Submitted by देवा on 29 July, 2013 - 01:13
असं कसं रे, तुला अगदी काही म्हणजे काहिच जमत नाही
प्रत्येक गोष्टीत वेंधळेपणा
प्रत्येक गोष्टीत गोंधळ
परवा कोथिंबीर निवडायला सांगितलं
तर त्याच्या मुळ्यांना गोंजारत बसलास
केर काढायला सांगितला
तर त्या मुंग्यांनाच बघत बसलास
एकदा लग्न झालं की सुधारशील असं वाटलं होतं, पण छ्छे
..
..
..
नाही म्हणायला चार गोष्टी जमतात आता मला
विठोबा नाही म्हणायचा नाही
आता रिंगण झालं कि वारी पूर्ण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा