कधी लिहिलं गंमत म्हणून
कधी लिहिलं सवय म्हणून
कधी लिहिलं गरज म्हणून
उद्या लिहिन ओळख म्हणून
कधी कधी वाटतं..
काय मागे राहतं?
चेहरा, आवाज की नाव?
माझ्या मागे राहतील
फक्त माझे शब्द
असेच.. उगाच.. सहज सुचलेले
वेळ होता म्हणून लिहिलेले
लिहिता लिहिता अजून सुचलेले
वेळ नव्हता, पण तरीही लिहिलेले
नसानसांत भिनली कविता
क्षणाक्षणात दिसते कविता
चार श्वास कमी दे मला
त्याच्या बदल्यात दे एक कविता
सूर्यप्रकाशाची शेवटची तिरीप
जेव्हा डोळे टिपतील
ओघळत्या चांदण्याचा शेवटचा थेंब
जेव्हा पापण्या तोलतील
तेव्हा थरथरत्या श्वासांनी मी
त्या सर्वव्यापी अंधारावर
दोन शब्द लिहून जाईन
आणि अनंताच्या वाटेवर
माझी दोन पावलं उमटतील
तीच असेल शेवटची कविता
खरीखुरी.. सर्वस्व वाहिलेली
वेळ नसेल, तरीसुद्धा लिहिलेली.....
....रसप....
२५ जून २०११
http://www.ranjeetparadkar.com/2011/06/blog-post_26.html
आवडली कविता
आवडली कविता
शेवटची सर्वस्वाची सर्वस्वाने
शेवटची सर्वस्वाची सर्वस्वाने लिहिलेली कविता.
रसप प्रणाम सलाम !!
सूर्यप्रकाशाची शेवटची
सूर्यप्रकाशाची शेवटची तिरीप
जेव्हा डोळे टिपतील
ओघळत्या चांदण्याचा शेवटचा थेंब
जेव्हा पापण्या तोलतील
तेव्हा थरथरत्या श्वासांनी मी
त्या सर्वव्यापी अंधारावर >>>>>>>> जबरदस्त लिहिलंस रे ....
चार श्वास कमी दे मला त्याच्या
चार श्वास कमी दे मला
त्याच्या बदल्यात दे एक कविता>>
क्या बात है .. जियो !!
व्वा !!! फार आवडली शेवटच्या
व्वा !!! फार आवडली शेवटच्या कवितेबद्दलची कल्पना !