विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?

Submitted by शशिकांत ओक on 21 February, 2012 - 13:55

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?
मित्र हो,
आपण कडेगावच्या भानामतीची केस - प्रकरण 1 मधे वाचलीत. ती वाचून प्राचार्य अद्वयानंद गळतगे कोण? हे लिखाण का करत आहेत? असा प्रश्न साहजिक निर्माण होतो. त्यासाठी आपण विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे? याची भूमिका काय? ते वाचावे म्हणजे आपल्याला काही गोष्टींचा उलगडा व्हायला मदत होईल.
भूमिका

मोरा-अंगी असोसे। पिसे असती डोळसे।।
परि एकली दृष्टी नसे। तैसे ते गा ।। - ज्ञाने. 13.835

अर्थ – मोराच्या अंगावर डोळ्यासारखी पुष्कळ पिसे असतात. पण त्यांचा पाहण्यासाठी काहीच उपयोग नसतो. त्याप्रमाणे एकटी (अध्यात्मज्ञानाची) दृष्टी नसेल तर इतर (पुष्कळ शास्त्रांच्या ज्ञानाची) दृष्टी असून काय उपयोग? (ते लोक आंधळेच असतात)
काही महत्वाचे संदर्भ –
“सारख्याच दिसणाऱ्या समान तीन बालकांच्या मुर्तींप्रमाणेच शास्त्रज्ञांचेही तीन वर्ग पडतात. एक, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार रुढ विज्ञानाच्या नियमात बसत नसल्यामुळे खोटे म्हणून सोडून देतात. दुसरे, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार खरे म्हणून स्वीकारले तर आपली शास्त्रज्ञ म्हणून असलेली इभ्रत जाईल या भितीने ते मनातच ठेऊन घेणारे; आणि तिसरे, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार दुसऱ्यांना सांगणारे व त्यांच्या खरेपणाची शहानिशा करून घेण्यासाठी शास्त्रीय संशोधनाचा जाहीर आग्रह धरणारे. हा ग्रंथ शेवटच्या शास्त्रज्ञांच्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतो.
या ग्रंथाची भूमिका शुद्ध विज्ञानवादी आहे. (शुद्ध विज्ञान म्हणजे कुठलीही तत्वज्ञानाची बांधिलकी नसलेले विज्ञान)शुद्ध विज्ञानात दैवी शक्तीला (Divine Power) किंवा परमेश्वराला (Personal God) अजिबात स्थान नाही. सर्व घटना प्राकृतिक आहेत असे शुद्ध विज्ञान मानते व त्यांची नैसर्गिक (natural)उपपत्ती शोधते. पण नैसर्गिक उपपत्ती हे दुधारी शस्त्र आहे. ते जसे अंधश्रद्धेवर प्रहार करते तसे जडवादी तत्वज्ञानावर ही प्रहार करते. आणि हीच जडवादी लोकांची सर्वात मोठी अडचण आहे. म्हणून ते या शुद्ध विज्ञानरुपी शस्त्राच्या दुसऱ्या ‘धारे’कडे नेहमी व पद्धतशीरपणे दुर्लक्ष करीत असलेले दिसून येतात. ती धार जणु अस्तित्वातच नाही असे ते समजतात – नव्हे ते त्यांचे गृहितकृत्य असून त्या गृहितकृत्यावरच त्यांचे तथाकथित ‘विज्ञान’ उभे आहे. याविज्ञानाला आत्मवंचक - अर्थात डोळे झाकून दूध पिणाऱ्या मांजराच्या जातीचे व म्हणून ‘खोटे विज्ञान’ म्हणता येईल. या आत्मवंचक व खोट्या विज्ञानाला उघडे पाडणे , त्याचे खरे स्वरूप वाचकांपुढे ठेवणे हा या ग्रंथाचा मुख्य उद्देश आहे.”
“ अशा अनेक नैसर्गिक घटना आहेत ज्यांचा कार्यकारणभाव मानवाला माहित झालेला नाही. प्रश्न असा आहे की अशा घटनांची आदिकालिक मानवाप्रमाणे ‘चमत्कार’ म्हणून पुजा करायची का? की त्याच्या पाठीमागचा कार्यकारणभाव समजून घ्यायचा प्रयत्न करायचा ? की अशा घटना घडतच नाहीत, घडणे शक्य नाही असे म्हणून शत्रूला पाहून वाळूत डोके खुपसणाऱ्या शहामृगाची भूमिका स्वीकारायची? दुर्दैवाने काही शास्त्रज्ञ अशी भुमिका स्वीकारताना दिसून येतात.ही भूमिका आत्मवंचक, अवैज्ञानिक व म्हणून त्याज्य होय, हे या याग्रंथात वाचकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे.”

  • या ग्रंथाच्या मथळ्याविषयी थोडेसे .... व अन्य मजकूर
  • .... शिवाय
  • सादर अर्पण
  • अनुक्रमणिका
  • मुखपृष्ठावरील चित्र
  • प्रकाशक

माहिती 'ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे' या ब्लॉगवर
येथे वाचा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

गूढविद्या, अतींद्रिय शक्ती, परामानसशास्त्र या विषयासंदर्भात मायबोलीवर सध्या वादळ उठलेले आहे. याच विषयावरची एक्स्पायरी डेट ही रहस्यमय कादंबरी येथे वाचा.

expiry date.jpg

या विषयाकडे मनोरंजन / करमणूक या दृष्टीने पाहणे जास्त योग्य होईल. Happy

फ्रान्समधील लूर्द येथे चमत्कारजन्य रीतीने (=आधुनिक वैद्यकशास्त्राला अज्ञात) रोग बरे होतात. तिथे रोगी बरे झाल्याच्या वैद्यकीय नोंदीदेखील ठेवल्या जातात.

आपल्या कक्षेबाहेरील अनुभव आले तर त्यास लगेच खोटे ठरवू नये. भानामाती नाही असे म्हणून वस्तुस्थिती नाकारणार्‍यांना हे आवर्जून सांगावेसे वाटते.

-गा.पै.

मित्र हो,

डॉ साती यांचं म्हणणं आपल्याला समजलेलं दिसत नाही.
आता २४ तास होत आले मी अ‍ॅडमीट करून, ना लाल डोळे,ना उलटी.
याचा अर्थ खूप सोपा आहे हो ओककाका.
डॉ साती यांनी तुम्हाला उत्तर का दिलं नाही हे सहज समजून येतं.

प्रश्न त्या भानामतीच्या केसेसमधील दोघींना अडमिट केल्यावर त्या ठीक झाल्या म्हणून त्यांना काहीही झालेले नव्हते. मला तो संदर्भ ध्यानात आला नाही वा असा मी समज करून घेतला नाही. असे डॉ. सातींचे पर्यायने अन्य सदस्यांचे व आपले मत आहे. डॉ. नरसिम्हैयांचे मत तसेच आहे. ते प्रकरण सात मधील कर्नाटकच्या सरकारी अहवालातून दिसून येते.
प्रश्न वेगळा आहे. डोळे अचानक लाल का झाले, सात वर्षे इतका काळ ती बाई जेवली का नाही... गायींच्या आचळातून अचानक दुधाऐवजी रक्त कसे येऊ लागले, अचानक झाडे का व कशी वठली.. याचा अनुक्रमे डॉ.साती वा डॉ. नरसिन्हैयानीं पडताळा घेतला का ? तो शोध घ्यायला हवा...
-अशा केसेसमधे त्यांना धाक दाखवून ठीक केले - या एका ओळीत त्याचे उत्तर नसून,
त्या घटना घडल्या कशा याचा शोध अपेक्षित आहे. त्याची डॉ. सातींच्या प्रतिसादातून वाट पाहिली गेली.

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. ति झाडाजवळ गेला आणि ज्ञानतपस्वींना पाठीवर घेऊन चालू लागला. तेव्हां ज्ञानतपस्वींनी त्याला पुस्तकातले एक प्रकरण वाचून दाखवायला सुरूवात केली आणि सांगितले कि जर हे प्रकरण तू मिसळपाव, मायबोली अशा ठिकाणी स्वतःच्या बोटांनी टंकले नाहीस तर तुझ्या बोटांची शंभर शकले होऊन ती तुझ्याच कीबोर्डावर लोळू लागतील..

http://www.misalpav.com/node/20959
या ठिकाणचे शीर्षक आम्हास खूप आवडल. त्रिशूल मधे अमिताभ बच्चन गुंडांना उद्या अकरा वाजता व्हॅन घेऊन येतो असं सांगतो त्याचीच आठवण झाली.

अरे देवा,अजून हानामतीचा गोंधळ चालूच आहे का?

पहिल्या केसमध्ये ती मुलगी नवर्‍याला सोडून आपल्या आईबाबांकडे राहात होती. तिच्या मुलांनाही भावाच्या मुलांइतकंच प्रेम माहेरी मिळावं अशी तिची इच्छा होती. ही मुलगी पैसे कमवण्यासाठी एक कामचलाऊ ब्युटी पर्लर चालवते त्यामुळे तिच्याकडे बर्‍याच प्रकारची डोळे लाल करणारी किंवा डोळ्यातून पाणी काढू शकणारी रसायने आहेत.
घरात जरा कुरबूर झाली की ती ही रसायने कुणाच्या नकळत डोळ्यात घालते आणि डोळे भयाण लाल करून घेते.
हे तिनेच आम्हाला विश्वासात घेतल्यावर सांगितलं. तिचे आणि घरच्यांचे व्यवस्थित समुपदेशन केल्यानंतर हा प्रकार आता बंद आहे.

दुसर्‍या केसमध्ये 'हिने मागच्या सात वर्षांत काही खाल्ले नाही' हा तिच्या घरच्यांचा दावा आहे सत्य नव्हे. खरं तर ती तीन वेळेस व्यवस्थित खाते पण वरचे एक दोन घास स्वतःहून उलटी करून उलटून काढते. तिच्यात डिहायड्रेशन किंवा मालन्यूट्रिशनचे कोणतेही साईन्स नव्हते. दोन दिवस घरच्या ससेप्टिबल म्हणजेच या प्रकारांनी घाबरून मुलीच्या मनाप्रमाणे ऐकणार्‍या व्यक्तींपासून तिला दूर ठेवल्यावर हे प्रकार आपोआप बंद झाले. आता ती फक्त 'उलटी आल्यासारखी वाटते, छातीत दुखते, असे म्हणते. ३ दिवसांनी तिला डिस्चार्ज दिल्यावर घरी २ दिवस बरी होती मग पुन्हा उलट्या सुरू झाल्यात. ती हे पहिल्या केसमधील स्त्रीप्रमाणे स्वतःहून करत नसून अती डिप्रेशनमुळे तिचे मन तिच्या शरीरास हे करण्यास भाग पाडतेय. (सोमॅटायजेशन). तिच्यावर सध्या मानसोपचार तसेच तिच्या आजी-आई यांचे काउंसेलिंग चालू आहे.

ओकसाहेब तुमची मते ठाम आहेत यामुळे या वरच्या विवेचनातूनही तुम्ही स्व्तःच्या सोयिचं तिसरंच काही शोधुन काढाल याची खात्री आहे.

असल्या अंधश्रद्धांना बळी पडणारे लोक हे अडाणी अशिक्षित असावेत असं वाटत होतं. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले लोक ह्या असल्या गोष्टीत विश्वास ठेवणार असतील तर कठीण आहे देशाचे.

तुम्ही कितीही कंठशोष करा हो पण असल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याइतका निर्बुद्धपणा नाही शक्य आम्हाला.

ओकसर जिथे वेताळ पण चिकाटी पाहून प्रसन्न झाला तिथे आम्हा मानवांची काय कथा हो ?

मी आपणास शरण आलो. मला आपल विद्यार्थी करून घ्या आणि अतींद्रिय विद्या शिकवा.
मला खालील अभ्यासक्रमात रस आहे

१. मूठ / लिंबू मारणे
२. संमोहनविद्या ( आता तसं योग्य वय नाही राहीलं पण असू द्या )
३. भानामती ( ज्ञात स्पेशल )
४. परकायाप्रवेश
५. म्रुत्युंजय मंत्र / संजीवनी
६. टेलीपथीद्वारे संपर्क

कुठून सुरूवात करताय शिकवायला ?
( फी ची काळजी करू नये.फक्त फी म्हणून गळतगेंची पुस्तकं विकायचा आग्रह धरू नये )

आपल्या कक्षेबाहेरील अनुभव आले तर त्यास लगेच खोटे ठरवू नये. भानामाती नाही असे म्हणून वस्तुस्थिती नाकारणार्‍यांना हे आवर्जून सांगावेसे वाटते.

साक्षात पैलवानाचे हे मत ! सावरकरांच्या आत्म्याला किती क्लेष होतील हे वाचून..

ज्याला लोक भानामती, इ. म्हणतात ते प्रकार विद्युत चुंबकीय लहरींमुळे घडू शकतात. आणि या वैज्ञानिक मुद्द्यावर नाडकर्णी यांनी त्यांच्या पुस्तकात अनेक संदर्भ, शोधपत्रे, इ. चा अभ्यास करून माहिती दिलेली आहे.

प्रा सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी एक पुस्तक लिहीलेले आहे. नाव "पृथ्वीवर माणूस उपराच "
त्यात त्यांनी असं म्हटलं आहे कि पूर्वीच्या काळी देव पृथ्वीवर आले आणि त्यांनी पिरॅमिड आदि बांधकामे केली.

दोनेक वर्षांपूर्वी नॅशनल जिओग्राफीक वर हे बांधकाम कसं केलं. ओंडके आणि हत्तींच्या सहाय्याने मोठेमोठे दगड एकावर एक कसे रचले हे दाखवलं गेलं. दगड ओढताना ठार झालेल्यांच्या मजुरांच्या हातापायाची हाडं बांधकामाजवळ सापडली. ती अपघातांना दुजोरा देत होती. पिरॅमिड वसवताना मजुरांची वसाहत देखील तिथं होती. त्यांची भांडी, हाडांचे सापळे सापडले. यावरून त्यांची उंची नॉर्मल असल्याचे दिसून आले.

नाडकर्णींनी मात्र त्या काळी दहा ते पंधरा फूट उंचीच्या अतिमानवांनी हे बांधकाम केले असल्याचा निष्कर्ष काढला होता आणि त्यालाही अभ्यासपूर्ण असेच म्हटले गेले होते.

<<"अज्ञाताचे विज्ञान"
नावाचे डॉ. सुरेशचंद्र
नाडकर्णी यांचे पुस्तक
वाचा, अनेक
गोष्टींचा उलगडा होईल.>> 'ज्ञात 'गोष्टिंवरच संशोधन करता येते, त्यामुळे अज्ञाताचे विज्ञान हे शिर्षकच चुकीचे आहे.
विद्युत चुंबकीय लहरीमुळे भानामती होते.... scientific evidence द्या .

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?
(बाफचा विषय हा आहे, नाही का ? )

उत्तर : खालील पर्यायातून उत्तर शोधा :
अ) प्रकाशक मिळाल्याने.
ब) वेळ जात नसल्याने
क) प्रसिद्धीसाठी
ड) वरीलपैकी सर्व

मित्रांनो,
मी आपणास शरण आलो. मला आपल विद्यार्थी करून घ्या आणि अतींद्रिय विद्या शिकवा.

चला मराठीत लेखन करणारे एक गागारिन अंतराळ प्रवासानंतर तरी सिकवणीला राजी झाले....
आणखी कोणी बॉंडटाईप, प्यारेमोहन आदि गळाला लागतायत काय पाहू....
अभ्यासक्रम काय व कसा तो नंतर ठरवू पण आधी प्रत्यक्ष भेटीला रशियाहून(?)
तर या...

आपल्या कक्षेबाहेरील अनुभव आले तर त्यास लगेच खोटे ठरवू नये. भानामाती नाही असे म्हणून वस्तुस्थिती नाकारणार्‍यांना हे आवर्जून सांगावेसे वाटते.
----- अनुभव खोटे ठरवण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही मागच्या पानावर मी दिलेल्या TOI chyaa लिंक वाचल्यात कां? प्रामाणिक शोध घेतल्यास आणि वस्तुस्थितीच्या मुळाशी गेल्यावर भानामती हा प्रकारच अस्तित्वात नाही आहे ह्याचे प्रत्यंतर वेळोवेळी आलेले आहे... तो सर्व मनाचा खेळ आहे (अ) मनाचा कमकुवत पणा, (ब) आर्थिक किंवा अजुन काही (vested interest) उद्देश.

असा प्रचार शिकलेल्या लोकांकडून होतो तेव्हा मला vested interest असल्याचा संशय येतो.

आपल्या कक्षेबाहेरील अनुभव आले तर त्यास लगेच खोटे ठरवू नये. भानामाती नाही असे म्हणून वस्तुस्थिती नाकारणार्‍यांना हे आवर्जून सांगावेसे वाटते.

साक्षात पैलवानाचे हे मत ! सावरकरांच्या आत्म्याला किती क्लेष होतील हे वाचून..
------ सावरकरांच्या विचारांना नक्कीच ठेच पोहोचली असेल... Sad

बॉंडटाईप, प्यारेमोहन आदि गळाला लागतायत काय पाहू....
----- ओकसाहेब दिवसा स्वप्न ? प्यारेमोहन हे भरवशाचे फलंदाज आहेत. ते गळाला नाही पण भानामती या विचारांना नक्कीच गाळांत नेतील.

ओक साहेब, आपण पु ना ओक यांचे आडनावबंधु शोभत आहात, तसेच लिहित आहात.
मी शिकवणिला येईन पण अभ्यासक्रमात 'अज्ञाताचे विज्ञान ','जागतिक इतिहासातील खिंडारे' हि क्रमिक पुस्तके नसावीत.

उदय,

>> तुम्ही मागच्या पानावर मी दिलेल्या TOI chyaa लिंक वाचल्यात कां?

नाही वाचल्या. मात्र भानामतीच्या शेकड्यातल्या ८५ केसेस खोट्या असतात हे मला मान्य आहे. यांचं पटण्याजोगं स्पष्टीकरण देता येतं. मात्र उरलेल्या १५% घटनांत उघड कारण दिसत नाही.

या खर्‍या घटनांचा मागोवा घेण्याचं मी सुचवतोय. असं बघा की भारतातले बरेचसे बुवा, बाबा चक्क ढोंगी आहेत. म्हणून अध्यात्मविद्या खोटी ठरत नाही. खरे लोकही या क्षेत्रात आहेत, आणि म्हणूनच खोटे लोक खर्‍यांचं रूप घेऊन जनतेला फसवत आहेत. यावर एकच उपाय म्हणजे जनतेला खरेखोटे यांतला फरक करायचं शिक्षण देणे.

हाच आगम (अ‍ॅप्रोच) भानामतीच्या बाबतीत राबवायला हवा. त्यासाठी खर्‍या घटनांची संगती लावायला हवी. सगळ्या घटनांना खोटं ठरवणं हे पुढील चौकशीसाठी हानीकारक आहे.

माझा मुद्दा आपल्याला पटला असेल अशी आशा आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

उदय व अन्य मित्र हो
टीओआय मधील लिंक वाचली. बातमी नेहमी कमी शब्दात व संपादून छापलेली असते. असे माझे मत आहे.म्हणून ती खोटी असे मी म्हणत नाही पण त्यातील सर्व विधाने सरसकट घेऊ नयेत असे मला वाटते.असो.
खालील एक ऑल अबाऊट बानामती - डेक्कन हेरॉल्ड मधील रिपोर्टची लिंक पुर्वी वाचनात आलीहोती.
त्यातील खालील उतारा ‘भानामती’ नावाचे काही घडत नसते, ती कशी नाही वा असू शकत नाही असे श्री. गुली नामक व्यक्तीने कर्नाटक सरकारच्या भानामतीच्या शास्त्रीय शोधाबद्दलच्या समितीतील एक सहकारी म्हणून शिवम्मा व अन्य लोकांची शारीरिक तपासणी करून सिद्ध केलेले आहे. म्हणून त्याला प्रत्यावाद नसावा.
त्यात ते म्हणतात,
“Towards this, Shivamma had called the girl to her house on April 15, and had applied chemicals on her body, and dress. This was probably some pyrogalic compound like lithium, which catches fire as soon as it comes in contact with water, Mr Guli said. Shivamma claimed before the villagers that this was through her powers of bhanamati. The girl’s elder sister, who is married, also caught fire in the same fashion a few days later, but she survived, he adds.

The examination of the dresses worn by both the victims showed traces of the chemicals used, he said. Moreover, Mr Guli points out that bhanamati cannot be practiced by a single person, as the main practitioner may claim. This has to be done by a group of people. While the main practitioner claims that he will do bhanamati on some person, his accomplices do all the physical work of applying chemicals to the victims as the case may be. They make a targeted cow drink certain chemicals which causes internal ruptures because of which it begins to yield blood instead of milk.”

ते म्हणतात, ‘probably’ (नक्की काय ते त्यांना माहित नाही पण) भानामती असल्याचे भासवणारे लोक ती 'काही काही रसायनांचा' वेळोवेळी उपयोग करून व काही लोकांना हाताशी धरून अशी परिस्थिती तयार करतात की त्यामुळे भानामती झाल्याचा आभास निर्माण होतो. हे स्पष्टीकरण ‘सत्य व नक्की पडताळा करून ठरवलेले आहे’ असे मानावे असा विज्ञानवाद्यांचा आग्रह असणार नव्हे असतो. असे हातचलाखीचे वा रसायनिक पदार्थांचे वापर करून जादुई प्रयोग करणारे अनेक आहेत.
आता वरील कथनावर वाचकाने असा विचार करावा - मीच शिवम्मा आहे. कर्नाटकातील एका खेड्यात राहाते -तो. मला एकावर मुलीवर-बाईवर आणि काही गाईंवर भानामतीचा प्रयोग करायला एकाने वैयक्तिक वितुष्टामुळे पैसे देऊन तयार केले आहे.
आता मला श्री. गुली म्हणतात तसे 'पायरोगॅलिक मिश्रणासारखे लिथियम' नावाचे रसायन अचानक आग लावायसाठी मिळवायला हवे. लिथियमला सामान्य कानडीभाषेत काय म्हणतात, ते मला घरगुती तयार करता येत नसेल तर कुठल्या किराण्याच्या वा केमिस्टच्या दुकानात मिळते, केवढ्याला व किती प्रमाणात याचा विचार करायला हवा. समजा पैशाची, रसायनाची तयारी मी केली. आता मला ते हव्या त्या व्यक्तिच्या शरीराला लावायला मिळण्यासाठी योग्य संधी हवी. ती मुलगी जी नंतर मेली, आपणहून हे सर्व करायच्या आधी शिवम्माकडे का व कशी गेली. नंतर आग लागेपर्यंत घरच्यांना काही कशी बोलली नाही. बर ती गेली तर गेली, तिची विवाहित बहिण ही नंतर काही दिवसांनी शिवाम्माकडे गुपचुप गेली पण कर्मधर्मसंयोगाने ती आगीतून वाचली...असो.
जे लोक अशी कामे हातात घेतात त्यांचे आधीच्या केसेस हाताळून पैशाने खिसे भरलेले असले पाहिजेत. आता श्री गुली म्हणतात की सत्यसोधक समितीला उत्तरे देतानाशिवम्मा सर्व गावकऱ्यांसमक्ष, मी एकटीच भानामतीच्या शक्तीने हे साध्य करते असे जरी म्हणाली असली तरी तिचे ते म्हणणे डावलून, अन्य मदतीच्या कामासाठी माणसे मिळवायला सोय करावी लागते.
अशी ती शिवम्मा एक तर खुप पैकावाली व माणसे राखलेली असावी लागेल, शिवाय असा धंदा इतका सोपा व पैसे देणारा असेल तर तिचे सहकारी तिला मागे टाकून तेच या धंद्यात प्रतिस्पर्धी होतील. पण शिवाम्मा किंवा असे मांत्रिकाचे काम करणारे लोक खोपटात नगण्य परिस्थितीत जगत असतात आणि त्यांना अशी कंत्राटे देणारा ही असाच खेड्यातील जनसामान्य असतो असे समितीच्या लक्षात आले असेल.
'ए इकडे ये ग. हे चॉकलेट खा. मी तुला रसायन लावायला आली आहे' असे इतक्या सहजासहजी जे शक्य होणार नाही. पण पैसे देणाऱ्या व्यक्तिने तगादा लावला आहे की अजून कसे आग लावायचे भानामतीचे चाळे सुरू करत नाहीस. म्हणून शेवटी साहस करून त्या व्यक्तीला घरी आणून तिच्या शरीरातील व कपड्यांना ते रसायन फासायला मला नेलेच पाहिजे. तिकडे त्या गोठ्यात बांधलेल्या गाई कोठल्यातरी रसायने (certain chemicals - ज्याचे नाव शोधायचे काम समितीने आपणहून अंगावर घेतला होते तरीही ती अशास्त्रीय ढोबळ शब्द रचना करते) मिश्रित चारा खात नाहीत व पाणी पीत नाहीयेत. साधे त्यांच्या जरा जवळ गेले तर जनावरं अनोळख्याला ढुशा मारतात. रात्री जावे असा हाताशी घरलेल्या लोकांतर्फे घाट घातला तर आसपासच्या जनावरात हालचाल होते व घरातले लोक जागे होतात. पकडले जाऊ म्हणून मग परतावे लागते. अशी कैफियत वाचक म्हणून शिवम्मा असाल तर आपल्याला करावी लागली तर नवल नाही. पण समितीला त्याची फिकिर नाही.
श्री. गुलींनी असा सर्व शास्त्रीय विचार करून त्या शिवाम्माला असे विचारले असेल की मला माहित नाही असे 'सर्टन केमिकल' ते कुठले? की ज्यामुळे ते गाईंच्या पोटात गेले तर त्यांच्या आचळातून दुधाऐवजी रक्त पडेल? बर त्यांनी नाही विचारले, असे मानले तर डॉ. नरसिहय्यांच्या अध्यक्षतेखाली भानामती विरोधात मुद्दाम संघटित केलेल्या समितीने आपल्या कर्नाटक राज्याच्या सरकारी अहवालात तरी त्या कमिकल्सचे उल्लेख केले असले पाहिजेत आणि कर्नाटक सरकारच्या व सामान्य जनतेच्या समाधानाकरिता असे प्रात्यक्षिक त्यांनी सार्वजनिक ठिकाणीकरून दाखवले पाहिजे.
महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे वारे वहाते असून भानामती या प्रश्नावर विचार करून उपाययोजना करणारे ही आहेत. त्यांपैकी एका उपाययोजक निष्णातांनी पिवळा फॉस्फरस अचानक आग लावायला भानामतीचे खेळ करणारे व्यक्ती वापरत असावेत असा 'अंदाज' व्यक्त केला आहे. त्यावर भानामतीचा बंदोबस्त करणारे दुसरे निष्णात व्यक्ति म्हणतात की असले पोरकट तर्क वापरल्याने भानामती करणारी व्यक्ती मनोमन हसली असेल.
अशी खिल्ली उडवताना म्हणतात, 'अहो, श्री. निष्णात, बाजारात सहज उपलब्ध असणारे 'पदार्थ(?)' भानामती करणारे वापरतात. फॉस्फरससारखे सहजासहजी विकत न मिळणारे पदार्थ त्यांना उपलब्ध कसे व केवढ्याला पडतील याची कल्पना करा'. आता हे दुसरे श्री. निष्णात देखील भानामती करणाऱ्या व्यक्तीला बाजारात सहजासहजी विकत मिळणारी व अचानक पेट घेणारी वस्तू कोणती ते मात्र चुकून सांगत नाहीत...

माझा या लेखनातून फक्त शोध कार्य करणारे किती थातुर मातुर शब्दात शास्त्रीय विश्लेषणाची विल्हेवाट लावतात. जरा खोलवर विचार केला तर त्यातील त्रुटी लक्षात याव्यात असा आहे. डॉ. साती म्हणतात तसा कोणी कांगावा करून आपल्याकडे सहानुभूती निर्माण करायला लोक आले असतील. हे मान्य पण सरसकट असे माप लावू नका. शोध घ्या व मग ठरवा.

ओकसाहेब,

भानामती, चेटूक, जादूटोणा, मूठ मारणे, करणी करणे, काळी जादू इ. प्रकारांवर माझा अजिबात विश्वास नाही. असे प्रकार अजिबात अस्तित्वात नसतात. हा निव्वळ मानसिक भ्रम आहे. त्यामुळे, डोळ्यातून खडे बाहेर येण्यामागे भानामती आहे, यावर देखील माझा अजिबात विश्वास नाही.

तुमच्या वरील लेखातील घटनेचा काही जणांनी समर्पक शब्दात प्रतिवाद केलेला आहे तर काही जण निव्वळ कुत्सित टोमणे मारत आहेत. परंतु त्यांच्या शेर्‍यांमुळे तुम्ही अजिबात संयम ढळू न देता शांतपणे आपली बाजू मांडत आहात, हे प्रशंसनीय आहे.

घरात जरा कुरबूर झाली की ती ही रसायने कुणाच्या नकळत डोळ्यात घालते आणि डोळे भयाण लाल करून घेते.
हे तिनेच आम्हाला विश्वासात घेतल्यावर सांगितलं>>>
हम्म.
लोकप्रभा मध्ये सध्या कोकनचो डोक्टर अशी एक लेखमाला येत आहे. मागच्या एक दोन अन्कात अशाच काहि केसेस विषयी लिहिल आहे.
जिज्ञासुनी वाचावं. Happy

बा द वे, भानामती हा प्रकार खरा की खोटा हे मला नाही माहिती.
पण कोणी खात्रीशीर करुन देत असेल तर चीन आणि पाकिस्तानवर भानामती करण्याची माझी इच्छा आहे.
खर्च मी सोसेन. Happy

मास्तुरे,

>> भानामती, चेटूक, जादूटोणा, मूठ मारणे, करणी करणे, काळी जादू इ. प्रकारांवर माझा अजिबात विश्वास नाही.

एक प्रश्न पडतो. तो म्हणजे : पुरावे दिल्यावर विश्वास बसेल का?

उत्तर हो असल्यास दुसरा प्रश्न उद्भवतो. तो म्हणजे वरील सर्व कृत्ये कुकृत्ये म्हणून गणली जातात. याऐवजी एखादे निरुपद्रवी कृत्याचा पुरावा चालेल का? उदा. : मंत्रशक्तीने अग्नी प्रज्वलित करणे?

आ.न.,
-गा.पै.

>>> एक प्रश्न पडतो. तो म्हणजे : पुरावे दिल्यावर विश्वास बसेल का?

होय

>>> याऐवजी एखादे निरुपद्रवी कृत्याचा पुरावा चालेल का? उदा. : मंत्रशक्तीने अग्नी प्रज्वलित करणे?

चालेल. द्या पुरावे. असा फक्त अग्नी प्रज्वलित करता येतो की नंतर पाहिजे तेवढा वेळ प्रज्वलित ठेवता येतो? असे करता येत असेल, तर जगातील इंधनाची समस्या कायमची सुटेल.

एक वेगळी गोष्ट आठवली. श्री रामकृष्ण परमहंसांना एक माणूस भेटायला आला होता. त्याने बरीच वर्षे हिमालयात योगसाधना करून पाण्यावर चालण्याची सिद्धी प्राप्त केली होती. त्यांना भेटल्यावर तो म्हणाला, "गंगेच्या या तीरावरून त्या तीरापर्यंत मी पाण्यावर चालून पलिकडे जाऊन दाखवतो.". आपली सिद्धी पाहून ते प्रभावित होतील असे त्याला वाटले. पण ते त्याला शांतपणे एवढेच म्हणाले, "तुझ्या या सिद्धीची किंमत फक्त २ आणे आहे. कोणताही नावाडी त्याच्या नावेतून केवळ २ आण्यात पलिकडे घेऊन जाईल." त्यांना काय म्हणायचे होते ते त्याला उमगले व त्याने सिद्धीचा नाद सोडून खर्‍या आध्यात्मिक ज्ञानाच्या मागे लागला.

तुमच्या वरील उदाहरणात जर मंत्रशक्तीने फक्त अग्नी प्रज्वलित करता येत असेल व नंतर तो प्रज्वलित ठेवण्यासाठी वेगळे इंधन लागत असेल, तर या मंत्रशक्तीची किंमत फक्त काड्यापेटीची एक काडी एवढीच आहे, कारण एकच काडी अग्नी प्रज्वलित करण्यासाठी पुरेल. पण जर मंत्रशक्तीने अग्नी अखंड प्रज्वलित ठेवता येत असेल, तर मात्र ती शक्ती अमूल्य आहे.

मास्तुरे ,तुम्ही एकदम पुरोगामी कसे झालात?
असो, पण तार्किक युक्तिवादही तुम्ही करता आहात पाहून आनंद झाला.

Proud

मकरंद,

आपण जे काही लिहिलेत त्या आपल्या भावना! माझ्या वडिलांनी स्वतः अनुभव घेतले आहेत आणि ते खोटे बोलत नाहीत हे मला माहीत आहे.

अवांतर प्रतिसादाबद्दल अक्षमस्व!

Pages