'फॅण्ड्री' च्या शेवटी जब्या आणि त्याचं पूर्ण कुटुंब डुक्कराच्या मागे लागलेले दाखवले आहेत. त्यांची आणि डुक्कराची ती धडपड, पळापळ बराच वेळ चालते. पळून पळून जब्याचा बाप इतका दमतो की त्याच्या अक्षरश: छातीचा भाता होतो. ही सगळी पळापळ हळूहळू करत जब्याच्या शाळेभोवतीच्या परिसरात येते. मग जब्या त्याचे सवंगडी आणि 'ती'च्यापासून स्वत:चं तोंड लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नात १-२ वेळा पकडता येऊ शकणारं डुक्कर निसटतं. बाप खूप शिव्या घालतो. अखेरीस जब्या परिस्थितीला शरण जातो आणि आपलं हे अस्तित्व स्वीकारतो. त्याची लव्ह स्टोरी त्याच्या कधीही न वाचल्या जाऊ शकणाऱ्या एका कागदोपत्री फुटकळ इतिहासात जमा होते आणि त्या लव्ह स्टोरीचा पूर्णविराम म्हणून तो एक दगड थेट आपल्याकडे - कॅमेऱ्याच्या दिशेने - फेकतो. कहाणी संपते. बराच वेळ चाललेला डुक्कर पकडण्याचा प्रसंग ठळकपणे लक्षात राहतो. लक्षात राहते जब्याची केविलवाणी धडपड आणि त्याच्याहीपेक्षा केविलवाणा त्याचा बाप. 'फॅण्ड्री' मधला हा शेवटचा प्रसंग चालतो बराच वेळ, पण तरी तो लांबलेला वाटत नाही. किंबहुना 'फॅण्ड्री' एकूणच ची लांबी हे त्याचं एक बलस्थानच होतं. जेमतेम शंभर मिनिटं - साधारण पावणे दोन तास फक्त - चालते ती कहाणी.
'फॅण्ड्री' चं अजून एक बलस्थान होतं 'नाविन्य'. ती एक अशी कहाणी होती, जी कुणी कधी ह्यापूर्वी सांगितली नव्हती. कुणाला ते कदाचित पेलणारंच नव्हतं. 'हे दाखवून काय मिळणार आहे', असाच विचार त्यामागे असावा, कारण ती कहाणी कुणाला माहित नव्हती किंवा कुणी पाहिलेली नव्हती, असं तर नक्कीच नव्हतं. नागराज मंजुळेंनी ते आव्हान पेललं. मी असं म्हणणार नाही की, 'त्यांनी तो धोका पत्करला.' त्यांना त्यात धोका वगैरे वाटायचा प्रश्नच नव्हता. कारण काही कमवण्यासाठी ती कलाकृती नव्हतीच, त्यामुळे काही गमवण्याचा किंवा न कमवण्याचा धोकाच उद्भवत नाही.
'फॅण्ड्री'मध्ये मला काय आवडलं असं मला कुणी विचारलं, तर उत्तर सोपं आहे. 'उत्कटता.' आणि ही जी उत्कटता 'फॅण्ड्री'त आहे, ती माझ्या मते तरी वरील दोन कारणांमुळे आहे.
'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो.
तब्बल तीन तासांची लांबी, 'सैराट'ला खऱ्या अर्थाने पसरट करते. सुरुवातीच्या कमीत कमी एक तासाच्या चित्रपटाला जर पूर्णपणे कापून टाकलं असतं, तर काय झालं असतं, असा एक विचार मनात येतो. हा एक तास - सव्वा तासाचा सिनेमा चक्क रवी जाधवांनी केलेला वाटतो. ह्या तास - सव्वा तासात मिसरूड फुटलेली पोरं टवाळक्या करतात. समवयस्क मुलींवर लाईन मारतात. ह्या तास - सव्वा तासात किती तरी वेळा नायक-नायिका एकमेकांशी फुल्ल फिल्मी नजरानजर करतात. म्हणजे बाजूनी जाता जाता नजरा भिडवणे वगैरे..! लव्ह लेटर्स दिली जातात आणि टाका भिडतो.
मग अजय-अतुलच्या ट्रेडमार्क स्टाईलच्या बुंगाट गाण्यावर पब्लिक झिंगाट नाचतं आणि त्यानंतर खरा सिनेमा सुरु होतो.
इथून पुढचा सिनेमा क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' आहे. QSQT मध्ये खानदानी दुष्मनी असते, इथे जातीय भेद. QSQT मध्ये नायिकेकडच्या एका कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी प्रेम प्रकरण उघडकीला येतं, इथेही तसंच. QSQT मध्ये दोघे जण पळून जातात आणि एका तात्पुरत्या घरात आश्रय घेतात, तेव्हा समजतं, नायिकेला तर चहासुद्धा करता येत नाही, इथेही तसंच. मग जसं 'साथिया'मध्ये नायक-नायिकेत अहंकार आड येऊन दुरावा निर्माण होतो, तसा इथेही काही मिनिटांसाठी होतं. कहाणी अपेक्षित वळणांनी अपेक्षित शेवटापर्यंत जाते. ह्या सगळ्या प्रवासात छोटे-छोटे फिल्मी योगायोगही बरेच जुळून आलेले आहेत. पळून जाण्यासाठी किनाऱ्यावर एक unattended मोटारबोट तयारच असणं, (पहिल्या वेळेस) भरपूर चोप मिळालेला असतानाही कुठे जखमा नसणं, (दुसऱ्या वेळेस) गुरासारखा मार खाऊनही किरकोळ जखमांसह पळ काढू शकणं, ज्या रस्त्याने गाडी जाणार आहे, त्याच्या बाजूलाच पोरांना बदडणं की अगदी लगेच दिसून यावं, वगैरे.
'सैराट'च्या संगीताचीही एक हवा आहे. 'अजय-अतुल' ने धूम मचवली असली, तरी सगळ्याच गाण्यांवर त्यांच्याच कुठल्या न कुठल्या गाण्याची (नेहमीप्रमाणे) छाप दिसतेच. 'झिंगाट' गाण्यावर बेभान होऊन नाचणारं अख्खं सिनेमागृह मी पाहून आलो आहे. अनेक दिवसांनंतर अशी जादू कुणी केली आहे. ह्या 'X-factor' बद्दल तर वादच नाही. गाण्यांचं संयोजनही केवळ अफलातून झालं आहे. 'हॉलीवूड'मध्ये संगीत संयोजन केलं गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. भरमसाट वाद्यांचा मेळ कसा असतो, हे समजून घेण्यासाठी भन्साळीने इकडे शिकवणी लावावी म्हणतो ! कुठेही कर्णकर्कश्य न होताही सांगीतिक भव्यता कशी असते, हे 'सैराट'ची गाणी दाखवतात. खास करून 'सैराट झालं' आणि 'याड लागलं' मधला वाद्यमेळ तर ऐकावाच.
'ऑनर किलिंग' ही उत्तर भारताच्या बऱ्याच भागांतली एक भीषण समस्या आहे. गुन्हेगारी जगतातल्या सत्यघटनांवर आधारित एका कार्यक्रमात अशीच एक कहाणी मागे पाहिली होती. 'सैराट'चं कथानक त्या सत्यघटनेवर बेतलेलं आहे. कहाणीतली सगळी वळणं आधीच कळून येतात. शेवटही माहितच असतो, पण अचूक नेम साधून शेवटाचा दगड थेट भिरकावण्याचं नागराज मंजुळेंचं कौशल्य व्यावसायिकतेचा कीडा चावल्यावरही अबाधित आहे. हा शेवट पायाखालची जमीन, डोक्यावरचं छप्पर, बुडाखालची खुर्ची सगळं बाजूला करतो. पोटातली आतडी पिळवटतो आणि डोक्यातला मेंदू बधीर करतो. डोळे थिजतात, हात-पाय गारठतात आणि ओठांना कंप सुटतो. केवळ ह्या शेवटासाठी दिग्दर्शक मंजुळे हवे होते, बाकीच्या पसाऱ्यासाठी कुणीही, अगदी कुणीही चाललं असतं.
समजा, हा चित्रपट 'फॅण्ड्री' वाल्याचा नसता, दुसऱ्या कुणाचा असता तर ?
तर हा एक महान चित्रपट असता. कितीही काहीही म्हणा, कुणी केलंय ह्यावर त्याचं मूल्यमापन ठरतंच ठरतं. जो मुलगा अभ्यासूच आहे, तो जर पहिल्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकावर आला तर ते जास्त धक्कादायक असतं आणि काठावर पास होणारं एखादं दिवटं टपकलं, तरी विशेष काही घडलेलं नसतंच ! मंजुळेंचा दुसरा क्रमांक आला आहे, हे धक्कादायक आहे.
तीन तासांपैकी फक्त पाच मिनिटं मंजुळे दिसतात, एरव्ही दिसत नाहीत ही चित्रपटाची दुसरी शोकांतिका आहे. 'नागराज कमर्शियल मंजुळे' मला तरी पाहायचा नव्हता, इथून पुढेही पाहायचा नाहीय. त्यासाठी त्यांना किशोरवयीन प्रेम ह्या आजच्या मराठी चित्रपटाच्या जिव्हाळ्याच्या विषयापासून जरा वेगळं व्हावं लागेल. कारण आत्तापर्यंतच्या त्यांच्या दोन्ही चित्रपटांत हा समान धागा आहे.
नवीन चेहरे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू आश्वासक आहेत. नायिकेच्या भूमिकेसाठी एखादा चिकना चेहरा न निवडता रफ अॅण्ड टफ रिंकू निवडणं हा मास्टरस्ट्रोक होता. आकाश ठोसरसुद्धा एकदम मातीतला वाटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची निरागसता आहे. दोघेही फ्रेश असल्यामुळे कुठेही ते व्यक्तिरेखेच्या पुढ्यात येत नाहीत. नायकाच्या मित्रांच्या भूमिकेतल्या दोघांची नावं नीट कळू शकली नाहीत. (क्षमस्व) सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार आणि तानाजी गालगुंडे ह्यांपैकी दोघे असावेत आणि उरलेला नायिकेचा भाऊ ! दोघा मित्रांची कामंही जबरदस्त झाली आहेत. खासकरून लंगड्या प्रदीपचं काम खूपच मस्त !
'सैराट' एकदा पाहण्यासारखा आहे. पण नागराज मंजुळेंचा चित्रपट म्हणून पाहिल्यास अपेक्षाभंग हमखास आहे. काही वेळेस संवेदनशील मनाला व्यावसायिकतेचीही एक दुसरी बाजू असते, हे एक नव्याने शिकता येऊ शकेल.
रेटिंग - * * १/२
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/04/movie-review-sairat.html
तुम्ही तर फारच विचार करता,
तुम्ही तर फारच विचार करता, चैत्रगंधा ! शेवट सुन्न करून गेला ना ? मग झालं तर ! सिनेमा चांगलाच आहे. आधी कितीही फापटपसारा असू द्या, ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल !
मलाही ते खटकलं होत आणि मुख्य
मलाही ते खटकलं होत आणि मुख्य वस्तीत दिवसा ढवळ्या दार उघडे टाकून असा प्रकार होतो तेव्हा शेजारी कुणाला कळत नाही? आरडा ओरडा तर नक्कीच केला असणार ना?
शेवट अजिबात पटला नाही. आशुचँप
शेवट अजिबात पटला नाही. आशुचँप म्हणतात तसं दिवसाढवळ्या असा प्रकार होतो आणि कुणालाच काही कळत नाही. असो. ते दिग्दर्शकाला दाखवायचे नसेल.
पण लहान मुलाची रिअॅक्शन....
यापुढे जाउन ह्या चित्रपटातुन मंजुळेंना नेमके काय म्हनायचे आहे? असे प्रकार महाराष्ट्रात त्यामानाने कमी आहेत, ते वाढावे? ऑनर किलिंगला ग्लॅमर देण्याचा नेमका हेतु काय? का अवार्ड वगैरे करिता केलय हे.
त्यापेक्षा ऑनर किलिंग कसं टाळता आलं असतं ह्यावर विचार केला असता, तर ..... अधिक बरं झालं असतं. मुळातच वाईट प्रवॄत्ती लौकर पसरते, ती पुन्हा चित्रपटातुन दाखवण्यात काय मतलब.
बाकी शिवाजी महाराजाचा फोटो लावणारे, त्यांचे आदर्श घेतातच असे नाही, हे दिद्गर्शकाला दाखवयाचे असेल.
यापुढे जाउन ह्या चित्रपटातुन
यापुढे जाउन ह्या चित्रपटातुन मंजुळेंना नेमके काय म्हनायचे आहे? असे प्रकार महाराष्ट्रात त्यामानाने कमी आहेत, ते वाढावे? ऑनर किलिंगला ग्लॅमर देण्याचा नेमका हेतु काय? का अवार्ड वगैरे करिता केलय हे.>> असहमत.
महाराष्ट्रात तुलनेने कमी होत असेल, पण म्हणून ऑनर किलिंगचे भयाण वास्तव आपल्या आजूबाजूलाही आहे, हे नजरेआड करता येत नाही. मंजुळेंनी शेवटच्या दृश्यात त्याचे उदात्तीकरण नव्हे, तर अशा बिनबुडाच्या अन खोट्या अहंकारापायी होणार्या हत्यांचे फोलपण दाखवले आहे.
केवळ प्रतिष्ठेच्या अनाग्रहापायी एका चिमुकल्याचे आयुष्य उध्वस्त होते , हे पाहून अशा प्रकारची कृत्याबद्दल झालीच तर घृणाच निर्माण होईल. यात कोणीही सरळ बुद्धीचा माणूस उदात्तीकरण शोधणार नाही.
हृदय हेलावणार्या त्या दृश्यामुळे एखाद-दुसर्या दुजाभाव जपणाऱ्या मनास पाझर फुटला, अन आपल्याच मुलांवर आपण विनाकारण किती अन्याय करतो, याची जाणीव झाली तरी त्या दृश्याचे सार्थक होईल. कदाचित हाच उद्देश मंजुळेंनी ठेवला असावा.
बाकी शिवाजी महाराजांच्या तसबिरीबद्दल सहमत. परक्या स्त्रियांचा सुद्धा ज्यांनी योग्य तो सन्मान ठेवला, त्यांच्या अनुयायांना घरच्या स्त्रीबद्दल जराही आदर नसावा, यापेक्षा मोठा विरोधाभास कुठला?
>>मुळातच वाईट प्रवॄत्ती लौकर
>>मुळातच वाईट प्रवॄत्ती लौकर पसरते, ती पुन्हा चित्रपटातुन दाखवण्यात काय मतलब.
श्श्श्श्शू SSS हे असल भलत सलत बोलू नका. कारण हे कळण्याच्या पलिकडे गेले आहेत बहुसंख्य लोक.
आणि काही लोक कळण्याच्या वयात
आणि काही लोक कळण्याच्या वयात पण आलेले नाहीत. त्यांच्या भाबड्या मनाला धक्का लागतो असे काही बघून
प्रतिसाद संपादीत
प्रतिसाद संपादीत
बापरे, आता हा एक नवीन चैनल.
बापरे, आता हा एक नवीन चैनल.
कुठून असे थोर थोर विचार येतात मनात. उद्या आता त्यांनी आठ लग्ने केली म्हणजे ते पुरुषसत्ताक पद्धतीचे समर्थक होते असेही येईल.
साष्टांग दंडवत
अशक्य विनोदी लोक असतात राव
अशक्य विनोदी लोक असतात राव एकेक !!
स्पॉइलर ============== ======
स्पॉइलर
==============
==============
==============
==============
==============
==============
चित्रपट पाहिला नाही.पण इथल्या सर्व पोस्ट वाचून शेवट पाहिला.चार पाच माणसे असतील तर बेसावध असलेल्या दोन माणसांना आरडा ओरडा व्हायच्या आत मारु शकतात.ती दोघे आधी 'आता सगळं सुरळीत झालं' म्हणून आनंदी दाखवली आहेत.दिग्दर्शकाचा मूळ हेतू ज्या कोल्ड ब्लडेड प्रकारे दोघांच्या घरात येऊन भेटी वगैरे देऊन चहापाणी पिऊन थंडपणे दोघांना मारुन जाणे हे दाखवण्याचा आहे तो यशस्वी होतो.डोक्याला मुंग्या येतात.पोर आईबाबांना हलवताना दाखवायला आधी हवं होतं हे पटलं. पण कधीकधी लहान मुलांना आपण समजतो त्यापेक्षा लवकर परिस्थितीचं आकलन होतं.तसंच इतका लहान मुलगा 'आता तुझा तू घरात जा' म्हणून बाईने लांबून सोडलेला पटला नाही.
इतकी लहान मुलं आई बापांना प्रत्यक्ष हँड ओव्हर केली जातात किंवा उचलून घरात तरी ठेवली जातात.
एकंदर 'टिनेज रोमान्स' पेक्षा लोकांनी यातून 'सर्व जागाविरुद्ध जाण्यात जीवाचा धोका असेल तर अशी गुंतवणूक टाळा' हा संदेश घेतला तर बरं.
संपादित.
संपादित.
आता खरी चर्चा सुरू झाली.
आता खरी चर्चा सुरू झाली. चित्रपटाचे हे यश खरे
सैराट -इफेक्ट पहा घ्या
सैराट -इफेक्ट पहा घ्या आदर्श... पळून गेलेल्या जोडप्यास बोलावून घेऊन लग्न लाऊन दिले...!!
आष्टी : (10 मे, मंगळवार) आष्टी तालुक्यातील 'आष्टा' या गावातील एक जोडपे (मुलगी मराठा- मुलगा मातंग) सुमारे सहा महिन्यांपूर्वी प्रेम संबंधातून गावातून पळून जाऊन पुणे येथे स्थाईक होते.. सैराट पाहिल्यानंतर मुलीच्या भावाने गावातील ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा शोध घेऊन त्यांना बोलावून घेऊन (09 मे रोजी) रीतसर लग्न लाऊन दिल्याची घटना घडली आहे.. पंचक्रोशीतून या घटनेचे कौतुक होताना दिसत आहे..
त्यासोबत त्याच गावातील आणखी एक जोडपे (माळी-मुस्लिम) मुंबईला गेले आहे, त्यांना बोलावून घेण्याचे प्रयत्न मध्यस्थांकरवी चालू असल्याचे समजते...
Post by.. Harshal Jadhav
सैराट_इफेक्ट
https://www.facebook.com/nilesh.kalaskar2/posts/1076517249089238?pnref=s...
सैराट पाहील्याने कुसंस्कार
सैराट पाहील्याने कुसंस्कार होतील असे न पाहता सांगता येणा-या महामानवांसाठी खूषखबर
या शुक्रवारी खास या युगपुरुषांसाठी सनी लहाने यांचा वन नाईट स्टँड हा सिनेमा रिलीज होत आहे. लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
चैत्रगंधा तुम्ही
चैत्रगंधा
तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्या वेळेला तसं वाटलं होतं. पण हल्लीच्या लहान मुलांची समज जास्त असते असं वाटतं. खरं तर त्या एव्हड्याशा त्रुटीकडे दुर्लक्षही करता येईल, हलवून पाहीलं असतं इतकंच त्या सीन मधे अॅड करायचं होतं.. बाकी ठीकच आहे ना ?
तुमच्या या कमेण्टमुळे इतरत्र सिनेमा न पाहून त्याने कुसंस्कार होतो असं म्हणणा-या दोन आयडींनी नागराज मंजुळेने अनेकांना शेंडी लावलेली आहे. बरं झालं पाहीला नाही. हजारो मूर्खांनी बरोबर आहे असं म्हटलं म्हणून चूक बरोबर होत नाही अशा अर्थाचं एक विदेशी वचन सुद्धा चिकटवलंय.
(हा तुमचा दोष नाही, फक्त अनुभव शेअर केला).
सैराट न पाहताच लोक पिसाळलेत
सैराट न पाहताच लोक पिसाळलेत हेच चित्रपटाचे यश
हो ते मुलाच्या रिअॅक्शनबद्दल
हो ते मुलाच्या रिअॅक्शनबद्दल मलाही असं वाटलं की ते जवळ का जात नाही आईबाबांच्या? पण मुलं कधीकधी खूप सेन्सिटिव्ह असतात. ती असं वागू शकतात. तितका बेनिफिट ऑफ डाऊट दयायला हरकत नाही.
रक्त नक्कीच कळतं. शिवाय आई
रक्त नक्कीच कळतं. शिवाय आई बाबा नेहमीसारखे झोपलेले नाहीत आणि रक्त सांडलंय यामुळे मूल घाबरून रडू शकतं.. आई बाबा दिसले नाहीत तरी मूल रडतं की !
सगळं खरं पण हे सगळं दोन किंवा
सगळं खरं पण हे सगळं दोन किंवा अडीच वर्षाच्या मुलाकडून कॅमेरा समोर करून कसं घेणार ?
आणि तो त्याचे खरे आई वडील नसलेल्या नट नटी कडे जाऊन हे सगळं कसं करेल ?
अतरंगी... करेक्ट !!
अतरंगी... करेक्ट !!
एकंदर मंजूळेंमुळे पितरांच्या
एकंदर मंजूळेंमुळे पितरांच्या कर्तृत्वावर स्वतःला मोठे समजणार्या वर्गाचा अहम् जबरदस्त दुखावला जातोय.
