Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 8 April, 2014 - 11:05
एक बरं हे रामाचं
शांतपणे जगायचं
समोरील जीवनाला
ना कधी न म्हणायचं |
शत्रूला सरळपणे
युद्धामध्ये मारायचं
प्रियकरा जपायचं
जीवास जीव द्यायचं |
साऱ्याचंच ऐकायचं
साऱ्यांस सवे घ्यायचं
सुखदुःख भोगतांना
सुखदु:खी जगायचं |
कपटाला वाव नाही
धूर्तते शिरकाव नाही
गंगोत्रीच्या निर्मळास
कधी कुठ अटकाव नाही |
रामाला श्रीराम असं
कसं काय होता आलं
एकवचनी सर्वदा
सहजी जगता आलं |
दु:खात बुचकळून
कष्टात घुसमटून
वेदनेत उकळून
कसं टिकता आलं |
रामाचं हे कोडं मला
कधीच नाही कळल
राम राम म्हणे रोज
तसं वळता न आलं |
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर रचना तुमचं चिंतन
सुंदर रचना तुमचं चिंतन तुम्ही अगदी सोप्या भाषेत मांडलंय.
छान
छान
छान.....सुंदर!
छान.....सुंदर!
धन्यवाद अंजली,,वैभव,नभ
धन्यवाद अंजली,,वैभव,नभ