Submitted by जयदीप. on 22 January, 2014 - 12:38
आणू नकोस आता डोळ्यात आसवांना
चल, फुंकरून टाकू सार्याच वादळांना
मी ठेवले मनाशी त्यांना जपून होते
चोरी करून गेला विश्वास आज त्यांना
मानू नको कधी तू माझी विचारसरणी
ठेऊ नकोस नावे माझ्या मतांतरांना
नव्हतास तू तसेही करणार काम माझे
फोडू नकोस फाटे कुठल्याच कारणांना
'माझे' 'तुझे' कशाला? सारे तुझेच आहे...
घेऊन जा हवे तर माझ्या विरोधकांना
त्याच्या प्रगल्भतेची व्याख्या कुठेच नाही
भेटून घे हवे तर तू लाख पंडितांना
-जयदीप
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेवटचा शेर सोडून सगळे तूफान
शेवटचा शेर सोडून सगळे तूफान आवडलेत
शेवटचाही छानच आहे पण पर्सनली मला कमी आवडला इतकेच
नव्या वर्षात गझल आधीपेक्षा छान येवू लागलीये ..अजून येवूद्यात
खूप खूप शुभेच्छा
वैभवजी... धन्यवाद.... (फोन वर
वैभवजी...
धन्यवाद....
(फोन वर सविस्तर बोलीन या वीक एन्ड ला)
मी ठेवले मनाशी त्यांना जपून
मी ठेवले मनाशी त्यांना जपून होते
चोरी करून गेला विश्वास आज त्यांना<<<
हा एक शेर सोडून सर्व खयाल आवडले.
पहिला आणि 'मतांतरांना' हे
पहिला आणि 'मतांतरांना' हे सर्वात छान वाटले.
बेफिजी..उ.काका... खूप आभार.
बेफिजी..उ.काका...
खूप आभार.
'माझे' 'तुझे' कशाला? सारे
'माझे' 'तुझे' कशाला? सारे तुझेच आहे...
घेऊन जा हवे तर माझ्या विरोधकांना..............व्वाह...
धन्यवाद सर..
धन्यवाद सर..