Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 28 September, 2013 - 08:55
घरे पडतात
माणसे मरतात
घर पडे पर्यंत
माणसे त्याच
घरात राहतात
आपल्याच निवाऱ्यात
दफन होतात
नवीन चांगल्या
सुरक्षित घरात
राहायला कुणाला
नाही आवडत
पण जेव्हा हे
शक्य नसत
आपला जीव
धरून मुठीत
तिथेच त्यांना
रहाव लागत
हवाला ठेवून
देवावर नशिबावर
कारण तस म्हटले तर
आभाळाचे छत
केव्हाही पडू शकत
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हृदयाला घरे पाडणारी
हृदयाला घरे पाडणारी वस्तुस्थिती ..
धन्यवाद भारती..
धन्यवाद भारती..
practical
practical
कारण तस म्हटले तर आभाळाचे
कारण तस म्हटले तर
आभाळाचे छत
केव्हाही पडू शकत >>>व्वा !
नेमक्या शब्दांत असुरक्षिततेची भावना पकडली आहे .
धन्यवाद जय,सुशांत
धन्यवाद जय,सुशांत
वस्तुस्थिती दर्शवणारे
वस्तुस्थिती दर्शवणारे काव्य......