Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 4 October, 2014 - 13:07
जखमा भरतातच सगळ्या
असे ते म्हणतात
पण हे काही खर नाही
सदुसष्ट वर्ष झाली
ती जखम अजून भरत नाही
हिंदुस्तानचा जन्म अजून होत नाही
ती जखम घेवून मेलेत किती
किती मरणार माहित नाही
ती सरहद्द त्या तारा ते कुंपण
ती दुष्मनी तो वैराचा अंगार
का कधीच संपणार नाही
कळत नाही
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा