Submitted by @गजानन बाठे on 10 October, 2019 - 09:31
उठाव
झोपडीत माझ्या नव्हता दिवा,
गर्द अंधारी खचलो नाही.l
लाख होती छिद्रे छताला,
ज्योत तेवती विझली नाही.
भय,संशय,भूत येवूनी गेले,
माणसास मी डरलो नाही.
झालेत उठाव बंडखोर मनाचे,
तहास कधी मी झुकलो नाही
गमावण्यास ही नव्हते काही
म्हणून कदाचित हरलो नाही.
कटात काजवे सामील काही,
वार झेलले पण मिटलो नाही.
©गजानन बाठे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाह! Hats off... आवडली तुमची
वाह! Hats off... आवडली तुमची कविता.
धन्यवाद मन्या जी..... तुमच्या
धन्यवाद मन्या जी..... तुमच्या प्रतिसादाबद्दल.
गजानन,फक्त मन्या म्हणालात तरी
गजानन,फक्त मन्या म्हणालात तरी पुरे. ते 'जी' तेवढं लावु नका.