Submitted by वेल on 3 September, 2013 - 04:28
नातं तुझं नी माझं
कधी सुरुच झालं नाही,
कधी सुरुच झालं नाही, म्हणून कधी संपलं सुद्धा नाही.
भाव माझ्या मनातले
मनातच राहिले
व्यक्त करून नात्यामध्ये
ते मी बांधू नाही शकले.
अशनी बनून ते भाव
मनातच तरळत राहिलेत.
स्वप्न बनून झोपेत येऊन
मला छळत राहिलेत.
ही कविता म्हणूनच,
की तुला ते सांगावेत,
तुला नाही सांगितले तरी
व्यक्त ते व्हावेत,
मन माझे रिते करून
मी स्वप्नमुक्त व्हावे.
कळेल न कळेल तुला
मी कोण ते
पण मनाला माझ्या
समाधान मिळून
मी छान झोपी जावे.
१६ नोव्हेंबर २००९
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा