स्त्रीजीवन आणि भातलावणी

Submitted by manasibhide on 30 July, 2018 - 09:07

भरल्या आभाळाचा , रिमझिम पावसाचा
शेतकऱ्याच्या कष्टाचा , काळ भातलावणीचा.

मायाळू लाल माती , पावसाने सुखावते
जणू आईच्या मायेने , तान्ह बियाणं जपते .
रोपे वाढीस लागती वाऱ्यासंगे ती डोलती
त्यांच्या कांतीची झळाळी जणू पाचू ओशाळती.

साद येई नव्या मातीची ,स्वप्ने आभाळी जाण्याची
जणू ठाऊक साऱ्यांना ,आली वेळ निरोपाची.
होई शिंपण कष्टाची , अन् कृपा देवाजीची
वेळ सुगीच्या सुखाची, जणू दृष्ट काढण्याची .

असे नाळ जुळलेली बाईसंगे या भाताची
बिया माहेरी रुजती, रोपे सासरी नांदती.
नाते दोघांचे जपण्या, रीत ओटी भरण्याची
म्हणून बाईच्या कुशीत, आहे ओटी तांदळाची .

मानसी भिडे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults