फुसके बार – ०८ जानेवारी २०१६

Submitted by Rajesh Kulkarni on 7 January, 2016 - 14:12

फुसके बार – ०८ जानेवारी २०१६

१) पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलने एका पेशंटला त्या हॉस्पिटलमधूनच औषधे विकत घेण्याची सक्ती केल्याचे प्रकरण पेशंटच्या नातेवाईकांनी उघड केले. हॉस्पिटलमध्ये सुमारे लाखभरात मिळणारी औषधे बाहेरच्या फार्मसीमध्ये अर्ध्या किंमतीमध्ये मिळत होती. पेशंटच्या नातेवाईकांनी तसे करतो असे म्हटल्यावर डॉक्टरांनी बाहेरची औषधे चालणार नाहीत, कारण ती चांगली नसतात असे सांगितले. त्यावर या नातेवाईकांसह अनेकांनी आरडाओरडा केल्यावर मात्र बाहेरून आणलेली औषधे स्विकारली गेली.

हा शुद्ध बदमाशपणा आहे.

याच हॉस्पिटलमध्ये तपासणी व उपचारांसाठी चेन मार्केटिंगचे तत्व अवलंबले जाते. या सर्व प्रकारांमध्ये मूळ तपासणी व उपचाराचे दर एवढे वाढवलेले असतात की ते तथाकथित डिस्काउंट मिळाल्यानंतर स्वस्त वाटावेत. अन्यथा या कमी केलेल्या दरामंध्ये विविध तपासण्या करणे शक्य असताना ते दर का फुगवलेले असतात?

या लोकांनी वैद्यकीय व्यवसायाचा धंदा केलेला आहे.

२) बालाजी तांबे यांच्या गर्भसंस्काराच्या थोतांडाबद्दल मी आधीही लिहिले होते. डॉ. अरूण गद्रे यांनीही त्याबाबत लोकसत्तामध्ये अगदी पोटतिडिकेने लिहिले होते. तेव्हा आयुर्वेदाच्या अनेक स्वयंघोषित रक्षकांनी त्याविरूद्ध गदारोळ माजवला होता.

आता तांबे यांच्याविरूद्ध गर्भ लिंगनिदान निवडीबाबतच्या ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यान्वये ही कारवाई होणार आहे असे कळते. मात्र लोकसत्ताचे वाचक श्रीकांत पटवर्धन यांनी याबाबतीत अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वयेही कारवाई करावी अशी सूचना केलेली आहे. कारण त्याद्वारे होऊ शकणारी शिक्षा ही अधिक प्रभावी असेल असे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय या काद्याखली येणारे गुन्ह्यात जामीन मिळू शकत नाही याकडेही ते लक्ष वेधतात.

अशा जागरूक वाचकांचे कौतुक.

३) अखेर गजेन्द्र चौहान यांनी पुण्यात फिल्म व टेलिव्हिजन इन्स्टिट्युटच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यानी केलेले आंदोलन बहुधा आता त्यांच्याविरूद्धचे शेवटचे ठरावे.

मला वाटते की गुणवत्तेच्या कोणत्याही निकषात न बसणारी चौहान यांची निवड अतिशय अयोग्य आहे. भाजपला त्यांच्या मर्जीतील दुसरा कोणी लायक उमेदवार त्यासाठी मिळू नये हे दुर्दैव. मात्र फिल्म इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांचा बेशिस्तीचा गतेतिहास त्यांच्यासाठी पुरेशी सहानुभूती मिळवू शकला नाही व त्यामुळे केन्द्र सरकारला त्यांच्या निर्णायावर ठाम राहता आले.

आता त्यांचे अधिकारही कमी करण्यात आलेले आहेत व त्यामुळे ते नाममात्र अध्यक्ष राहतील की काय अशी स्थिती आहे.

४) जम्मू आणि काश्मीरचे मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनामुळे एक अतिशय बिनकामाचा काश्मिरी राजकारणी देशाने गमावलेला आहे. एरवी एखाद्या नेत्याच्या निधनाने राजकारणात ‘पोकळी’ वगैरे निर्माण झाल्याचे म्हतले जाते. पण या good for nothing राजकारण्यामुळे देशाचे नुकसानच झाले.

काश्मीरमधील राजकारणी हे नेहमीच देशहिताच्या मुद्द्यावर संदिग्ध भूमिका घेत तळ्यात-मळ्यात खेळताना दिसतात. तेही यास अपवाद नव्हते.

त्यांची मुलगी मेहबुबा मुफ्ती आता मुख्यमंत्री होतील. या त्यांच्यापेक्षा अधिक उपद्रवकारक समजल्या जातात. तेव्हा सरकारात सहभागी असलेल्या भाजपसमोरची आव्हाने वाढणार आहेत.

५) विमानतळांच्या नावावरून होणारे वाद टाळण्याकरिता यापुढे विमानतळाला केवळ त्या शहराचेच नावे द्यावे अशी नियमावली करण्यात येणार आहे असे समजते. हा शहाणपणाचा निर्णय वाटत असला, तरी तो केवळ हे सरकार सत्तेत असेपर्यंतच टिकेल अशी लक्षण दिसते. पुढचे सरकार वेगळे असेल तर ते हवे तसे निर्णय घेईलच.

६) राज ठकवणारे यांना ते हिंदू असल्याचा साक्षात्कार आता झालेला दिसतो. मुंबईतील आझाद मैदानात होणा-या मोर्चाच्यावेळी झालेल्या हिंसाचाराविरूद्ध त्यांनी आवाज उठवला होता हे त्यांना आज अचानक आठवले व मनसेच्या ध्वजातील हिरवा रंग हा फक्त देशभक्त मुस्लिमांसाठीच आहे, तो भिवंडी-बेहरामपाड्यातल्या मुस्लिमांसाठी नाही असे ते म्हणाले.

यांच्या ध्वजातला भगवा रंग त्यांच्या टोळीतल्या गुंड हिंदूंसाठी आहे का हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.

यांच्या व यांचे दुसरे ठकवणारे बंधू यांच्यातील भूमिका बदलण्याच्या स्पर्धेमुळे रंग बदलणारे सरडेही लाजेने काळेठिक्कर झाले आहेत.व

७) अलीकडे टीव्ही चॅनलवरील कार्यक्रमांच्याबाबतीत काही तक्रार असेल तर अमुकअमुकला कळवा अशी सूचना असलेली पट्टी पडद्याच्या खालच्या भागात मधूनमधून फिरवली जाते.

ते पाहून टायटॅनिक सिनेमा पाहताना ती बोट बुडाल्याने दु:खी झालेला शेजारचा पिट्टू म्हणाला की आपण ती बोट बुडवल्याबद्ल तक्रार करू.

त्याचे लॉजिक चालते, तर जान्हवीची डिलिव्हरी प्रेक्षकांनीच करवली असती की.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users