Submitted by कविता केयुर on 15 June, 2015 - 03:50
ती सांज निळाई ल्याली,
तो कृष्ण किनारी आलां
या कातरवेळी अवचित,
तो स्पर्श शहारून गेलां
बासरीत हरवून गेले,
क्षितिजावर क्षण ते काही
नि:शब्द सावळ्या राती,
डोळ्यांत दाटले पाणी
मी उरले ना मग माझी,
त्याचीच होवूनी गेले
रंगात रंगुनी त्याच्या,
रितेपण संपून गेले
काठावर कालिंदीच्या,
ती सरून गेली रात
डोळ्यांत ठेवूनी गेला,
सावळा रंग तो शाम …
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिशय सुंदर कविता. आवडली.
अतिशय सुंदर कविता. आवडली.
छान कविता, आवडली.
छान कविता, आवडली.
धन्यवाद !!
धन्यवाद !!
छान आहे कविता
छान आहे कविता
Chancha kalpana .Aawadali
Chancha kalpana .Aawadali