नरेंद्र मोदी सरकारचे १०० दिवस - आपले विचार?

Submitted by रांचो on 3 September, 2014 - 06:59

२६ मे ला मोदींचा शपथविधी झाला. तो दिवस ह्या सरकारचा पहिला दिवस मानला तर आज ३ सप्टेंबर रोजी ह्या सरकारचा १०१ वा दिवस आहे. कोणीही, काहीही न सांगता मोदींनी १०० दिवसांची मुदत स्वतःच्या सरकारला घालुन घेवुन १०० दिवसांसाठी एक अजेंडा निश्चीत केला होता. त्यांच्या सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यकाळाचे मुल्यांकन विविध प्रसारमाध्यमात एव्हांना सुरु झालेले आहेच. मे महिन्याच्या अखेरी आलेल्या विविध वर्तमानपत्रातील बातम्यांच्या आधारे तो अजेंडा आपल्या संदर्भासाठी खाली देतो आहे. ह्या अजेंडयाच्या आधारे आपल्या लाडक्या मा. बो. वरही त्याविषयी साधक बाधक चर्चा व्हावी, ह्या हेतुने हा धागा उधडत आहे. चर्चा विषयाला धरुन आणि मायबोलीच्या अडमीननी जाहीर केलेल्या नवीन धोरणानुसार होइल अशी अपेक्षा करतो. माझे विचार चर्चेच्या ओघात मांडेनच.

प्रसारमाध्यमात आलेला मोदी सरकारचा १०० दिवसांचा अजेंडा:
१. उत्तम आंतर-मंत्रालयीन समन्वय. (Better inter-ministerial coordination.)
२. नोकरशाहीचा आत्मविश्वास पुन:प्रस्थापीत करणे. (Restoring the confidence of bureaucrats.)
३. सरकारी कामात नाविन्यपूर्ण कल्पनांचे स्वागत करणे. (ative ideas to be welcomed.)
४. सरकारी कामात पारदर्शकता आणणे. (Transparency in government.)
५. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते विकासावरती लक्ष केंद्रीत करणे. (Focus on education, health, water, energy and roads.)
६. लिलाव आणि इतर सरकारी संबंधित कामासाठी ई लिलावअस प्रोत्साहन देणे. (E-auction to be promoted for auction and other government related work.)
७. सरकारी धोरणामध्ये स्थिरता आणि सातत्य राखणे. (Stability and and sustainability in government policy.)
८. ठरावीक वेळेत धोरणांची अंमलबजावणी करणे. (Implementation of policy in time bound manner.)
९. जनकेंद्रीत सरकारी प्रणाली राबवणे. (People oriented system to be put in place.)
१०. तंत्रज्ञान आणि सामाजिक-माध्यमांचा वापर करुन सार्वजनिक सुसंवाद वाढवणे. (Use of technology and social media to maximise public interaction)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मोदी सरकारने कामे पूर्ण करयला सुरवात केलिय.....
आणि काँग्रेस ने ही कामे आम्ही सुरु केलि होति पण पूर्ण करायला अपयशी झालो हे ओरडुन ओरडुन कबुल करायला सुरवात केलीय.. Lol

खरे तर सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात फरक पडेल अश्या गोष्टी सहसा इतक्या वरच्या पातळीला होतच नाहीत. तरीही काही नवीन निर्णय, नवीन घोषणा वगैरे स्तुत्य वाटल्या. कोणत्याही कारणाने नेमके पेट्रोलचे भाव ह्याच दरम्यान उतरले हेही एक लक्षात राहिले.

पण आता (मायबोलीवरीलसुद्धा) विरोधक म्हणतात त्याप्रमाणे ज्या कारणासाठी काँग्रेसचा अपप्रचार केला जात होता त्यांच्याबाबत कोणतीही ठोस कृती करणे सहज शक्य नसते हे अगदी नीट समजून येत असावे नव्या सरकारला! असो, निवडून येण्यापुरता ज्या घोषणांचा आणि मुद्यांचा वापर केला ते सगळे तिथेच सोडायचे म्हंटले तर जनता कधीतरी पुन्हा इंगा दाखवेलच.

बाकी आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर फारच जास्त फोकस असावा असे वाटत राहिले ह्या सरकारचा! चांगले की वाईट हे आकलनापलीकडीलच आहे, पण फोकस खूप जास्त वाटतो इतके नक्की!

जाता जाता - मुखदुर्बळ आणि कठपुतळी पंतप्रधानांच्या तुलनेत एक खमक्या पंतप्रधान मिळाला आहे इतपत भावना नक्कीच जनमानसांत निर्माण करण्यात यश मिळवलेले आहे ह्या सरकारने!

जयहिंद!

जाता जाता - मुखदुर्बळ आणि कठपुतळी पंतप्रधानांच्या तुलनेत एक खमक्या पंतप्रधान मिळाला आहे इतपत भावना नक्कीच जनमानसांत निर्माण करण्यात यश मिळवलेले आहे ह्या सरकारने!

>>>
एकदम सहमत
आजच्या सकाळ मध्ये सोनिया आणि मनमोहन यांच्या संवाद (विनोदी लेखन) वाचन्याजोगे आहे.

@अग्निपंख : पॉप कॉर्न खात दंग्याची वाट पहात बसण्यापेक्षा आपले विचार मांडावेत, हि विनंती.

@बेफिकीरः योग्य बोललात. शंभर दिवसामध्ये कोणत्याच सरकारला फार भरीव अशी कामगिरी करता येत नसते कारण आपल्या देशातली सरकारी यंत्रणा खुपच मंद गतीने चालणारी आहे आणि आपल्याकडे लोकशाही राज्यपद्धती असल्यामुळे कोणताही निर्णय घेण्याची प्रक्रिया ही प्रचंड वेळखाऊ असते. यामुळे एखादी समस्या जाणवणे/खटकणे, त्या समस्येचा रितसर अभ्यास होवुन एखाद्या निर्णयाप्रत येणे आणि प्रत्यक्षात तसा सरकारी आदेश निघणे यामध्ये १०० दिवस सहज निघून जातात. आणखी एक ठळक जाणवणारी गोष्ट म्हणजे, देशात गेल्या पाच-सात वर्षापासून सरकारी पातळीवर दिसून येणारा धोरण लकवा निश्‍चितच संपत आहे. रोज नविन उच्चांक गाठणारा सेंसेक्स हा त्याचाच परीणाम आहे.

@संमि: गांधी आणि बुद्ध हे राष्ट्र् विभुती आहेत. भारतीय पंतप्रधान त्यांच्यापुढे नतमस्तक होणे याचा तिरकस उल्लेख धागा भरकवटेल. क्रुपया चर्चेत मौलीकभर घालावी, हि नम्र विनंती.

- सार्क देशांच्या प्रमुखांना शपथविधीला आमंत्रण
- अमेरिकेची दाढी न कुरुवाळणं
- जपानचा दौरा करुन चिन/पाकिस्तानला स्टर्न मेसेज

हे काहि परराष्ट्रधोरण संदर्भातले मास्टर्स स्ट्रोक...

रांचो म्हणाल्याप्रमणे १०० दिवस खुपच कमी आहेत मोठे बदल घडवण्यासाठी.
परवाच्या लोकसत्तेमधल्या लेखात ह्या १०० दिवसांच्या संकल्पनेचा उगम समजला. दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेत जेव्हा सत्तापालट झाला आणि तेव्हा तेथे विरोधी पक्ष व सत्तारुढ पक्ष ह्यांनी एकत्र येऊन देशाच्या हितासाठी पटापट निर्णय घेतले आणि झटपट कृती साठी एक आदर्श घालुन दिला. आत्त्ताच्या परिस्थितीत, विषेशतः भारतात, तसे काही होणे अशक्य वाटते.
पण स्वतःलाच असे माईलस्टोन (मराठी प्रतिशब्द सुचत नाहिये) घालुन घेणे आणि त्यावर झालेली प्रगती सर्वांसमोर ठेवणे ही न.मों ची कृती अतिशय स्वागतार्ह आहे. राज्य पातळीवरील सरकारांनी पण असे करावे.

न. मों च्या सरकारने, मुद्दे १ ते ५ व ९,१० वर कामं सुरु केल्याचं वाटत आहे. मुद्दे ६ ते ८ बद्दल काही केलेलं माझ्या तरी वाचनात आलेलं नाही.

आणि आता च पुर्ण केलेला जपान दौरा.. त्या बाहुल्या आणि बाहुल्या खेळवनार्‍या त्या बाइ पेक्शा तरि छान काम केल.

मागच्या दहा वर्षात दौरे हे फक्त पिकनीक होते..

१०० दिवस खुप कमी असले मुल्यमापनासाठी तरी निवडणुकीदरम्यान जी आशा जागवलेली त्याची थोडीफार पुर्तता होईल असा आशावाद या १०० दिवसांनी नक्कीच निर्माण केला.

खमक्या पंतप्रधान मिळाल्याबद्दल सहमत. आधीचा पंतप्रधान हा इतर मंत्र्यांच्या गर्दीतला एक मंत्री वाटायच, बॉस कोणी भलताच होता. नवा पंतप्रधान मंत्रीमंडळाचा बॉस आहे हे त्याच्या देहबोलीवरुन जाणवत राहते. सुरवातीला तो देश कसा चालवेल याबद्दल मला खुप शंका होती कारण केवळ निगेटीव गोष्टीच वाचलेल्या. पण आता ती शंका उरली नाही.

आरोग्य खात्याबद्दल एक स्तुत्य निर्णय झालेला आहे.

एड्स टीबी असे कार्यक्रम नॅकोसारख्या निमसरकारी संस्थेकडुन होत होते.
नॅको बरखास्त झालेली आहे.

सगळे कार्यक्रम आता सारवजनिक आरोग्य खात्यात येतेल.

आमचे लोक म्हणतात.. आता पगार वाढतील. आता तरी मोदीना माना. म्या म्हटलं परमनंट मोदीने केले तरी आमचं मत हातालाच.

सातीतै, एस एम ओ होणार का ?

संसदेत भरभक्कम बहुमत तरीही उरल्यासुरल्या विरोधी आणि मित्रपक्षांची मुस्कटदाबी, प्रसारमाध्यमे खिशात (उदा. ते कोणी निखील वागळे होते त्यांचे काय झाले?), कॉलेजियम नष्ट करुन न्यायसंस्थेवरही पकड आणि नोकरशाही तर कायमच सत्ताधिशांची गुलामी करायला तत्पर- १०० दिवसात लोकशाहीच्या सगळ्या नाड्या आवळणारा पुरुषसिंह हाच!

घर-नातलग -आप्तवगैरे मिळून डझनभर लोक राज्य-केंद्र प्रशासनात आहेत . कळायला लागल्यापासून २०१४पर्यंत ठराविक लोक होते (मधला पॅच सोडला तर)
२०१४ नंतर नवीन लोक आले. काहीच बदल नाही .
पूर्वीचे लोक आता आत जातील असं सांगितलं गेलं पण ते काही झालं नाही
पूर्वी जेवढ्या पेट्या-खोके ज्या ऍड्रेसवर जायच्या त्यात काही बदल नाही फक्त त्यावरची नाव बदललीत
पूर्वी पुण्या -मुंबईत ठराविक ठिकाणी बदली व्हायला जी बोली लागायची त्यातपण काही बदल नाही झाला
सर्व गोष्टींचे पूर्वीचे रेटकार्ड आणि चालू रेटकार्ड तेच आहे फक्त त्यात चलनवाढ- महागाईभत्ता लागू झालाय
पूर्वी चांगल्या लोकांना जसे ट्रॅप करायचे तसे अजूनही करतात
पूर्वी जे किमयागार अधिकारी होते , नवीन काळात पण तेच किमयेसाठी वापरले जातात
पूर्वी पत्रकार जसे पाकिटे घ्यायची तशी अजूनही घेतात
न्यायालयात सोयीने पॅनेलची अडजस्टमेन्ट पूर्वी जशी व्हायची तशी अजूनही होतात
ठराविक पोस्टला ठराविक ठिकाणी जशी पूर्वी टार्गेट दिली जायची तशी आजही आहेत
ती टार्गेट पूर्ण करायला जे मार्ग वापरले जायचे ते आजही वापरले जातात
पुण्यामुंबईत प्रत्येकाचे ठराविक बिल्डर पाळलेले होते ते आजही तेच आहेत
महापालिकेत कंत्राट पूर्वी ज्यांना भेटायचे अजूनही त्यांनाच भेटतात
बिल्डरला एका नवीन स्कीम मध्ये जे पूर्वी वाटावं लागायचं अजूनही तेच आहे
म्हाडा - नगरविकास खात पूर्वी जस चालवलं जायचं अजूनही तसंच आहे
मंत्रालयात दोन-चार दलाल लोक समांतर महसूल प्रशासन चालवतात त्यात काही बदल नाही
मुंबई एकच शेटजी चालवतात , त्यातपण काही बदल नाही
मंत्रालयातील धोरणे ठराविक अमराठी बिल्डर ठरवतात , त्यात पण काही बदल नाही
नागपूरच्या सिल्क -पार्कला एक मुंबईतील वजनदार बिल्डर रसद पुरवतात त्यात पण काही बदल नाही झाला अजून, हा त्या बिल्डरच्या परीस्थित मात्र फार फरक झालाय . एवढा कि तो आता नवीन मुंबईच तयार करतोय.... . हा एवढा मोठा कसा झाला ? कोणत्या गचकलेल्या नेत्याचं धन याला मिळालं होत ?

फरक कुठे झाला -
लाठी घेऊन फिरणारे आता पाच वर्षात ५००-१००० खोक्याचे मालक झालेत

समृद्धी मार्गात नेमकं काय चाललंय हे किती लोकांना माहितेय ?
सिंचन घोटाळ्यात नेमकं काय चाललंय हे किती लोकांना माहितेय ?
बँक कर्ज प्रकरणात नेमकं काय चाललंय हे किती लोकांना माहितेय ?
कंत्राट वाटपात नेमकं काय चाललंय हे किती लोकांना माहितेय ?
मुंबईतील रस्ते एवढे पैसे ओतून नीट का होत नाहीत ?
२०१४ च्या तथाकथित अपघातात नेमकं काय झालं हे किती लोकांना माहितेय ?
लोया प्रकरणात नेमकं काय झालं हे किती लोकांना माहितेय ?
रत्नाकर गुट्टे- राज्य शिखर सहकारी बँक - मेहता - देशमुख यांच्या कर्जप्रकरणात नेमकं काय झालं हे किती लोकांना माहितेय ?
रिलायन्स जिओ साठी देशभर फायबर टाकायचं काम एवढ्या पटकन कस केलं गेलं हे किती लोकांना माहितेय ?
जिओ इतकी पटकन मोठी कशी झाली ?
मोठ्या कर्जबुडव्यांची यादी रिजर्व बँक का जाहीर करत नाही ?
दिवाळखोरी कायदा नेमका काय आहे ?
भावाने भावाला स्वस्तात कसं सोडवलं ?
मोठी लोक कधी दीर्घकाळ तुरुंगात का जात नाहीत ?
दिल्लीच्या उपहार जळीत कांडात अन्सल बिल्डर बंधु वयाचा आधार घेत सुटले पण संजय दत्तच्या केसमध्ये त्या मुस्लिम म्हाताऱ्याला मात्र जन्मठेप झाली , असं का झालं ?
असे शंभर मुद्दे आहेत पण आता हेच ध्यानात आहेत
वरील प्रत्येक मुद्याचे नाव-गाव- आकडेमोडी सकट स्पष्टीकरण देता येईल पण मला माझी - माझ्या लोकांची काळजी आहे
ह्या गोष्टी भरपूर लोकांना माहित आहेत पण जिवाच्या भितीनी सगळे गप्प आहेत . तसे ते पूर्वीच्या काळात पण गप्पच असायचे

सामान्य लोकांनी वेगवेगळ्या मार्गानी आपल्या भोवती बनवलेल्या मायाजालातून बाहेर या. कोणत्याही पक्षाचा मतदानासाठी विचार करताना हे ध्यानात असुद्या कारण हे सगळे सारखेच आहेत . सांख्यिकी आकडेमोड आणि फालतू स्कीम यांचा विचार न करता ग्राउंड लेवल वर काय बदल झाला हे पाहूनच मत द्या . आपल्या आजूबाजूला काही बदल जाणवत नसेल तर सरळ नोटा चा पर्याय वापरा. हे ऍडमिन ला आक्षेपार्ह्य वाटत असेल तर माझं खात डिलीट करायची जुनी ऑफर खुली आहे .

india-pak solution, honest administration, zero poverty and pure air-water for everyone ---- these were , are and will be always wicked games for india

जिद्दु ,

आपल्या आजूबाजूला काही बदल जाणवत नसेल तर सरळ नोटा चा पर्याय वापरा.

हे ( नोटाचा पर्याय ) आताच आलेल आहे का अगोदर पण होता ?

नोटाचा पर्याय घेतल्याने नेमके काय होईल ?

समजा एखाच्या मतदार संघातुन ९०% मतदान करणार्या लोकांनी नोटा वापरल तर ?
फारतर पुर्ण मतदान बाद होईल ! खरतर नोटा मुळे मतदान बाद ठरत का नाही ह्याची कल्पना नाही !!
समजा मतदान बाद झाल तर त्या मतदानावर केलेला खर्च (करदात्याचे पैसे) वाया जाईल,

पुन्हाने मतदान घेण्यात येईल, ( पुन्हा कर दात्याला भुर्दंड ! )

पण ह्या वेळेला नोटा न वापरण्यासारखे उमेदवार अचानक निवडणुकीत येणार आहेत का ?
समजा नविन उमेदवार आलेच तर पुर्वी सारखेच ( २०१४ पुर्वी होत असे त्या प्रमाणे) त्याला रस्त्यावरुन बाजुला सारल जाईल.

उत्तराच्या अपेक्षेत !

तुमचे मुद्दे योग्य आहेत . मी आजपर्यंत कधी नोटा वापरलं नाही परंतु निवडणुकीपर्यंत योग्य तो साधक बाधक विचार करून ठरवेल . आमच्या इथले नेहमीचे सर्व उमेदवार कर्मदरिद्री आहेत त्यामुळे एखादा चांगला वाटणारा अपक्ष उमेदवार जो खरच काहीतरी करेल निवडून आल्यावर असं ज्याबद्दल वाटेल असा त्याला मत देईल . कोणीच योग्य न वाटल्यास मी नोटाच वापरणार . री-इलेक्शन, करदात्याच्या पैशांचा चुराडा या गोष्टी मला दळभद्री उमेदवारांपुढे गौण वाटतात.
नोटा पर्याय का वापरावा किंवा का वापरू नये याच कोणी माझ्यासारख्या सीमित राजकीय-सामाजिक समज असणाऱ्या तरुण उमेदवारांना मार्गदर्शन केल्यास माझा निर्णय मी नक्की बदलेल

आता शेवटचे 100 दिवस

रत्नाकर गुत्तेने मनमोहनसिंगवर सिनेमा काढला होता

वरील प्रत्येक मुद्याचे नाव-गाव- आकडेमोडी सकट स्पष्टीकरण देता येईल पण मला माझी - माझ्या लोकांची काळजी आहे
ह्या गोष्टी भरपूर लोकांना माहित आहेत पण जिवाच्या भितीनी सगळे गप्प आहेत . तसे ते पूर्वीच्या काळात पण गप्पच असायचे >>>

काही वैध प्रश्न ज्यांची उत्तरे सोपी आहेत (उदा. जिओ इतकी पटकन मोठी कशी झाली ? मोठ्या कर्जबुडव्यांची यादी रिजर्व बँक का जाहीर करत नाही ? मुंबईतील रस्ते एवढे पैसे ओतून नीट का होत नाहीत ? ) असे प्रश्न सामील करून जे कॉन्स्पिरसी थिअरी ची उत्सुकता वाढवतात अशा प्रश्नाची जंत्री पुढे ढकलण्याचा हा प्रयत्न आहे.

मुख्य म्हणजे कुठल्याही चांगल्या गोष्टी झाल्याच नाहीत हे सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेलेला आहे

म्हणजे, तिथे लांब काहीतरी आहे, जे मला माहित आहे, पण मी तुम्हाला सांगणार नाही. पण मला वाटत म्हणून तुम्हीहि त्याला वाईटच समजा.. असा हा एकूण प्रकार आहे.

भाट ना भक्त , मी तर मजा बघतोय फक्त

सगळे सारखेच आहेत हे सांगतोय मी .
यात कॉन्स्पिरसि चा विषयच नाही कारण ह्या उजळ फॅक्टस आहेत

हे हे हे.. तुम्ही कोन्ग्रेस बद्दल खोटे खोटे वाईट सांगा हे लगेच विश्वास ठेवतील.. भाजप बद्दल खरे खरे वाईट सांगा शंभर प्रश्न विचारतील... ह्या लोकांना असे खेळ करून झुलावण्याचा मी बराच आनंद घेतला आहे.

या सरकारचे शेवटचे १०० दिवस असा धागा नसल्याने मी या धाग्यात प्रतिसाद लिहिला. थोडक्यात कोणतंही सरकार आलं तरी मुळात व्यवस्थाच खराब आहे हे मी सांगतोय. त्या सर्व गोष्टी जगजाहीर आहेत. मी अजूनपर्यंत मायबोलीवर कोणत्याही पक्षाचा विरोध किंवा समर्थन केलेलं नाहीए . आता उद्या सरकार बदललं तर कोण लोक पक्ष बदलून नवीन पक्षात जातील त्याची पण यादी मी निवडणूक निकालानंतर देईल इथेच येऊन.

बाकी गेल्या महिन्यात एका कुटुंबाची एक आख्खी पिढीचं राजकारणात शिरली अचानक... . त्या सर्व मुलांना मी लांबून ओळखतो. आजपर्यंत ज्यांचं उभं आयुष्य मुंबईतील पेज३ वर्तुळात सप्ततारांकित पार्ट्या झोडण्यात गेलं ते एका महिन्यात लोकसेवक झालेत. या पार्ट्यात काय काय चालत हे सांगितलं तर यांचेच कार्यकर्ते चक्कर येउन पडतील. यांचा महाराष्ट्र बांद्रा-कफ परेड- जुहू - अंधेरी याच्या पर्यंतच मर्यादित आहेत . हीच गोष्ट मुंबईतील वाघछाप कुटुंबाच्या पोरांची. शून्य कर्तृत्व आणि शून्य जनसंपर्क असणारे लोक आता आमदार -खासदार होणार . उद्या वाघछाप युवानेते मुख्यमंत्री झाले तर नवल नको वाटायला... वाईट त्या कार्यकर्त्यांचं वाटतंय.
इकडं नगरला पंजाछाप उमेदवार जे स्वतःच्या नावापुढे चेंडुरोगतज्ञ्(पेड सीट) लावतात त्यांच तर अवघडच झालाय. याचे पिताश्री पंजाछाप ब्रँडचे कर्णधार आहेत. पण आता घड्याळ त्यांना जागा देत नसल्याने ते मी अपक्ष लढणार असं म्हणतायेत. पण अपक्ष जिंकून येन त्यांना हयातीत शक्य नसल्याने ते लोटसछाप ब्रँडमध्ये जाणार. यावर पिताश्रीना विचारलं तर ते म्हणतात आमच्या घरात खरी लोकशाही आहे. उद्या हे निवडून आले तर हे पिताश्री कुठं जाणार हे सगळ्यांना कळालं आहे. लोटसवाले तर त्यांच्यासाठी देव पाण्यात घालून बसलेत. पण भानामतीच्या पोरांपेक्षा यांचं मोठा फरक म्हणजे त्यांनी लवकर लोकसेवक होण्याची तयारी चालू केली. रोज गल्लोगल्ली ओल्या पार्ट्या चालू आहेत . रोज एक नवीन गणंग कलाकार (त्यात अभिनेत्री जास्त )तिथे हजेरी लावतात. आणि त्यांचा लोकसंपर्क बरा असल्याने लोक निदान त्याच तोंड पाहून ओळखतात तरी . हो ... यांच्या सप्ततारांकित पार्ट्या मुंबईत न होता नगर-इंदूर ला व्हायच्या. बऱ्याच जणींच त्यांनी कल्याण केलय. घरच कॉलेज असल्याने देशभरातील रसमलई आस्वादायला मिळायची. असो जास्त खोल नको जायला.

या लोटस-पंजापेक्षा देशाला जास्त धोका मीडियापासून आहे. यांच्यापेक्षा वारांगना जास्त सत्शील असतील. मी तर आता ह्या वर्षभर टीव्हीवर बातम्या पाहायचंच सोडणार आहे. उगाच डोकं खराब होत. त्यापेक्षा राज्यसभा टीव्ही पाहायचा. बेस्ट आहे. आरडाओरड नाही काही फालतुगिरी नसते . चांगले खरेखुरे विद्वान शांतपणे चर्चा करतात. फक्त हे चॅनेल सरकारी आहे हे ध्यानात राहील पाहिजे.

अतिरेकि तळांवर हल्ला केल्यावर पाकिस्तान्ला कोणत्याहि देशाने समर्थन केले नाहि, हि परदेश निती आवडली.
नवीन Submitted by विजय देशमुख on 1 March, 2019 - 20:04
--

जगातील दुसर्‍या कोणत्याही देशाने पाकिस्तानचे समर्थन केले नसले तरी भारतातील पाकप्रेमी विरोधीपक्षांनी पाकिस्तानचे समर्थन केले आहे. व ह्या हल्ल्याचे पुरावे देखील मागितले आहेत.

मोदी सरकार को बड़ा झटका! इलेक्टोरल बॉन्ड के जरिये राजनीतिक दलों को गुप्त चंदा देने वालों के नाम करने होंगे सार्वजनिक, CIC ने सुनाया फैसला
https://www.jansatta.com/national/central-information-commission-says-go...

Manmohan Sigh with mute button. Need to talk when fanatics from his party do things which are not any different from fanatics his party keep complaining about. JNU attack is clear terror spreading anti-democratic act. It does not matter if you support or appose JNU students.

ABVP loses all seats in Sanskrit University of Varanasi
The student wing of the Congress, the National Students' Union of India (NSUI) registered a victory on all the four seats in the students' union elections in Sampurnanand Sanskrit Vishwavidyalaya in Varanasi.

ए बी व्ही पी संस्कृत महाविद्यालये अर्धचंद्रम मिळती

Manmohan Sigh with mute button. Need to talk when fanatics from his party do things which are not any different from fanatics his party keep complaining about. JNU attack is clear terror spreading anti-democratic act. It does not matter if you support or appose JNU students.
>>> यात काँग्रेसचा हात आहे हे कुठे साबित झालं का? की अमित शाह चावला ?

>>> यात काँग्रेसचा हात आहे हे कुठे साबित झालं का? की अमित शाह चावला ? >>>

यात अभाविप किंवा भाजपचा हात आहे हे कुठे साबित झालं का? की पप्पू चावला?

वास्तव संघर्ष आॅनलाईन -भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉ . जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा बेडा जंगम जातीचा अनुसूचित जातीचा दाखला बनावट असल्याचा अहवाल सोलापूरच्या जात पडताळणी समितीने दिला आहे . याप्रकरणी समितीने खासदार डॉ . जयसिद्धेश्वर महास्वामी यांना नोटीस बजावली असून , येत्या शनिवारपर्यंत ता . १८ त्यांना म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे . या प्रक्रियेतून जातीचा दाखला बनावट असल्याचे अंतिमत : सिद्ध झाल्याने डॉ . जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे सदस्यत्व रद्द होवून लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होवू शकते . अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत खासदार डॉ . जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे भारतीय जनता पार्टी कडून विजयी झाले आहेत . खासदार महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रबद्दल प्रमोद गायकवाड , मिलिंद मुळे व विनायक कंदकुरे यांनी तक्रार केली होती . या तक्रारीनुसार जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर केला आहे .

प्रमोद गायकवाड , मिलिंद मुळे व विनायक कंदकुरे यांनी नुरंदस्वामी गुरुबसय्या हिरमठ ऊर्फ खासदार डॉ . जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार करत याबाबतचे पुरावे ही दिले होते . या सखोल पुराव्याच्या आधारे समितीने चौकशी केली असता लिंगायत हा पंथ असून अनुसूचित जाती पैकी नाही . बेडा जंगम ही जात लिंगायत पंथ समूहातील नसून वेगळी असल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले .

http://vastavsangharsh.in/?p=5983&fbclid=IwAR0P-_Kju8-KROaYfPtRG3JUDnWq5...

https://lokmat.news18.com/national/viral-photo-of-the-wife-of-martyr-of-...

पुलवामा हल्ल्यातील शहिदाच्या पत्नीवर आली भाजी विकण्याची वेळ, कुटुंबीय मदतीपासून अद्यापही वंचित
झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील शहीद जवान विजय सोरेंग यांचे कुटुंबीय देखील सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शुक्रवारी या भ्याड हल्ल्याच्या वर्षपूर्ती दिवशीच शहीद विजय सोरेंग यांच्या पत्नीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सरदार पटेल पुतळा भ्रष्टाचार

Rs 5 Crore From Statue Of Unity Ticket Sales Allegedly Siphoned Off: Cops
Some staffers of the agency allegedly did not deposit Rs 5,24,77,375 into the bank accounts of the Statue of Unity authorities, Deputy Superintendent of Police Vani Dudhat said.

https://www.ndtv.com/india-news/over-rs-5-crore-from-statue-of-unity-tic...

मोदी सरकारने गरिबांना पदमश्री दिली , शिनेमावाळ्याना नाही म्हणून भक्ताडे नमोनमो नाचत आहेत

एकता कपूर , करण जोहर , कंगना आणि अदनान सामी हे काय बाबा आमटेंच्या आश्रमातील लोक आहेत की काय ?

अरुण जेटली पण आहेत त्यात. गेल्यावर्षीच्या १२० का किती जणांच्या यादीतले २०-२२ निवडून यंदाची यादी फिरवताहेत. त्यांचा कलेक्टिव्ह आयक्यू इंडिव्हिज्युअल आयक्यूच्या काही पट खाली आहे. हे लिहिल्याबद्दल माझा आयडी उडू शकतो.

ओह असे आहे का भरत. मलाही व्हाट्स अप वर आलेली . कौतुकही वाटलेलं की सामान्य लोकांना प्रतिनिधित्व मिळतेय म्हणून. तुमच्या पोस्टने खरे काय ते कळले