Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
निरुपयोगी "संघ"टना?! ...

Hitguj » Views and Comments » General » निरुपयोगी "संघ"टना?! « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 08, 200720 03-09-07  3:59 am
Archive through March 16, 200720 03-16-07  11:51 am
Archive through April 09, 200720 04-09-07  5:03 am

Mahesh
Monday, April 09, 2007 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई कुठे गायबले आहेत बराच काळ ?

Nandini2911
Monday, April 09, 2007 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असतील.. नंदीग्रामच्या आसपास कुठेतरी असतील... येतील परत.. तिथलं काम संपवलं,,, आता पुढचं टारगेट रायगड आहे म्हणे..

Satishmadhekar
Monday, April 09, 2007 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पश्चिम बंगालच्या बाहेरच्या राज्यात SEZ स्थापन करण्यामागे आणि नंदिग्राममधल्या SEZ ला विरोध करण्यामागे कसे संघाचे जातीयवादी कार्यकर्ते आहेत, हे सिद्ध करणारे लेख, ते "सोनियासत्ता", "सोनियामत", "सोनियन एक्सप्रेस", "हिंदू", "हिंदुस्थान टाईम्स" अशांसारख्या कॉंग्रेसी आणि कम्युनिस्टांच्या मुखपत्रामध्ये शोधत असतील. :-)

Peshawa
Monday, April 09, 2007 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अता नाही तोंड दाखवणार लालभाइ. आले तर खुप जोडे पडतील इथे नंदिग्रम्वरून इतक लालतेल बुद्धिला समजत त्यांच्या :-P . जरा कळ काधा वातावरण निवळल की लगेच हजर होतील दुस्र्याला शिकवायला. दिवा घ्या लालभाइ तुमच्या विचरसरणि सकट तुमच्या पक्षाच भवितव्य अंधारातच आहे गरज लागेल ;-)

Chyayla
Monday, April 09, 2007 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वडाची साल वान्ग्याला लावायचा प्रकार

आयला... पिम्पळाएवजी वान्गे कुठुन आले मधेच? कदाचित "वडाच तेल वान्ग्यावर" या म्हणीची सरमिसळ झालेली होती असे वाटतय... असो पण मित्रान्नो आशय लक्षात आला त्यातच समाधान.

विषयान्तराबद्दल क्षमस्व.



Samuvai
Monday, April 16, 2007 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाईंच्या लिखाणातील सगळ्यात विनोदी (खोटारडी तर सगळिच आहेत!) विधान कुठल हे शोधत होतो. ऊत्तरे उतरत्या विनोदी भाजणीत्:

डॉ. हेडगेवार हे ब्राह्मण तरुणांना खुले आव्हान देत की स्वातंत्र्य चळवळीपेक्षा तुम्ही संघाच्या कार्यात सहभागी व्हा, तुमचा कौटुंबिक खर्च संघ चालवेल. (आर्थिक आमिष?)

डाॅ हेडगेवार स्वत: जहाल आणि मवाळ ह्या दोन्ही स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते. स्वातंत्र्य लढे का फ़सतात ह्याचा बारकाईने अभ्यास करतना त्यांई हिंदू समाजमनाचे विष्लेषण केले. मलमपट्ट्यांमध्ये वेळ घालवण्यापेक्शा मूळ दुखणे काय हे त्या द्रष्ट्या वैद्याने अचूक ओळखले. मूळ दुखणे होते हिंदुंची "आत्मविस्म्रुती". आणि तरीही त्यांनी स्वात,न्त्र्यलढ्या"ऐवजी" संघकार्य करायचे आवाहन केले हा "लाल" खोटेपणा! रहाता राहीला प्रश्न आर्थिक आमिषाचा. जर डोळे उघडून कोणी माहीतीचा स.घप्रचारक पाहीलात तर तो लाखो रुपयांच्या नोकरीवर पाणी सोडुन प्रचारक होतो. (उदा. पुण्याचा सौमित्र गोखले. canada तून M.S. पूर्ण केल्या केल्या प्रचारक निघाला. रुप, गुण, ऐश्वर्य हात जोडून उभे होते तरीही.) संघानी कोणाचाही उदरनिर्वाह चालवल्याचा माझ्या ऐकिवात नाही. आणखी एक "लाल" "अभ्यासू" थाप!

२. लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी अशी अनेक कॉंग्रेसींनी संघाचा यथोचित सन्मान केलेला आहे. - सुधीर जोगळेकर.

ईंदिरा गांधींच्या घटनाबाह्य हूकूमशाहीने अनेक देशभक्तांची कुटुंब नेस्तनाबूत केली. तरीही ई.दिरा गांधीच्या सगळ्या देशहिताच्या निर्णयांना संघाने पाठींबा दिला (उदा. पाकिस्तानचे विभाजन). ईतकेच नव्हे तर ऊघड स्तुती केली.

३. गांधीहत्येतून संघाची बिनशर्त मुक्तका झाली. सुधीर जोगळेकर.
पुन्हा, विरोधकांबद्दल केवळ द्वेष बाळगणार्‍या संघाने "आम्हाला अडकवले" ह्याच गोष्टीचा कांगावा केला, करत आहेत. तत्कालिन सरकारला काय गरज होती, संघाला शुद्धीपत्र देण्याची? तरीही तसे केले गेले! "आजचा" संघ हे विसरला आहे काय, हे संघिष्टांनीच तपासून पहावे.

समाजातील सज्जन, निस्वार्थी, देशभक्त नागरिकांना छळल्यावर लोक आपल्याला मते नाही जोडे देतील ही चाहूल काॅग्रेसला लागली होती. म्हणुन मग "शुद्धीपत्राची" नाटक!

६. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संघाने कधीही आपले मानले नाही. आंबेडकरांनी जे मोठे धर्मांतर केले, त्यावर संघाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. सदानंद मोरे.

मी प्रांत बौद्धिक प्रमुख (त्या वेळचे) प्रा. अनिरुद्ध देशपांड्याचे विधान देतो:
"बाबासाहेबांनी ईतक्या मानहानीनंतरही ह्याच मातीत रुजलेला धर्म स्विकारला हे त्यांचे अखिल हिंदू समाजावरचे कायमचे ऊपकार आहेत."

७. इशान्येकडची राज्ये, संघाचे कार्य आणि कांगावा -

ईशान्येकडे ख्रिश्चनीकरणाचे षडयंत्र ब्रिटीश शासनापासून चालू आहे. नेहमीप्रमाणे लालभाईंनी ह्याचे कारण "गरीबी" वगैरे दाखवले आहे ते धादांत खोटे आहे. आणि उद्या "गरीबी दूर करतो" फक्त एवढा " union jack " परत लाल किल्ल्यावर लावा अस जर कोणी सांगितल तर आपल्याला ते मान्य असेल का? ईशान्येकडे सरकारचे अक्शम्य दुर्लक्श झाले हे तर वादातीत. पण म्हणुन तो भाग मिशनर्यांच्या मदतीने लाल माकडांच्या घशात घालावा काय? संघाने ह्या षडयंत्राला विरोध करत प्राणपणाने लढा दिलाय. प्रमोद नारायण दिक्षितांसारखे तरुण देशभक्त बळी पडलेत. अजूनही चीन जेव्हा "अरुणाचल आमचा" म्हणतो तेव्हा ही लाल माकड बलिदान सोडा पण विरोधाचा शब्द तरी काढतात काय?


Aaspaas
Sunday, April 22, 2007 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतक्या वाईट पध्दतीने एखाद्याबद्द्ल बोलणे हे आपल्याला शोभत नाही. काहीही असले तरी आपण चर्चा करतो आहोत, प्रत्येकाची वेगळी मते असू शकतात. त्यामुळे विषयाला धरून लिहावे असे वाटते. चर्चा व्यक्तिकेंद्रित नको.
लालभाई नंदीग्रामला गेलेत नाही गेलेत माहीत नाही, पण त्यांचे पुढचे टारगेट असे शब्द वापरू नयेत. इथे कोणी देश विरोधी कारवाया करत नाही किंवा कोणाचे वाईट चिंतत नाही. जे विरोधी लढत आहेत तेही बरोबर आणि जे समर्थनार्थ असतात तेही तेवढेच बरोबर. कारण यातूनच समतोल राखण्यास मदत होते. अन्यथा सगळेच एकतर्फी होईल.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators