मेरा भारत महान (?)

Submitted by विशाल कुलकर्णी on 13 February, 2012 - 04:17

सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिलमें है..
सायमन गो बॅक, गो बॅक सायमन...
बडे बडे शहरोंमें ऐसी छोटी छोटी बातें...
एकही थप्पड मारा..................?
पेडर रोड फ्लायओव्हर झालाच पाहिजे...
माय..., कायतरी भाकरतुकडा आसंल तर वाढ गो माय....
We don't support FDI, Trunmul Congress
पश्चिम बंगालसाठी ८, ७५० कोटींचे पॅकेज
आयचा घो...
म्हशीचा पो...
डोक्याचं दही
पण विशल्या तू लिही...
कोणी वाचलं काय, आन नाय वाचलं काय...
पण लिही.........
लिहायला काय लागतं?
डोकं...? अजिबात नाही...
संवेदना?
छे..........., तिचा काय संबंध?
सामाजिक बांधीलकी......?
हुश्श... केवढा अवघड शब्द.........!
सगळा गोंधळ माजलाय नुसता
साला आमच्या बेसिकमध्येच लोचा आहे
लहानपणापासून आई बापाने शिकवलेलं..
शाळेतून रटून घेतलेलं...
भारत माझा देश आहे..
सारे भारतीय माझे बां.....
वर नेहमीचं तुणतुणं...
हम होंगे कामयाब...., हम होंगे कामयाब....
हम होंगे कामयाब... एक दिन.....
...
....
हमारी मांगे पुरी करो...
तुम्हारी कुर्सी खाली करो...
उपयोग काय?
खुर्ची रिकामी थोडीच राहणार...
वारसदार येणारच....
औरस असो वा अनौरस....
वंशाला दिवा असणारच?
सशक्त (?) लोकपाल बिल.., आजची गरज...(?)
भलते विमानप्रवास आणि तथाकथित विश्वासघात...
गांधीबाबाचा विजय असो...
अहिंसेच्या बैलाला होsssssssssssss..........
नवनव्या संकल्पना, बदलते संदर्भ,
बदलत्या व्याख्या
शब्दांचे खेळ...
नैतिकतेच्या उलट्या-पालट्या...
बदलणार्‍या निष्ठा...., भेडसावणार्‍या श्रद्धा...
आमचे दादा, तुमचे भाऊ....
सगळा मलिदा वाटून खाऊ...
कोकणचा कॅलिफोर्निया...
मुंबईचे शांघाय...
झालेच पाहीजे....
मुंबै भुमिपुत्रांची, उपर्‍यांची नै रे भाय...
युपीका आदमी महाराष्ट्रमें भीक मांगने कायकु जाताय?
पुतळा पार्कचा खर्च पाच हजार कोटींच्या वर....
दे टाळी..,
नाय तर....
बच्चोssssssss, बजाव ताली
जमुरे...
हा मालिक...
खेल दिखायेगा?
दिखायेगा ...
जमुरे, नाच करके दिखायेगा....
दिखायेगा ...
जमुरे..., पोटाला खाणार काय?
मंत्र्यांची आश्वासने, महागाईचे वाढते दर...
स्वप्नांच्या दुनियेला वाढते स्तर...
दुसरं काय?
च्यामायला.... सगळेच घोळ....
कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही...
हरकत नाय....
निवडणुका आल्या की युवराज आमच्या दारात...
अण्णा म्हणतात, ’आवाज द्या....! ’
'मातोश्री' म्हणतात 'आवाज कुणाचा? '
दादांचं म्हणणं 'पार्टी फोडो - माणुस जोडो'
नवनिर्माणाची तुतारी...
आणि खळ्ळ्.. खटॅक....!!
त्यात काय? हे असंच चालायचं.....
काय करायचं? कसं जगायचं? कसं उरायचं?
आम्ही रडायचं, स्वतःशीच कुढायचं...
भुकेच्या नावाखाली भुकेलाच दातांनी चावायचं...
ते म्हणणार...
देश आपला आहे?
आपली जबाबदारी (?)आपणच पार पाडायची....
मेरा रंग दे बसंती चोला...
माये sssss..., रंग दे बसंती चोला...sssss
त्याग हेच आपले कर्तव्य...
देशासाठी जगणार आणि देशासाठीच मरणार.... (? )
.......
....
अरे हा sss ड..., हा sss ड...,
साल्या, माझीच तंगडी सापडली का टांग वर करायला...?
साला.., पण काहीही म्हणा....
डॉन २ मधली PC म्हणते तेच खरं...
कुत्ता अपनी पुंछ सिधी भी करले, रहेगा तो कुत्ताही !
च्यायला.....
आमची नवी ओळख....
इलेक्ट्रिकचा खांब...
कुणीही यावे.. टांग वर करून जावे....
पण ते जाऊद्या,
चला म्हणा रे जोरात....
जिंदगी झाली वैराण, पण मेरा भारत महान!

इरसाल म्हमईकर

गुलमोहर: 

Happy

दिनेशदा +१
पण सद्ध्याच्या परिस्थिती बघता हा वैताग पण वांझोटाच राहील का काय अशी भिती वाटतेय. Sad

पण सद्ध्याच्या परिस्थिती बघता हा वैताग पण वांझोटाच राहील का काय अशी भिती वाटतेय.>>>>

कटु असले तरी तेच सत्य आहे गिरी.. Sad
आपला हा वैताग कायम वांझोटाच राहतो कारण आपण (यात मीही येतो) फक्त इथेच बडबड करतो. प्रत्यक्ष कृती करायची वेळ आली की आपल्याला शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यायला हवा असतो. हिच तर खरी शोकांतिका आहे Sad

आपला हा वैताग कायम वांझोटाच राहतो कारण आपण (यात मीही येतो) फक्त इथेच बडबड करतो. प्रत्यक्ष कृती करायची वेळ आली की आपल्याला शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यायला हवा असतो. हिच तर खरी शोकांतिका आहे अरेरे
खरे आहे, माझ्यासकट बर्‍याच जणांच्या बाबतीत. वैताग कमी होण्यासाठी मी कुठे चांगल्या बातम्या असतील तर त्या वाचतो फक्त, वाईट बातम्या कटाक्षाने टाळतो. त्यामुळे आजकाल बातम्या बघण्यात जास्त वेळ जात नाही. आपल्याला कृति करणे जमत नसेल तर निदान आपले मन तरी सांभाळावे.

उद्वेग, वैताग चांगला व्यक्त झालाय.

"वैताग कायम वांझोटाच राहतो" >>> असंच काही नाही. आशावाद सोडता कामा नये.
कुठल्याही गोष्टीला एक सीमा असतेच. त्यानंतर U टर्न असतो.
अधोगतीच्या अंतिम सीमेपर्यंत आपण जवळपास पोचलो आहोत.
त्यामुळे काही काळातच प्रगतीच्या दिशेने वाटचाल होण्याचा आशावाद बाळगायला हरकत नाही.

शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यायला हवा असतो. >>> दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे.
पण आपण निदान मावळे तर होऊ शकतो ना !

उद्वेग पोचला...

पण उल्हासकाका म्हणतात तसं....आशावाद सोडता कामा नये Happy

Happy