Submitted by रसिया बालम on 19 August, 2014 - 12:00
शिवाशीव विस्मरणात गेली
वस्ती आता एक झाली
मनं तशीच राहीली
जातीभेदांनी विटाळलेली
उतरंड संपली, भिंती पडल्या
अजुन करतो जातीचा उपहास
हा 'भटक्या' तो 'मागास'
उच्चत्वाचा मिथ्या आभास
दोन अनोळखी भेटताना
नवीन ओळख होताना
आडनाव महत्वाचं वाटते
कारण त्याची जात सांगते
-- रसिया बालम
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा