Submitted by santosh bongale on 30 March, 2014 - 03:06
भकास वाटे रान सारे
पाचोळा आकाशी जाताना
वृक्ष ढाळती अश्रू
वाट पावसाची पाहताना
पक्षी झाले सैरभैर
वैर काही नसताना
सोडले प्राण काहींनी
घसा कोरडा असताना
माणूस करतो विध्वंस
स्वार्थ मनी असताना
फाटले काळीज मातीचे
पाऊस गावी नसताना
-संतोष बोंगाळे ३०/०३/२०१४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा