आनंद ओंजळी

Submitted by वेडा फकीर on 21 June, 2018 - 10:43

गंधावाचून आहे फुल,इथे कोणाला रुचले का ?
अन्न आहे नाही चव,इथे कोणाला पचले का ?

प्रीत त्यांनी खरी जळवली,देह गिळून खचले का ?
बऱ्याच झाल्या भूलथापा,अजुनही त्यांना सुचते का ?

पाऊस माझा सखा सोयरा,आता तोही सुकला का ?
नभात दाटुनी येते वीज,अश्रू सोबतीस बसला का ?

नको नको हे तुमचे लालच,असे म्हणुनी फसलात का ?
नकारघंटा ऐकू आली,आयुष्यावर रुसलात का ?

अरे किती रे करशील हाल जिवाचे,आनंद ओंजळी रुतला का ?
तूच म्हणाला हेच सुख ते,मग असा पळत तू सुटला का ?
©कवी - वेडा फकीर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults