Submitted by संजय४५ on 16 January, 2013 - 11:28
भावनांचा खेळ
तू म्हणालीस
यापुढे तुला
भेटले नाही तर
तुला काय वाटेल
मी दूर गेल्यावर
तुला नाही दिसल्यावर
खरचं रे तुला
मी कां आठवेल ?
काय उत्तर देऊ
मी तुझ्या या प्रश्नाचं
तू साद घातल्यावर
मला गुंतवल्यावर
अन अशी विजेसारखी
तू नाहीशी झाल्यावर
माझं मन किती जळेल
हे तुला सांगायलाच हव कां ?
इतकंच सांगतो
एकदा मन जुळल्यावर
नातं फुलल्यावर
असं कुणी सोडून जातं कां ?
न सोडून जायचच असेलं तर
हा भावनांचा खेळ
मांडायचाच का ?
याचं उत्तर तू मला
देऊ शकशील का ?
संजय एम निकुंभ , वसई
दि . १५.०१.२०१३ वेळ : ९.४५ रा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा