Submitted by Vaibhav Kulkarni on 25 April, 2018 - 05:26
स्वातंत्र्याच्या व्यासपीठावर
राजा शिवाजी ची नीती ,
पररत्री मातेसमान ,
राज्य राबवावी रयतेसाठी,
हा आदर्श जपावा म्हणतो !
स्वातंत्र्याच्या व्यासपीठावर
लो. टिळकांचा गणेशॊत्सव
एकात्मता , समतेची भावना
ठेवून, राष्ट्रधुरा आपल्या
खांदयावर वाहवि म्हणतो
स्वातंत्र्याच्या व्यासपीठावर
म. गांधीजी चे दोन शस्त्र
सत्य व अहिंसा पुन्हा ,
एकदा अवलंबून भ्रष्ट्राचार
मुक्त भारत करावा म्हणतो.
स्वातंत्र्याच्या व्यासपीठावर
शिवछत्रपती , लो . टिळक, गांधीजी
सगळयां चे वीरमरण आठवून ,
आदर्श भारत घडवावा म्हणतो.
वैभव गोविंद कुलकर्णी
जालना.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
@Vaibhav Kulkarni, छान!
@Vaibhav Kulkarni, छान!
मस्तच
मस्तच