Submitted by profspd on 2 June, 2014 - 07:53
भले लोक ठेवोत तुम्हास नावे....
असे दान द्यावे, न कोणा कळावे!
घरी चूल ज्यांच्या सदा बंद असते.....
अशांना अरे, तोंडचे घास द्यावे!
भले फक्त काटेच वाट्यास येवो....
फुलासारखे जन्मभर दरवळावे!
करू का तमा अंध या डोळसांची?
ख-या आंधळ्यांची छडी मात्र व्हावे!
महामार्ग, रस्ते, किती पायवाटा......
तुझे थांगपत्ते कुणाला पुसावे?
तुला वाहिली जिंदगानीच माझी.....
तरी का तुझ्यास्तव असे मी झुरावे?
कशाला स्वत:ला स्वत: त्रास द्यावा?
कशाला उरी राग, मत्सर धरावे?
हटकणार नाही कुणीही कधीही.....
अशा फक्त स्थानावरी तू बसावे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भले फक्त काटेच वाट्यास
भले फक्त काटेच वाट्यास येवो....
फुलासारखे जन्मभर दरवळावे!
कशाला स्वत:ला स्वत: त्रास द्यावा?
कशाला उरी राग, मत्सर धरावे? >>> हे दोन सर्वात छान वाटले.
-----------------------------------------------------------------------------------
"भले लोक ठेवोत तुम्हास नावे...." >>> माझ्या अल्पमती आणि अल्पज्ञानानुसार या मिसर्यातील ’तुम्हास’ या शब्दामुळे वृत्त गडबडले असावे वाटते.
'तुम्हास' हा शब्द उच्चरताना 'तु' वर जोर दिला जात नाही.
जोर दिला जातो व जात नाही असे
जोर दिला जातो व जात नाही असे दोन्ही प्रकार आहेत.
वाईट नसली तरी आवडलीच असेही
वाईट नसली तरी आवडलीच असेही म्हणता येत नाही आहे
माझा प्रॉब्लेम समजून घ्याल असे वाटते
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद