राजकारण

Submitted by नितीनचंद्र on 29 July, 2016 - 22:49

युतीचे शासन आले म्हणजे
"नाथ" नेहमीच चर्चेत असतात
विरोधक सुध्दा मिडीया आडुन
बाण नेमका वर्मी मारतात

मागे "बरखा" एकदा
नेमके असे झाले.
कामा पेक्षा हेच प्रकरण
लोक चघळत राहिले

घ्यायचाय त्यांनी घ्यावा
यातुन एक धडा
कारभार करताना शत्रू नको
मित्रही चार जोडा

Group content visibility: 
Public - accessible to all site users