Submitted by Rahul Boga on 21 April, 2019 - 06:22
खरं तर प्रेमातल्या काही गोष्टी वेगळेच असतात....
त्यात बरेचसे असतील पण ..
माझं.
दिवसाची सुरुवात होताच
दिवस मात्र कसा बसा निघून जातो,
रात्रीचा काळोख होताच
तुझ्या आठवणींचा प्रहार सुरू होतो,
आठवणीं सोबत मन रमत जातं
अन काळ वेळेचा भान हि नसतो,
आठवणी मात्र खुप नाजूक व तिक्ष्ण असतात
त्या जपता जपता काही मात्र हृदयाला टोचतात,
हृदयात होणाऱ्या वेदना मात्र
डोळ्यातील अश्रू सांगतो
त्या वेळी प्रतेक क्षणी ऐकू येतो
हृदयातल्या ठोक्यांचे अन् आशृंच्या लाटांचेच आवाज,
चमचयणाऱ्या चांदण्याच्या काळोख्यात रात्र सावरतो
मग पुन्हा,
दिवसाची सुरुवात होताच
दिवस मात्र कसा बसा निघून जातो................!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा