कशी विसरेन मी...
तू पहिल्यांदा आलास तो क्षण न क्षण आठवतोय मला
तुझ्या येण्याचा वेग नि त्यानंतरचा आवेग...
कशी विसरेन रे मी...
तू यायचास, भेटायचास, बोलायचास भरभरुन
नि तुझ्या प्रेमाने मला टाकायचास गुदमरुन
तुझ्या बरोबर प्रत्येक क्षण जो मी जगले
फक्त मोहरले, वेडावले, नादावले
नि मग एक दिवस तुझ्याबरोबर वहावले......
तू निघून गेलास.....
तू निघून गेलास.. मला देऊन एक रात्र
माझ्याशीच मूक संवाद साधत होत माझं प्रत्येक गात्र
सोबत कसलीशी वेदना एक....
वेदनेतही सुख असत म्हणतात ते हेच का?
महिन्यांमागून महिने तुझं येणं नि जाणं
नि तू गेल्यावर माझं त्या सुखद वेदना कुरवाळणं
वाटायच असच आयुष्यभर मिळाव हे देणं
पण...... पण.......
एक दिवस तू नेहमीचच देणं देऊन गेलास
पण ते सुखद नव्हतं रे..
माझ्या मनावर, तनावर नि प्रत्येक क्षणाक्षणावर
उठले होते चरे, ओरखाडे..
आयुष्यभर न पुसता येणारे, न मिटणारे
कुरुप व्रण मागे ठेवणारे..
ते तसेच राहिले नि आता...
आता राहिल्या आहेत त्या फक्त आठवणी
नको असताना हव्याहव्याशा वाटणार्या..
हव्या असतानाच नकोशा वाटणार्या...
चांगली आहे
चांगली आहे
कवितेल काही कळत नाही मला.. पण
कवितेल काही कळत नाही मला..
पण छान वाटली...
मला पण आवडली.. आता राहिल्या
मला पण आवडली..
आता राहिल्या आहेत त्या फक्त आठवणी
नको असताना हव्याहव्याशा वाटणार्या..
हव्या असतानाच नकोशा वाटणार्या... >> खासच
नको असताना हव्याहव्याशा
नको असताना हव्याहव्याशा वाटणार्या..
हव्या असतानाच नकोशा वाटणार्या..
आवडली !!!
प्रतिसादकर्त्यांचे आभार
प्रतिसादकर्त्यांचे आभार
आवडली
आवडली
धन्यवाद आरती
धन्यवाद आरती