Submitted by शिवाजी उमाजी on 12 December, 2018 - 12:12
परिवर्तन
देवळात रोज देवाला
अभिषेक दुधाचा होतो,
बाहेर भुकेने आडोश्याला
आक्रोश बालकाचा होतो !
कबरीवर आम्ही चादरींच्या
रोजच घडया मोडतो,
उघडयावर बाहेर तेंव्हा
थंडीत कुणी कुडकुडतो !
मेणबत्ती क्रुसा समोर
लावून नतमस्तक होतो,
उजळवून श्रद्धा क्षेत्र
झोडीत अंधार उरतो !
आक्रोश, थंडी, अंधार
जळूनी दूरवर जावो,
जाणुनी दुख: दुसऱ्याचे
परिवर्तन मनाचे होवो !
©शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/preranadai-kavita/t15740/msg50941/#msg50941
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हां ये सही है!!!!
हां ये सही है!!!!
परिवर्तन मनातून होणे गरजेचे आहे.
आशा अमर आहे... व्हावं असं...
आशा अमर आहे... व्हावं असं... धन्यवाद
अप्रतिम.....सुंदर
अप्रतिम.....सुंदर
धन्यवाद अशोकजी...
धन्यवाद अशोकजी...