वास्तववादी सिनेमा..
आमच्या कोकणात जात-पात कोणी फारसे मानत नाहीत, पण महाराष्ट्रातच काही ठिकाणी असले प्रकार खुप चालतात.
एकंदर मंजूळेंमुळे पितरांच्या
एकंदर मंजूळेंमुळे पितरांच्या कर्तृत्वावर स्वतःला मोठे समजणार्या वर्गाचा अहम् जबरदस्त दुखावला जातोय.
वास्तववादी सिनेमा..
आमच्या कोकणात जात-पात कोणी फारसे मानत नाहीत, पण महाराष्ट्रातच काही ठिकाणी असले प्रकार खुप चालतात.
मिललआमच्या कोकणात जात-पात
मिललआमच्या कोकणात जात-पात कोणी फारसे मानत नाहीत, पण महाराष्ट्रातच काही ठिकाणी असले प्रकार खुप चालतात.
ककै च्या कै! कोकणात पण आहे हे सर्व
वेळ मिळतताच लिहिन
कोंकण महाराष्ट्रात आहे का?
कोंकण महाराष्ट्रात आहे का?
स्वतंत्र कोकण झालाच पाहिजे.
स्वतंत्र कोकण झालाच पाहिजे.
मायबोली पण स्वतंत्र झालीच
मायबोली पण स्वतंत्र झालीच पाहीजे!
लहान मुलाने अमुकतमुकच वागले
लहान मुलाने अमुकतमुकच वागले पाहिजे असा तर्क अनाकलनीय आहे.
ईतरांची मुले कशी खातात, खेळतात, मस्ती करतात, छान छान कविता बोलतात, चित्र काढतात. पण माझाच मुलगा असा का नाही अशी जी तुलना पालकांकडून होते ते याचमुळे.. एवरी चाईल्ड इज डिफरंट हे समजून घ्या रे..
कोकण काय भारताबाहेर आहे का
कोकण काय भारताबाहेर आहे का ?
जातपात फारशी मानत नाहीत, तरी पण थोडीशी का होईना मानतातच ना ?
मागे कोकणात कसे सवर्ण लोकांच्या विहिरीवर बाकी लोकांना कसे पाणी भरू दिले जात नाही याचा किस्सा माबो वर लिहिला होता.
भारतात असे शहर किंवा गाव नाही जिथे लोक जात मानत नाहीत. आपल्या सर्वांच्या डोक्यात जात पक्की बसलेली आहे.
गावात सर्वानी जातीच्या रेषा मान्य केल्या आहेत, त्या तोडण्याचे परिणाम माहित असतात. त्यामुळे न बोलता सीमारेषा पाळल्या जातात. पण याचा अर्थ असा होत नाही कि लोकं जातपात मानत नाहीत.
आमच्या ऑफिसमधील एका बाईने
आमच्या ऑफिसमधील एका बाईने म्हटले होते की मी हा सिनेमा पहाणार नाही,कारण त्याचा शेवट वाईट असल्यामुळे
पुढचे ८ दिवस ती झोपू शकणार नाही.पण रविवारी सिनेमा पाहून आली.कसा वाटला विचारल्यावर म्हणाली चांगला आहे.नवीन पिढीला शिकण्यासारखे आहे यातून,प्रेम केले तर कसे रहावे लागते.त्यामुळे हा धोका पत्करू नये. आर्चीला कशी आपल्या घरातील सुखसोयींची आठवण येत होती.
हे सगळे ऐकून कपाळाला हात लावणेच शक्य होते.
देवकी, तो पण अँगल आहेच की
देवकी, तो पण अँगल आहेच की सिनेमाला.
कथेचा गाभा honour killing असला तरी प्रेमात वाटते तितके आयुष्य गुलाबी नसते हेपण दाखवतोच की सिनेमा. कथेच्या सोयीसाठी परश्या आर्चीवर परत हात उगारत नाही. पण त्याने तसं केलं असत तर आर्चीची ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली असती. शिक्षण नाही. जोडीदार धड नाही. घरच्यांचा सपोर्ट नाही. दुर्दैवाने अशी अर्ची रिअल लाईफ मध्ये जवळून बघितली आहे. हेच परशाला पण लागू होते.
थोडक्यात, honour killing वाईट, भयंकरच. त्याला माफी नाहीच. पण पहिले शिक्षण पूर्ण करा आणि स्वत:च्या पायावर उभं रहा.
Pages