Submitted by भाग्यश्री परांजपे on 25 January, 2016 - 07:46
कितीही वाटले तुला, कितीही वाटले त्याला
तरी कशाला उगाच चिंता...
समांतर रेषा अगदी जवळ असूनही छेदत नाहीच कधी,
तर कसा होईल गुंता?
करुया करार सोबतीचा....
समान अंतरावर राहून अनंतापर्यंतच्या प्रवासाचा
नको तो शाप एका बिंदूत छेदून,
पुढे विरुद्ध दिशांना वळण्याचा...
अपेक्षांच्या दडपणाखाली दबलेली नाती....
सांभाळता सांभाळता होते किती आयुष्यांची माती...
मनातच राहूदे निस्वार्थ, निर्मोही प्रीती....
असता असे, ना आनंदास क्षिती
भुलली सीता, हरला रावण...
जरी रामाराज्यात होती लक्ष्मणरेषा,
कलियुग असले तरी एक खात्री बाळग..
अगदी भूमितीत देखिल नाही छेदत दोन सामांतर रेषा !!
- भाग्यश्री
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानै! <<<मनातच राहूदे
छानै!
<<<मनातच राहूदे निस्वार्थ, निर्मोही प्रीती....
असता असे, ना आनंदास क्षिती>>>
माफ करा,पण कविता इथेच थांबली असती तरी सांगायचं ते सांगून गेली असती,असं वाटलं!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.