Submitted by पल्ली on 15 July, 2016 - 03:55
हायकु
मरणानंतर जे जळते
ते निव्वळ सरण
इथे चटके नाहीत
रंग लाल गालावर
श्वास श्वास तालावर
कुठला ऋतु आला वर?
बोलावंसं वाटुनही
शब्द जुळत नाहीत,
नुसतं घुटमळणं अर्थापाशी...
कुणीच् ऐकत नसलं
तरी आपण बोलत रहावं,
मौनाच्या कोलाहलात
खोल तळं पाणी निळं
हिरवी झाडी गार सावली
फार गर्दी झाली
जुनाट शहर घामट चेहरे
तापलेली घरं आणि वारे
दिलासा एवढाच की अजुन गारवा आहे....
भरलेलं ओलं आभाळ
बरसणार बहुतेक
खिड़क्या कुणी बंद केल्या?
प्रत्येक चेहऱ्यात
एक सौंदर्य दडलेलं
काही तरी घडलेलं...
-पल्लवी देशपांडे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा