोडलं होत तेव्हा तिने त्याला समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, पण सगळं व्यर्थ झालं होत .
म्हणून तिने आता नियतीवर सोडलं होत सगळं .
अभयने त्या अपघातानंतर दोन महिन्यात दुसऱ्या मुलीशी लग्न केलं होत . अभय आणि तिच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या होत्या पण क्षणोक्षणी तिला अभयची आठवण येत होती .
खूप विचार करूनही ती स्वतःला सावरू शकत नव्हती .
या मधल्या काळामध्ये तिने त्याच्याशी साधा संपर्क हि केला नव्हता . पण राजीव च स्थळ येऊन गेल्यावर तिने त्याला एकदा फोन केला होता .
"तो , तिच्या टीनएज पासून आतापर्यंत मनातल्या एका कोपऱ्यात असलेला तो ". अभयमुळे ती त्याला काही काळासाठी विसरली जरी होती तरी त्याची जागा कधी अभय सुद्धा घेऊ शकला नव्हताच .
तिने फ़ोन केल्यावर त्याने आश्चर्यानेच फोन उचलला होता.
हाय , मी बोलते .
तो - तुला नाव सांगायची गरज नाही , मी ओळखू शकतो तुझा आवाज .
ती- माझा लग्न जमलं आहे . तुला सांगावस वाटलं म्हणून फोन केला .
तो - अभिनंदन !
ती-मला लग्नाच्या आधी एकदा भेटशील का ?
तो - हो , का नाही . सांग कधी भेटू आपण ? तू खुश आहेस ना . म्हणजे एवढ्या लवकर लग्न करत आहे म्हणून म्हटलं .
ती - हो मी खुश आहे . आणि नसली तरी आता काही उपयोग नाही . येत्या एका महिन्यात माझा लग्न आहे .
राजीव एका चांगल्या कंपनीत engineer आहे . घरच्यांना खूप आवडलं हे स्थळ .
म्हणून मी नाही म्हणायचं काही भाग च नव्हता .
एवढं बोलून तिने फोन ठेवला .
दोन-तीन दिवसावर तिचा लग्न आलं होत . त्याला सुट्या असल्यामुळे तो हि गावाकडेच होता .
दोघांचं भेटायचं ठरलं आणि ठिकाणही ठरलं . यावेळेस ती एकटी भेटायला जाणार नव्हती . तिची जिवलग मैत्रीण तिच्या सोबत होती . त्याला येऊन बराच वेळ झाला होता , त्या दोघी आल्या .
हि कोण ?
माझी मैत्रीण , याआधीही सांगितली आहे मी तुला हिच्याबद्दल पण लक्षात नसेल तुझ्या .
ती ओळख सांगताच पटकन त्याच्या ध्यानात आलं .
हो , आता ओळखलो मी . पण कधी भेट झाली नव्हती ना म्हणून थोडा वेळ लागला ओळखायला .
तिची मैत्रीण आणि तो समोरासमोर पहिल्यांदाच एकमेकांना भेटत होते . तिच्या मैत्रिणीला दुसरं काम असल्यामुळे ती तिथून लवकरच गेली . आता हे दोघेच कॅफे मध्ये होते . आजूबाजूचे होते पण दोघांनाही त्याच भान नव्हतंच .
का एवढ्या लवकर लग्न करत आहे तू . त्याने शांतता भंग करत म्हटलं .
ती -एवढ्या लवकर म्हणजे ?
तो-काही नाही . सहजच बोललो .
ती- लग्नाला येशील ना माझ्या ? ती बोलत होती . सगळं काही व्यवस्थित आहे असं दाखवत होती पण आतून ती खूप उदास होती .
हे त्याच्या डोळ्यातून सुटणार नव्हतंच .
तिला दिलासा देण्यासाठी तो "हो येईल ना लग्नाला तुझ्या "
असं म्हणत होता .
हि आपली शेवटची भेट असेल , यानंतर कधी आपण भेटू कि नाही माहित नाही .
पण मला खूप बरं वाटत आहे तुला भेटून . ती आपल्या मनातलं बोलून दाखवत होती .
तुला एक विचारायचं होत .
तो- विचार ना
ती- मी तुझ्यासाठी थांबायला पाहिजे होती का ?
तो- आता या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग . लग्न जुळायच्या आधी विचारली असतीस तर कदाचित मी तुला "हो" थांब म्हटलं असत .
पण जी गोष्ट आपल्या हातात नाही त्या गोष्टीचा विचार करून काय उपयोग आता .
तो बोलण्याच्या , वागण्याच्या बाबतीत खूप प्रोफेशनल होता हे तिला माहित होत .
पण तिला तो "हो थांबायला पाहिजे" असं हा कधी बोलेल असं वाटलं नव्हतं .
त्याच बोलणं थांबवत ती त्याला विचारत होती , खरचं मी थांबली असती तर तू माझ्याशी लग्नाला होकार देणार होतास . मग असं होत तर आधीच का नाही आपलं relation टिकवलास .
तो- आधीचे ध्येय काही वेगळे होते माझे , आयुष्यात काहीतरी करायचं होत . त्यावेळेस मला असं वाटत होत कि माझं प्रेम माझ्या ध्येयाच्या आड येणार आणि तेच मला नको होत .
आड येणार असं कस म्हणू शकतोस रे तू , मी तुला चांगली नोकरी मिळावी यासाठी रोज प्रार्थना करत होती .
जाऊ दे आता या सगळ्या गोष्टी खरच निरर्थक आहेत . ती रडवलेल्या सुरात बोलत होती .
आता निघायला हवं मला , तू येणार ना नक्की लग्नाला माझ्या तिने अजून एकदा त्याला विचारलं .
हो येईल म्हणून त्याने तिला आश्वासन दिल . बसस्टॉप पर्यंत तिला तो त्याच्या बाईक ने सोडला . एकदा शेवटचं म्हणून दोघांनीही हातात हात मिळवलं .
तिचा हात त्याने घट्ट पकडला आणि तिलाही त्याने आपला हात सोडावा असे वाटले नाही .
हि भेट शेवटची असली तरी खूप काही देऊन गेली होती तिला . एक मात्र सल होती आपण याची रिप्लेसमेंट म्हणून अभय ला हो म्हटलं होत ती आपली चूक होती कि .......
To Be Continue
या 'तो' ला काही नाव नाहीये?
या 'तो' ला काही नाव नाहीये?
अभय वीज पडुन वाचला? भारीच कि
अभय वीज पडुन वाचला? भारीच कि..
पण अभयने तिला का सगळ्याचा दोष द्यावा हे कळाले नाही..असो.
पुभाप्र!
पण अभयने तिला का सगळ्याचा दोष
पण अभयने तिला का सगळ्याचा दोष द्यावा हे कळाले नाही>>काही लोकांची प्रवूत्ती असते अशी ,आपल्या सोबत जरा काही वाईट घडलं कि त्याची खापर लगेच दुसऱ्यांच्या डोक्यावर फुटते .
या 'तो' ला काही नाव नाहीये?>>
या 'तो' ला काही नाव नाहीये?>> सध्यातरी या "तो " ला नाव द्यावं असं वाटलं नाही , जशी "ती " तिलापण काही नाव दिलेलं नाही आहे .
वाचकांना अडचण होत असेल तर पुढच्या भागात "तो " ला नाव देता येईल .
बाकी तुमच्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद shraddha.
अडचण नाही काही. मला वाटलं
अडचण नाही काही. मला वाटलं नावं आलं असेल त्याचं आधी मी मिस केलं.
छान आहे कथा नियमित भाग टाकत राहा.
छान आहे कथा नियमित भाग टाकत
छान आहे कथा नियमित भाग टाकत राहा. >>हो नक्कीच