Submitted by आर.ए.के. on 28 March, 2013 - 08:05
कधी मी स्वतःला हुडकलेच नाही,
हरवले अशी की पुन्हा गवसलेच नाही!
मिळाला ना कधी पाकळ्यांना कवडसा,
कोमेजले अशी कि, उमललेच नाही!
बरसला तो श्रावण, मी मात्र कोरडी,
नयनांतून अश्रु , बरसलेच नाही!
निष्पर्ण झाली ती रोपटी स्वप्नांची,
श्रावणात कोणत्या मी बहरलेच नाही!
गर्तेत दु:खाच्या कोसळले अशी मी,
बुडले अशी मी, कधी तरलेच नाही!
कधी कातरवेळी, आठवते मलाही,
टोचणी दु:खाची, कधी विसरलेच नाही!
दु:खाशी माझे कधी बिनसलेच नाही,
ढिगार्यात दु:खाच्या अन सुख सापडलेच नाही!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कवितेतून व्यथा चांगली प्रकट
कवितेतून व्यथा चांगली प्रकट होतेय.
वृत्ताकडे लक्ष देणे आवश्यक असे वैयक्तिक मत.
@UlhasBhide प्रतिसादाबद्दल
@UlhasBhide प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
लिहिताना वृत्ताकडे लक्ष गेलचं नव्हतं. यापुढे देईन.