Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 23 March, 2013 - 02:25
काल पर्यंत होते
वरवरी दुष्मन जे
हातात हात घालून
आज उभे आहेत
टोळ्यांचे साम्राज
धोक्यात आले म्हणूनी
सारेच ते आता
एक झाले आहेत
आत्ता त्यांना आठवते
न्याय ,नियम, सन्मान
थडगेच जयांचे ते
काल पुरून आले होते
गुर्मीतला माज
डोळ्यात झळकावूनी
निर्लज्य शुभ्र वस्त्रधारी
जग वेठीस धरुनी आहेत
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा