पण सांगायचे राहूनच गेले !

Submitted by वैशाली अ वर्तक on 22 December, 2011 - 01:09

निर्मला खूप बोलकी अगदी अवखळ वहात्या झ-या सारखी बोलणारी .एकदा बोलू लागली की
तिला काय सांगू किती बोलू असे व्हायचे .अशी बोलक्या स्वभावाची वा बडबडी .तिच्या समोरच्या व्यक्तीला नेहमी श्रोताच व्हावे लागते .
सहज एकदा, एकदा कसले?अनेकदा तिचे असे होते .मैत्रिणीला वाढदिवस निमित्य शुभेच्छा देण्यास फोन केला .फोन उचलला.झाले ! "काय ग काय म्हणतेस?बरेच दिवसात फोन नाही .नुसती म्हणतेस तुझी आठवण येते.पण कधी फोन करत नाहीस, का कधी येत नाहीस कोठे भेटू म्हंटले तर नाही असे उत्तर असते असे म्हणत तिने जे भाष्य (बोलणे) सुरु केले की , तिच्या सर्व मैत्रिणी, त्यांच्या सासू नातवंडांच्या. इव्हन शेजार पाजा-यांच्याबद्दल गप्पा झाल्या पण फोन ज्या कारणाने होता त्या बद्दल विषयच नाही .आणि मग गप्पा मारून फोन ठेवला मग , थोड्या वेळानंतर लक्षात आले की,अग बाई मी तिला फोन वाढ दिवसा निमित्य शुभेच्छा देण्यास केला होता . आणि ते तर मला सांगावयाचे राहूनच गेले ! मग काय पुह्ना पुह्ना फोन लावला पण मग मात्र तिचा फोन सतत एंगेज येत होता. कारण तिच्या सारखे तिच्या मैत्रिणीचे बरेच well wishers होते ना.
कित्येकदा असे होते, सांगायचे असते ते राहूनच जाते. हो! त्या " कुंकुं" सिरीअल मध्ये नाही का ? जानकीला खूप काही सांगायचं असते पण सांगणे सुरुवात करे पर्यंत वेळ जातो .तिच्या आईची तब्बेत ठीक नाही. तिला पैशांची गरज आहे. हे ती नव-यास कधी ची सांगतच आहे पण हो ! त्यामुळेच तर सिरीअल लांबते ना! .व आपणास मनोरंजन मिळते . तेह्वा अशा व्यक्ति असतात की मूळ मुद्यावर येता येत नाही .मग मनात हूर हूरत बसतात
तशीच एक वेडी प्रेयसी . प्रेमात वेडी झालेली म्हणून वेडी बर का ! . प्रियकराला रोज भेटत होती .मला तू आवडतोस म्हणून सांगावयाचे रोज नक्की करावयाची , पण रोजच सांगावयाचे राहून जायचे. घरी येऊन मनाशी म्हणायची , इश्य बाई ! आज पण नाही जमले. सांगायचे राहूनच गेले .प्रियकर गावीं जाण्यास निघाला . ती स्टेशनवर सोडावयास गेली .तेथे आता तरी पटकन बोलावे ना ? पण छे ,शेवटीं गाडीची सुटण्याची वेळ झाली सिग्नल मिळाला ,गाडी हलणार शेवटी हातवारे करून डम शो मध्ये करतात तसे करून I love you दाखविले . ठीक झाले .प्रियकरास भावना पोहचल्या .तो म्हणाला हा! हा! भावना पोहचल्या . म्हणून ठीक झाले .तेह्वा पण तोंडाने सांगावयाचे राहूनच गेले !
आपण मंदिरात जातो. तेथे पण असेच होते .देवाजवळ काय काय मागावयाचे ते नक्की करतो. हो! देवच तर हक्काचा आहेना ! ज्याच्या जवळ सर्व मागण्या आपण मागू शकतो. व कुणास पण ऐकू न येता मनातील इच्छा प्रगट करू शकतो .पण भक्तिभावाने हात जोडून डोळे मिटून, देवाजवळ मागावयास जावे, तेवढ्यात " ए चला पुढे व्हा ,गर्दी करू नका म्हणून पुजारी ओरडतो. व देवा जवळ पण सांगावयाचे राहूनच जाते ."
असो माझ्या सारखे बाकीच्या सख्यांना सांगते, तुह्मास पण काही सांगावयाचे असेल ते सांगून द्या .नाही तर मग मनात हूर हूर राहील की पण........ सांगावयाचे राहूनच गेले !

गुलमोहर: