कृषी कायदे रद्द!

Submitted by बहिष्क्रृत समाज on 19 November, 2021 - 07:46

शेतकरी आंदोलन आता थांबवतील, आणि नापसंत कृषी कायदे मागे घेतले म्हणून घरी जाऊन कदाचित दिवाळी साजरी करतील. आणि आपलं रोजचं आयुष्य जगतील.
पण दलित मजदुर ज्यांनी शेतकरी आंदोलनात भाग घेतला होता, भावनिक होऊन शेतमजूर असुनही तिथे त्या शेतकऱ्या सोबत ठिय्या दिला आंदोलनात त्यांना मात्र आंदोलन आटोपून घरी जाणं तेवढ्या आंनदाचं राहणार नाही. रोज परत जातीवादी जगणं तिथं चुकणार नाही जे ग्रामीण, शहरी भागात आहे.
असे किती आंदोलने झाले भारतीय स्वातंत्र्या पासुन ते भारत चीन, भारत पाकिस्तान विरूद्ध लढाईत एकतेचे हाक देणारे, तसेच आणीबाणी ते भ्रष्टाचार विरूद्ध, सोबत शेतकरी, कामगार मजुर वर्गांचे आणि यात काही आंदोलन सुपर सक्सेस ही झालीत. पण या आंदोलनाच्या यशाने दलित आदिवासी जीवणात काय फरक पडला ? यांचा जातीय सोस किती कमी झाला ? दैनंदिन जीवणात जातीय घृणेची तीव्रता किती कमी झाली ? हे सगळे दुर्लक्षित विषय राहिले, आणि ठेवले गेले. तिकडे अमेरिकेत वीर दास ख्रिश्चन मुस्लिम शीख मिळुन असलेल्या १९ कोटी लोकांचा हिंदू सोबत युनिटी म्हणून उल्लेख करतो पण ३०-३५ कोटी लोकसंख्या असलेल्या दलित आदिवासी व त्यांच्या जातीय शोषणाबद्दल उल्लेख ही करत नाही.

न्यायाला उशीर एकप्रकारे न्याय नाकारनेच असतो त्याच अनुषंगाने मुळ शोषण व हे शोषण लपवणारी प्रवृत्ती एकच नाही का ?
पण इथे कोणाला झाटभर फरक पडत नाही. इथे एका रात्रीत कोणतंही आंदोलन यशस्वी होऊ शकतं व कुणीही त्यात
हिरो बनु शकतो फक्त जातीव्यवस्था एवढ्या विषयावर त्याने तोंड उघडु नये बस्स.

Group content visibility: 
Use group defaults

कृषी कायदे का रद्द झाले ? तब्बल एक वर्ष आंदोलन चालले त्याबद्दल पण विचार मांडा.

कोण कुठली रेहाना, आणि चिमुकली ग्रेटा... पण भारतातले लाखो शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असतांना त्यांच्या न्याय्य आंदोलनाला मानवी दृष्टीकोनातून पाठबळ देण्यासाठी दोन ओळी ट्विट करतात. अगदी छोटीशी कृती पण जगांत मानवता शिल्लक असल्याची ग्वाही देतो.
कोट्यावधी भारतीयांनी त्यांच्या या कृतीला थम्स अप केले.

समस्त भारतवासीयांचा आणि भारतातल्या रत्नांचा कसोटीचा काळ होता हा...

<< ३०-३५ कोटी लोकसंख्या असलेल्या दलित आदिवासी व त्यांच्या जातीय शोषणाबद्दल उल्लेख ही करत नाही. >>
-------- असे शोषण होणे (अजुनही होत आहे ) वाईट आहे. शिक्षणाचे फायदे अजूनही तळागाळा पर्यंत पोहोचलेले नाहीत. अनेक प्रकारचे अडथळे आणि उदासिनता आहे. पण हे थांबणार कधी, कसे? नुसता उल्लेख केला तर प्रश्न सुटणार नाही, सामान्यांनी काही करण्यासारखा उपाय असेल तर जरुर लिहा.

इथे दसऱ्याला शेतीची औजारे पुजली जातात तर पोळ्याला बैल ! पण शेतमजूर सोडुन. शेतमजुराचं मोल काय ठरलं इथे ? मुक्या प्राण्यांची, निर्जीव औजारांची कदर करणारा शेतकरी शेतमजुराला साफ विसरतो. शेतकरी हा भोळा भाबडा असतो हा समज आहे. तो खरंच भाबडा असता तर जमिनीची मालकी शेकडो वर्षांपासून कशी टिकवली ? हमी भावासाठी आक्रमक होणारा शेतकरी मात्र सामाजिक अत्याचार अन्याय प्रसंगात आक्रमक झालेला दिसत नाही. जातीय शोषणाविरुद्ध लढ्यात येत नाही, त्या आंदोलनाचा भाग होत नाही. ज्यांना आपला class interest वर्गहितसंबंध कळतात व ते टिकवतात त्यांना भाबडं म्हणणं खरंच भाबडेपणा ठरतो.

इथे दसऱ्याला शेतीची औजारे पुजली जातात तर पोळ्याला बैल ! पण शेतमजूर सोडुन. शेतमजुराचं मोल काय ठरलं इथे ? मुक्या प्राण्यांची, निर्जीव औजारांची कदर करणारा शेतकरी शेतमजुराला साफ विसरतो. शेतकरी हा भोळा भाबडा असतो हा समज आहे. तो खरंच भाबडा असता तर जमिनीची मालकी शेकडो वर्षांपासून कशी टिकवली ? हमी भावासाठी आक्रमक होणारा शेतकरी मात्र सामाजिक अत्याचार अन्याय प्रसंगात आक्रमक झालेला दिसत नाही. जातीय शोषणाविरुद्ध लढ्यात येत नाही, त्या आंदोलनाचा भाग होत नाही. ज्यांना आपला class interest वर्गहितसंबंध कळतात व ते टिकवतात त्यांना भाबडं म्हणणं खरंच भाबडेपणा ठरतो.

इथे दसऱ्याला शेतीची औजारे पुजली जातात तर पोळ्याला बैल ! पण शेतमजूर सोडुन. शेतमजुराचं मोल काय ठरलं इथे ? मुक्या प्राण्यांची, निर्जीव औजारांची कदर करणारा शेतकरी शेतमजुराला साफ विसरतो. शेतकरी हा भोळा भाबडा असतो हा समज आहे. तो खरंच भाबडा असता तर जमिनीची मालकी शेकडो वर्षांपासून कशी टिकवली ? हमी भावासाठी आक्रमक होणारा शेतकरी मात्र सामाजिक अत्याचार अन्याय प्रसंगात आक्रमक झालेला दिसत नाही. जातीय शोषणाविरुद्ध लढ्यात येत नाही, त्या आंदोलनाचा भाग होत नाही. ज्यांना आपला class interest वर्गहितसंबंध कळतात व ते टिकवतात त्यांना भाबडं म्हणणं खरंच भाबडेपणा ठरतो.

इथे दसऱ्याला शेतीची औजारे पुजली जातात तर पोळ्याला बैल ! पण शेतमजूर सोडुन. शेतमजुराचं मोल काय ठरलं इथे ? मुक्या प्राण्यांची, निर्जीव औजारांची कदर करणारा शेतकरी शेतमजुराला साफ विसरतो. शेतकरी हा भोळा भाबडा असतो हा समज आहे. तो खरंच भाबडा असता तर जमिनीची मालकी शेकडो वर्षांपासून कशी टिकवली ? हमी भावासाठी आक्रमक होणारा शेतकरी मात्र सामाजिक अत्याचार अन्याय प्रसंगात आक्रमक झालेला दिसत नाही. जातीय शोषणाविरुद्ध लढ्यात येत नाही, त्या आंदोलनाचा भाग होत नाही. ज्यांना आपला class interest वर्गहितसंबंध कळतात व ते टिकवतात त्यांना भाबडं म्हणणं खरंच भाबडेपणा ठरतो.

नक्की काय म्हणायचे आहे?
शेतकरी हा पण जातीत च विभागाला आहे.
सर्व जातीचे लोक शेतकरी आहेत.
मग शेतकरी कोणता तरी वेगळा वर्ग आहे असा सूर का लावला आहे.
शेतमजूर विषयी बोललं तर शेतमजूर मिळत नाहीत त्यांचा तुटवडा आहे मजुरी ठरवण्या मध्ये मजुरांचे पारडे जड आहे.
जमीनदार,वतनदार होते तेव्हा शेतमजुराचा प्रश्न होता.
जसे सिनेमा मध्ये दाखवतात तसे.

बहिष्क्रृत समाज
सदस्य झाल्यापासूनचा कालावधी
6 वर्ष 2 months
या काळात कुठेच प्रतिसाद नाही. काही लिहीलेले नाही. विचारपूस नाही. चाहते नाहीत. आवडते नाहीत. काही आवडल्याची नोंद नाही.

ड्युआयडी समजण्यासारखे आहे. पण तोतयेगिरी असेल तर ?
मूळ धाग्यातला मजकूर हा फेसबुकवरच्या तीन चार वॉलवरून चोरलेला आहे. तर प्रतिसादातला मजकूर हा अन्य काही वॉल्सवरून चोरला आहे.
बहीष्कृत असे नाव देऊन आपण एका विशिष्ट वगाचे आहोत असा देखावा करत इथले स्कोअर सेटल करत अन्य कुणाच्या नावाने बिल फाडण्यासाठी हा अवतार घेतलेला नाही ना ?
तुमचे काय उद्देश असतील ते असोत.
तुम्ही खरे असाल तर मनापासून माफी.

नगरी शेतकर्‍याची आठवण येईल असं लिखाण वाटतंय हे... धाग्यावर वैनीही कुठे दिसत नाहीत. सूज्ञास सांगणे न लगे.

येस.
म्हणजे इथपर्यंत मजल गेली तरी .खलिस्तानी,अतिरेकी,फुकटे सर्व काही ठरवून झाले आता फक्त जातीयवादी ठरवले की सर्कल पूर्ण.
आणि पाप दुसऱ्याच्या डोक्यावर.
आपण आपले निराळे.
जब्राट डोकं आहे.

नगरी शेतकर्‍याची आठवण येईल असं लिखाण वाटतंय हे... धाग्यावर वैनीही कुठे दिसत नाहीत. सूज्ञास सांगणे न लगे.>>>> कोण सुज्ञ? तुम्हीच
स्वःताच स्वतःला म्हणवुन घेताय हे कळल्याने फार आनंद झाला, इतका की मी पेढेचKesar_Peda.jpg वाटले लोकांना. म्हणले चला कोणीतरी सुदन्य सापडला मायबोलीला. Proud

इथे दसऱ्याला शेतीची औजारे पुजली जातात तर पोळ्याला बैल ! पण शेतमजूर सोडुन. शेतमजुराचं मोल काय ठरलं इथे ?

Proud

अंबानी पेट्रोप पंपाच्या कामगारांचे पाय धुवून शनिवारी नारळ फोडतो की काय!

मोदीजीनी 5 झाडूवाल्यांची पूजा केली होती. काय झाले पुढे ?

बहुतांशी वेळेला पूजा ही पापाचे क्षालन म्हणूनही करतात . उदा वास्तुशांत ( घर बांधताना प्राणी , झाडे मेले ) बैलपोळा ( बाकी वर्षभर राबवा) स्त्रीला 9 दिवस पूजणे( बाकी वर्षभर ?) , बलिप्रतिपदा ( कपट केल्याची खंत ) इ इ इ

वर्षभरच सन्मान दिला तर वेगळ्या दिवसाची गरज नसते

पेढे भारीच आणलेत हो वैनी..!

बहुतांशी वेळेला पूजा ही पापाचे क्षालन म्हणूनही करतात . उदा वास्तुशांत ( घर बांधताना प्राणी , झाडे मेले ) बैलपोळा ( बाकी वर्षभर राबवा) स्त्रीला 9 दिवस पूजणे , बलिप्रतिपदा इ इ इ>> कपट कारस्थाने रयतेच्या राजाला मारले म्हणून अनाजी पंतुकड्यांचे मन खाऊ लागले त्यासाठी शास्त्र मार्ग काढून कडुलिंबाची पाने ओरबाडून आधी तोंड कडू करून नंतर रयतेच्या राजाचे प्राण गेले या आनंदाप्रित्यर्थ पुरणपोळ्या ओरपयाला त्यांनी गुढीपाडवा सुरू केला.

मोदीचे पेढे नसतात भारी.. कधी गेलाच साताऱ्याला तर लाटकर कंदी पेढे घेत जा. मोदी वाला कंदीच्या नावाखाली काहीही खाऊ घालतो.

>>मोदीचे पेढे नसतात भारी

हाय कंबख्त तुने पीही नही!!
अशोक मोदीचे मोती चौकातल्या दुकानातले ट्राय करा.... एक नंबर पेढा आणि आंबा बर्फी!!