लिखाण

Submitted by पक्वाग्रज on 21 February, 2011 - 09:41

आजकाल काही लिहाव
असा खरच काही सुचत नाही
लिहिल्या शिवाय साला खरच
मन शांत बसत नाही

लिहिता लिहिता लिहितोय
पण मूड काही जमत नाही
उगाच लिहिण्यात काय अर्थ
पण बात काही बनत नाही

असच लिहिणं मुळात
माझ्या स्वभावालाच पटत नाही
bore काहीतरी लिहून पकवल्या शिवाय
दिवस मात्र सरत नाही

आता बस कि पुढे लिहू
ह्याचा उत्तर काही मिळत नाही
काय मिळणार लिहून, खरच
हे माझे मलाच कळत नाही

......!!!

!..!..!..!..!..!..!..!..!..!..!

ऊ:शाप दिलाय वत्सा, आता जिवंत हो.......... !..!..!..!..!..!..!..!

जशी आज्ञा महाराज ..........!...! पन नक्की मला काही कल्ल नाही बुवा........