प्रलय-२६ते३०

Submitted by शुभम् on 5 October, 2019 - 05:09

प्रलय २६-३०
प्रलय-२६

देवव्रत त्रिशूळ घेऊन जलधि सैन्य तळावरती आला होता . आल्या आल्या महाराज कैरवांनी त्याला बोलावलं .
" युवराज असं मुर्खासारखं काळा महालातील त्रिशुळ आणायला जाणं तुम्हाला शोभत का ...? जलधि राज्याचे बारावे महाराज आहात तुम्ही , आणि तुम्हीच असे मूर्खपणाचे निर्णय घ्यायला लागल्यावर ती संपूर्ण राज्यानं काय करावं ......."
" पण बाबा मी जर गेलो नसतो तर आपलं म्हणायला राज्याच राहिलं नसतं . सारी जनता त्रिशुळ सैनिक बनून आपल्यापुढे उभा होती . काळी भिंत पडणार नव्हती त्यामुळे मला हातावरती हात ठेवून बसणे नको वाटलं . म्हणूनच मी त्रिशूळ आणायला निघालो . तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही कधीच जाऊ दिलं नसतं . म्हणूनच गपचूप निघालो आणि महत्त्वाचं म्हणजे त्रिशुळ आला आहे . आता आपली माणसे परत आणुया....
महाराज केरवानी राज महर्षींना बोलून ईश्वर त्यांच्या स्वाधीन केला की शिवसैनिकांना माणसात आणण्याची तयारी चालू झाली......

बारावे अग्नेय महाराज तरुण होते . वयाची तीस वर्षे देखील पूर्ण झाली नव्हती . त्यांनीच तंत्रज्ञ मंदार , म्हातारा मांत्रिक आयुष्यमान व त्या दोन बुटक्यांचे राजमहालात स्वागत केले .
" काय आश्चर्य तंत्रज्ञ मंदार , मांत्रिक आणि सुरूकुचालक स्वतः उडत्या बेटावरती .....? आम्ही तुमचे कोणत्या प्रकारे आदरातिथ्य करू ....।.
" महाराज प्रलयकारिका जन्मली आहे , हे तर तुम्हाला माहीतच असेल. प्रलयकारीकेला थांबवण्यात यश आलेलं नाही . तीन बहिणीकडून काही मदत मिळेल या अपेक्षेने त्यांच्या शोधार्थ या ठिकाणी आलोय ..."
तंत्रज्ञ मंदार म्हणाला ....
" तुम्हाला वाटतंय का की त्या तीन बहिणी उडत्या बेटांवरती असतील...
" या शिवाय इतकी प्रशस्त समृद्ध आणि सर्वकाही उपलब्ध असणारी जागा दुसरीकडे थोडीच आहे.....
तो म्हातारा मांत्रिक म्हणाला
" पण तुम्ही त्यांना शोधणार कसे ...? त्यांची इच्छा असल्याशिवाय त्या कोणालाही सापडत नाहीत हे तर सर्वज्ञात आहे..... महाराज
" पण प्रयत्न तर करावा लागणारच पहिले हा फार गंभीर विषय आहे हे तर त्यांनाही माहीत आहे .....
तो तंत्रज्ञ बोलला . त्याच वेळी एक सैनिक आत आला . महारजांकडे पाहत बोलू कि नको म्हणत उभारला . महाराजांनी नथरेनचं विचारलं , तेव्हा बोलला...
" जलदी राज्याच्या कैरव महाराजांचा एक दूत आपले दर्शन मागत आहे...
" चला तर मग तुमचा शोधायला शुभेच्छा आणि महाराज निघून गेले
" मला कोणीतरी सांगेल का की या तीन बहिणी कोण आहेत आणि त्यांच्या शोध कशासाठी घ्यायचा आहे ....." आयुष्यमान वैतागून म्हणाला...

" त्या तिघी नसत्या तर मानवजातीचे भविष्य काहीतरी वेगळं असतं . पहिल प्रलय थांबवण्यात या तिघींचा मोठा वाटा आहे. त्यांच्या मदतीविना तो परिपूर्ण जागृत झाला असता आणि मानव जमात काही वेगळ्याच दुनियेत असली असती..... तंत्रज्ञ मदार बोलून गेला .

महाराज आग्नेयांपुढे तो दूत उभा होता व त्याच्या हातातील पत्रा वाचत होता ...
" मागच्या प्रलयापासून अग्नेया यांनी या जगताशी संपर्क तोडला. सर्व काही त्यांनी स्वतःच्या स्वतः उत्पादन करायला सुरुवात केली . सर्व गोष्टी निर्माण केल्या . या जगात गोष्ट आहे व ती उडत्या बेटांवरती नाही असे होत नाही . या घडीला अतिशय सुख समृद्धीने युक्त असलेले राज्य म्हणजे अग्नेय .
मात्र पुन्हा एकदा प्रलयकारिकेचा जन्म झाला आहे . मारुतांच्या पुजार्‍याने हे सारे षड्यंत्र मांडले आहे . तो स्वतःचं राज्य निर्माण करू इच्छित आहे त्यासाठी प्रलयकारी केला तो शास्त्र म्हणून वापरत आहे . पण प्रलय हा कोणाच्या अंकुश खाली राहत नाही हे तो विसरला आहे . काही क्षणांचा अवधी आहे आता प्रलयाच्या जागृतीला....
तुम्ही पलय जागृत करण्यासाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट कडेकोट सुरक्षेत इतकी वर्षे सांभाळली आहे . मात्र प्रलयकारीकेला काहीच अशक्य नाही . जर तिला नष्ट करावयाचे असेल तर बाराव्या पिढीने एकत्र यायलाच हवं. त्यासाठी बैठकीचं हे निमंत्रण पाठवत आहोत.....
पुढेही बऱ्याच गोष्टी त्या दूताने वाचून दाखवल्या व नंतर तो निघून गेला . महाराज अग्नेय अग्नी कक्षात गेले . एक ज्वाला प्रकाशित झाली व आवाज येऊ लागला...
" सध्यातरी प्रलयकारिका त्या भैरवच्या ताब्यात आहे पण फार काळ राहणार नाही . कैरव महाराजांनी रास्त सुचवलेलं आहे . बाराव्या पिढीने एकत्र यायलाच हवं . पण बारावीला पिढीचा मारुत राजा मारुतांमधे नाही . त्यांना वाटत आहे तो मृत आहे . मात्र बाराव्या पिढीचा राजा जंगलातील लोकांचा प्रमुख झालाय .... त्याला आम्ही बोलू . तू जाण्याच्या तयारीला लाग..."

रुद्राला सकाळी जाग आली . त्याचं डोकं भयंकर दुखत होतं . झोप नीट लागली नव्हती . रात्री झालेला फारसं काही आठवत नव्हतं . एवढंच माहीत होतं की तो मीराच्या कुशीत रडला होता . सारेच लोक आज उशिरा उठले होते . रात्रीच्या उत्सवाचा पसारा आजूबाजूला पडलेला होता . मोकळ्या हवेसाठी आणि अंघोळीसाठी तो तलावाकडे निघाला . वाटेत मीरा परत येताना दिसली .
" मीरा.... मीरा.... रुद्रा तिला पहात म्हणाला .... त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती तशीच पुढे चालत राहीली . तिला थांबवण्यासाठी त्याने तिचा हात धरून ओढला....
" सोड मला..... त्याच्या हातातून हात सोडून घेत तिने रुद्राच्या कानशिलात भडकावून दिली ... " परत हात लावलास तर याद राख....
" काय झालं तरी काय .....?"
रुद्रा काही न समजून बोलला
" वा रे वा ... मलाच विचार अजून काय झालं... अगोदरपासूनच असा होतास का ....? एवढं काही बोलला आणि परत घाण केली सगळी....
" काय बोलतेस तरी काय ...? काय घाण केली मी..."
" तुझा तूच आठव काय घाण केली काल रात्री .....
आणि ती निघून गेली . रुद्राला आता अधिकच प्रश्न पडले . काल रात्री नशेत काही केलं का आपण ? तसे अजून एकदाही त्याने नशेत काही उलटेसुलटे केले नव्हते . मग काल रात्री त्यानं काय केलं असावं ...? पटकन सारे काही आवरुण तो माघारी वळला . त्याच्या कक्षात आल्यावर त्याचा सेवक त्याची खोली व्यवस्थित करताना दिसला.
" अरे काल रात्री काय झालं ...? मी काय केलं सांगशील का.....?
त्यानं सारेकाही सांगितलं त्यात काही वेगळं नव्हतंच. फक्त शेवटी म्हणाला
" आणि काल रात्री खोलीत कोणीतरी होतं तुमच्या झोपायला , मिराबाई साहेब सोडून....
आता त्याला कळलं मीरा एवढी का भडकली होती तो मीरा समजून दुसऱ्याच बाईसोबत झोपला होता....
प्रलय-२७
त्या तीन माया होत्या . म्हटल्यातर तीन होत्या . म्हटल्यातर एक होत्या . एक माया तीन प्रकारची किंवा तीन माया एक प्रकारच्या . एकाच वेळी तिघींचा जन्म झाला होता . तीन बहिणी भलत्याच प्रसिद्ध होत्या . त्यांची माया कोणालाही मोहित करणारी होती . ते सुंदर रूप . तो महाल . महालातील प्रत्येक गोष्टीला त्यांचा मायावी स्पर्श होता . साक्षात भगवंताला ही त्यांच्या मायेचा हेवा वाटतो असे म्हणतात . त्या तिघींचा संवाद चालला होता .
पहिली माया
" प्रत्येक राजाकडून बीज आलेलं आवश्यक होतं प्रत्येकीने आणलंय ना....."
" हो मी मारूत राजाकडून . मारुतांचा राजा खरा प्रमुख आहे जंगली लोकांचा . एका जंगली स्त्रीचं रूप घ्यावे लागले मला . ....." दुसरी माया
" जलधिच्या राजकुमाराची आवड आणि निवड छान आहे . साधारण मानव आहे ती , मात्र सौंदर्य अगदी ओसंडून भरलय तिच्यात . रक्षक राज्याची राजकुमारी झाली होते मी , देवाव्रतासोबत....." तिसरी माया
" अरे फारच आनंदी दिसतेस तू..... दुसरी माया
" अरे जुन्या आठवणी जाग्या केल्या त्याने . मला खूप आवडला तो . मी बक्षीस म्हणून त्याला घ्यावं म्हणते...." तिसरी माया
" काहीही बोलू नकोस , मुर्खासारखं.... पहिली माया
" हो हो मला माहित आहे . म्हणूनच त्याला खुश करण्यासाठी काळ्या महालातील त्रिशूळ आणून दिला . त्याला हे सारं कळल्यावर स्वखुषीने येईल माझ्याकडे....... तिसरी माया
" आमच्या दोघीच सोड , तू आग्नेयेकडून जाऊन आले का नाही.... दुसरी माया
" हो माझंही काम झाले आता आपल्याकडे तिन्ही राज्यांची बिजे आहेत . आता फक्त योग्य वेळेची वाट पाहायची आहे... पहिली माया
" तंत्रज्ञ मंदार , म्हातारा मांत्रिक , आणि सुरूकुचालक आपल्याला शोधायला आलेले आहेत . त्यांना सांगायला हवा ..... दुसरी माया

तंत्रज्ञ मंदार , तो म्हातारा मांत्रिक , आयुष्यमान नि ते दोन बुटके अचानक त्या मायावी महालांमध्ये बोलवले गेले . त्या तीन मायावतींनी त्यांना भेटण्यासाठी बोलवलं होतं . तो महाल काय आलिशान होता . आग्नेय राजांच्या महाला पेक्षाही त्याची भव्यता दिव्य होती . समोर रत्नखचित सुवर्ण मंडित आसणे होती . त्यावर ती त्या तिघीही बसल्या होत्या .
" प्रलयकारिकेचा जन्म झाला आहे . सुरुकुचालक तिला थांबवू शकला नाही आणि तुम्हा दोघांनाही ते शक्य नाही . म्हणून तुम्ही आमच्या कडे आलात ....
देवव्रताला त्रिशुळ , देणारी तिसरी माया म्हणाली...
" तू गप्प बस ग..... दुसरी माया म्हणाली ....
" तिला अजून थोडा मोठा बोलण्याचा अनुभव नाही तुमचं येण्याचं कारण आम्हाला ज्ञात आहे , तुम्हाला अजूनही काही सांगायचं आहे का .......
" काही नाही . प्रलय थांबवण्यासाठी आम्ही काही तुमची मदत करू शकतो का.... तंत्रज्ञ म्हणाला ...
" आमची पद्धत फक्त आम्हालाच माहित आहे . फक्त आम्हीच कार्यान्वित करू शकतो . तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न करा . योग्य वेळ आली की आम्ही कार्यवाही करू.... पहिली माया
आणि पुन्हा एकदा ते सारे महला बाहेर फेकले गेले.....

जेव्हा रुद्राला काल रात्री भलताच घोळ घातला , त्यावेळेस त्याची अवस्था फार विचित्र झाली होती . त्याला अजूनही आठवत होतं कि ती मीराच होती , पण त्याला कळालं होतं की ती मीरा नव्हती . मीरा सारखी दिसणारी दुसरी कोणती तरी येऊन त्याच्यासोबत हा खेळ खेळून गेली होती.
" स्वतःवरती शिव कर्ण बंद कर या जगासमोर अनेक मोठे प्रश्न आहेत आणि केव्हाही जागृत होऊ शकतो त्याला थांबवण्यासाठी तुझी गरज आहे या जगाला ......
अचानक खोलीतून आवाज येऊ लागला . आग्नेयांचे पूर्वज मारुतांच्या राजाला बोलवण्यासाठी आले होते...
" जास्त काळजी करू नकोस आम्ही काही शत्रू नाही ना मित्र आहोत गरज आहे मार्गांच्या खऱ्या वारसाची म्हणून तुझ्याकडे आलोय.......
त्यांनं आजूबाजूला पाहत आवाज कुठून येते बघायचा प्रयत्न केला , पण त्याला कळालं नाही . पुन्हा एकदा मारूतांचे नाव ऐकताच रुद्राच्या तळपायाची आग मस्तकाला गेली . त्याने तिथेच असलेल्या एका एक पाण्याने भरलेला जग उचलून जोरात फेकला .
" कितीही आदळआपट केली तरी सत्य काही बदलणार नाही . तु मारूत होतास , मारुत आहेस आणि मारूत राहणार आहेस . तू मारूतांचा खरा बारावा राजा आहेस....
" मारुतांचा नि माझा संबंध केव्हाच संपला आहे . सगळे मारूत मला मृतासमान समान आहेत . मारुत माझ्यासाठी तेव्हाच मेले त्यावेळी न केलेल्या गुन्ह्यासाठी त्यांनी माझ्या आईला शिक्षा दिली . नंतर मलाही त्यांनी बहिष्कृत केलं.......
" तरीही तू त्यांना मदत केलीस ना . ज्या लोकांनी तुला साथ दिली त्यांना धोका दिलास ना.....
" तिथेच चुकलो मी . मला वाटलं ते घर आहे। आरुषी मुळे मी जरा गाफील झालो . पण आता मला माझं खरं घर आणि माझं खरं कुटुंब कुठे आहे हे चांगलेच समजलेला आहे..... आणि जोपर्यंत हे माझं घर आणि हे माझं कुटुंब सुरक्षित आहे तोपर्यंत मला बाहेरच्या जगाची अजिबात काळजी नाही . एकदा फसलो होतो आता पुन्हा फसणार नाही . मी मारूत नाही . मी या जंगलातील रहिवाशी आहे आणि हे जंगलच माझं घर आहे . बाहेरचं जग जळून खाक झाला तरी चालेल जोपर्यंत हे जंगल व माझी लोक सुरक्षित आहेत तोपर्यंत मला बाकीची काळजी नाही.....

जलधि राज्याचे राजमहार्षी व इतर जाणकार लोकांनी तो काळ्या महालातील त्रिशुळ वापरून त्रिशूळ सैनिकांना माणसात आणण्याचा उपाय शोधून काढला होता . त्यासाठी लागणारे सर्व साहित्यही गोळा झालं होतं। होमकुंड पेटला . सर्व बाबी पूर्ण झाल्या होत्या. इतर सर्व विधिही पूर्ण झाल्यानंतर राज महर्षींनी तो त्रिशुळ उचलला व होमकुंडाकडे जावू लागले . तो त्रिशुळ एकदा होमकुंडात पडला की सर्व संपणार होते . पण त्याच वेळी भिंती पलीकडून त्रिशूळ सैनिकातून एक त्रिशूळ फेकला गेला व तो राजमहर्षींना लागला . राज महर्षींची जागेलाच माती झाली .
त्रिशूळ सैन्य यासाठीच प्रसिद्ध होतं त्यांच्यात त्रिशूळचा स्पर्श नि मानवाचं अस्तित्वच नष्ट व्हायचं . राजमहर्षी होत्याचे नव्हते झाले आणि एकापाठोपाठ त्रिशुळ येऊ लागले . बरेच सैनिक बेसावध होते। ते जागीच मृत्यू पावले . त्यांची झालेली माहिती वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर उडू लागली . काहींनी सावध होत ढाली आडव्या धरल्या पण साध्या ढालींचं त्या त्रिशुळापुढे काही टिकाव लागत नव्हता . त्या ढालीसकट त्या सैनिकांची माती झाली .
" अभिमंत्रित ढाली घ्या अभिमंत्रित ढाली ....." महाराज कैरव बोलले .
मात्र त्याचवेळी एक त्रिशूळाने त्यांच्या छातीचा वेध घेतला . तेही जागेल्याच नष्ट झाले . महाराज कैरवांना या दिवसाची अपेक्षा होतीच . त्यामुळे ज्या दिवशी त्यांनी त्रिशूळ सैनिकाची आरोळी ऐकली होती त्याच दिवसापासून त्यांनी अभिमंत्रित ढाली तयार करण्याची आज्ञा दिली होती .

अभिमंत्रित ढाली प्रत्येकाच्या हाती जाईपर्यंत निम्म्याहून अधिक सैन्य नाहिसे झाले होते . शेवटी कसेबसे युवराज देवव्रताने तो त्रिशुळ घेत अग्निकुंडात टाकला . त्याबरोबर ते त्रिशुळ येणं बंद झाले . त्रिशुळ सैनिक नाहीसे झाले होते . तिथे आता जलधि राज्याचे सामान्य नागरिक होते . पण अर्धे सैन्य त्यासाठी बळी गेले होते . युवराज देवव्रताच्या डोळ्यात प्रतिशोधाचा अग्नी पेटला होता .
प्रलय-२८

" मी म्हटलं होतं माझी गरज पडेल तुम्हाला , पडली की नाही......." वेडा आबाजी म्हणजेच विश्वनाथ म्हणाला .
भेटीच्या संरक्षणासाठी वारसदारांची सभा होती कधीकाळी वेडा आबाजी आयुष्यमान प्रमाणेच सभा प्रमुख होता . पण त्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे त्याला सभेतून काढून टाकलं होतं . त्याने भैरव बरोबर हात मिळवणी केली होती . काळी भिंत पाडून देण्यासाठी. काळी भिंत पाडण्याचा अधिकार फक्त रक्षक राज्यातील राजाला , त्याच्या सैन्याला किंवा वारसदारांच्या सभेला होता . इतर कोणीही त्या भिंतीला पडायला गेले तर त्याचा मृत्यू नक्की असायचा . म्हणूनच भैरवने (मारुतांचा पुजारी ) विक्रमा सोबत लांब पल्ल्याची चाल खेळली होती . मात्र तंत्रज्ञ मंदारच्या मुलांनी ऐनवेळी घोळ घातला होता .
त्यामुळे भैरव आणि पार्थ विश्वनाथ कडे आले होते . ज्या बियांची थैली आयुष्यमान भरत कनिष्क आणि चैतन्य उत्तर-दक्षिण टाकत गेले होते . ती बियांची थैली वारसदारांच्या सभेतील एका अत्यंत ज्येष्ठ व जुन्या सदस्याने बनवून मोहिनी च्या घरी ठेवण्यासाठी दिली होती . त्याला म्हणे भविष्यातील काही घटना दिसायच्या . त्यामुळेच मोहिनीला सांगतानाच सांगितलं होतं की ' एके दिवशी योध्या प्रमाणे वेश परिधान केलेल्या युवक येऊन तुला स्वतःहून त्याची मदत देऊ करेल त्यावेळी ही थैली त्याच्या हवाली करायची . पण विश्वनाथने त्यातही मध्ये भेसळ केली होती . बियांमध्ये भेसळ करून त्या बियांचा वापर करून त्याला भिंत पडता येईल अशी व्यवस्था त्याने केली होती . एकदा का त्या बीया वारसदारांच्या हस्ते योग्य जागी पडल्या , की भिंत पाडणं त्याला सहज शक्य होतं .

विश्वनाथने भैरव बरोबर करार केला होता . त्यावेळी त्यांने एक अट घातली होती . वारसदारांच्या सभेतील सर्व ज्येष्ठांना मारून टाकायचं . साऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे तरूणांना कोणी मार्गदर्शन करणारा शिल्लक राहिला नाही . ठरल्याप्रमाणे भैरवाने सर्व जेष्ठांचा खात्मा केला . याच मोक्याचा फायदा घेत विश्वनाथने वेडा आबाजी बनत आयुष्यमान ची गाठ घेतली . बियांची पिशवी पश्चिमेकडील काळ्या भिंतीच्या जवळच्या गावातील एका घरांमध्ये असल्याचे सांगितले...

मग ती बियांची पिशवी शोधण्यासाठी ते चार वारसदार काळ्या भिंतीत जवळील सर्व गावांमध्ये फिरू लागले . मात्र बियांची पिशवी मोहिनी कडे होती हे कोणालाच माहीत नव्हतं . जेव्हा आयुष्यमान स्वतःहून त्या ठिकाणी गेला व मोहिनीच्या वडिलांना मदत केली . त्यावेळी त्याला बियांची पिशवी मिळाली . पण त्या बियांच्या पिशवीमध्ये विश्वनाथने भेसळ केली होती .

" चल लवकर आमच्या पुढच्या योजना भिंतीच्या पडण्यावरती अवलंबून आहेत .....
भैरव म्हणाला आणि ते तिघेही काळ्या भिंतीकडे निघाले.....

बाटी जमातीच्या टोळ्या मारूतांच्या जुन्या महालाकडे निघाल्या होत्या . काही दिवसांच्या प्रवासानंतर त्याठिकाणी पोहचल्याही . पण तिथे ना भैरव ( म्हणजेच मुख्य पुजारी ) होता ना पार्थ होता . तरीही बरेच दिवस त्या तिथेच राहिल्या . ज्या टोळीने मारूतांची मदत केली होती ती टोळी फक्त पुरुषांची होती . ज्यांना इतर टोळ्यांमधून काही ना काही करण्यासाठी काढून टाकलं होतं . आता तेच इतर सर्व टोळ्यांवरती हुकूमशाही गाजवत होते . सुरुवातीला इतर टोळ्या त्यांच्या गोड बोलण्याला फसल्या....
" जलधि राज्याने आपल्याला आश्रय दिला आहे खरा पण आपल्याला नागरिकांची वागणूक मिळते का...? त्यांचे लोक आपल्याकडे कोणत्या नजरेने बघतात....
असाच त्यांचा युक्तिवाद असायचा . आणि ते काही प्रमाणात खरेही होतं . पण बाटी जमत पूर्णपणे जलधि राज्यांमध्ये मिसळण्यासाठी काही काळ जाणार होता हे त्यांनाही लक्षात यायला हवं होतं . पण या उग्र वादामुळे बऱ्याच टोळ्या त्यांच्या पाठोपाठ आल्या . मात्र जुन्या महालात पोचल्यावर ती त्या टोळ्यांमध्ये विरोधाचे सूर उमटू लागले . बऱ्याच टोळ्या गुपचूप सोडून निघून गेल्या होत्या व काही जाण्याच्या मार्गात होता .
मात्र आता जुन्या महाला भोवती महाराज विश्वकर्मा व इतर तुकडीने घेराव टाकला होता . पण त्यांना सुरुवातीला स्वतःच्याच राज्यातील लोकांसोबत लढावे लागणार होतं . कारण महालातून टोळ्यांनी जलधि राज्यातील काही नागरिकांना अंधभक्त बनवून त्यांच्यासोबत आणलं होतं . जेव्हा त्यांचा वेढा पडला त्याच वेळी " सिरकोडा इसाड कोते " असे ओरडत भक्तांचा हल्ला झाला . एकेक अंधभक्त चार चार सैनिकांसोबत लढत होता .

मात्र जलधि राज्या सोबतही एक बाटी जमातीची टोळी होती . बासरी वाजवून भक्तांना शांत करण्याची कला या टोळीला अवगत होती . मग महाराज विश्वकर्मा नि तिची युक्ती वापरत जलधि राज्यातील त्या अंध भक्तांना शांत करत पकडलं....

आता मात्र महालातील टोळ्यांना समर्पण करण्यावाचून पर्याय नव्हता . तरीही त्या हरप्रकारे लढण्याचा प्रयत्न करत होत्या. सरतेशेवटी सर्वांना पकडण्यात यश आले . त्यांना पकडून महाराज विश्वकर्मा चा ताफा जलधि राज्याकडे निघाला.....

तंत्रज्ञ मंदार , म्हातारा मांत्रिक , आयुष्यमान व ते दोन बुटके यांचा अग्नेय राज्यातील काम झालं होतं . जाताजाता महाराजांकडे ते भेटायला गेले...
" महाराज तुमच्या अतिथ्याबद्दल मनापासून धन्यवाद . पण अजून एक विनंती आहे .....
तंत्रज्ञ मंदार त्यांना म्हणाला
" प्रलय जागृत करण्यासाठी लागणारी एक गोष्ट जी तुमच्या सुरक्षेत आहे ती एकदा तपासावी म्हणतो.....

" ठीक आहे चला माझ्याबरोबर..... अग्नेय महाराजांबरोबर सर्व निघाले...
अग्नेयांच्या वारसदाराविना त्या वास्तुत प्रवेश करता येत नसे . अग्नेय महाराज पुढे उभारले त्यावेळी ते प्रवेश द्वार उघडले . अग्नेय महाराज आणि पाठोपाठ सर्वजण आत गेले . त्या वर्तुळाकार वास्तूच्या केंद्रस्थानी वर व खाली समान अंतर ठेवून एक पेटी तरंगत होती . महाराज त्या पेटीचा इतिहास सांगत होते . पेटीच्या संरक्षणार्थ केलेल्या गोष्टी , गेलेली जीव या साऱ्या गोष्टी ऐकवीत होते . पण प्रवेशद्वार अजूनही उघडे होते . त्या विशाल प्रवेशद्वारातून सुरुकु सहजपणे आता आला . उडत आलेल्या सुरूकुने पेटी तोंडात पकडली . आयुष्यमान तोपर्यंत गुपचूप बाहेर जाऊन थांबला होता . सुरुकु बाहेर येताच तो सुरुकु बरोबर उडाला . ते दोघेही पेटी घेऊन प्रलयकारिकेकडे निघाले होते

ती पेटी चोरीला जाताच उडत्या बेटांवरती एकच गोंधळ माजला . सर्व सैनिकांना सूचना देण्यात आल्या . सुरुकु वरती नगरातील सर्व तोफा धडाडू लागल्या . पण सुरुकु हा सुरुकुच होता . प्रत्येक तोफेचा मारा चुकवत तो पुढे जात राहिला व शेवटी बेटावरून बाहेर पडला . पण संपूर्ण नगरात आगीचा तांडव मागे राहिला .

" आयुष्यमान का म्हणून असं करेल ..... म्हातारा मांत्रिक म्हणाला
" त्यावर ती नक्कीच प्रलयकारिकेचं नियंत्रण असणार..... महाराज म्हणाले
" पण ते शक्य तरी आहे का ....? पुन्हा एकदा म्हातारा मांत्रिक म्हणाला
" प्रलयकारीकेच शरीर हे मोहिनीचं आहे . ती प्राण्यांना नियंत्रण करू शकत होती . आत्मबलिदानाचा विधी झाल्यानंतर तिच्या शक्तीमध्ये नक्कीच वाढ होऊन ती माणसांनाही नियंत्रण करू शकत असणार . आपल्याला फक्त एवढेच माहिती पाहिजे की आत्मा बलिदानाच्या विधीनंतर तो तिच्यासमोर गेलाय का ......? तंत्रज्ञ मंदार म्हणाला
" हो गेलाय तो . तिला ठार करायला गेला होता . त्यावेळी तो तिच्या नियंत्रणाखाली गेला असावा . पण आता काय करायचं .....? " तो म्हातारा मंत्री काळजीच्या स्वरात म्हणाला .
" आता प्रलय जागृत करण्यासाठी लागणारी गोष्ट तिच्या हाती लागली आहे म्हटल्यावर प्रलय केव्हाही जागृत होऊ शकतो . एकदा का तो जागृत झाला की हळूहळू त्याची शक्ती वाढत जाणार . एकदा तो संपूर्ण शक्तिशाली झाला की मानव संपलाच म्हणून समजायचे . म्हणून तो संपूर्ण शक्तिशाली होण्याअगोदर तीन राजांनी एकत्र यायला हवे , अन्यथा विनाश नक्की आहे ........." तंत्रज्ञ मंदार बोलत होता

राजा अग्नेय अग्नी कक्षात गेला .
" घडलेली घटना अनपेक्षित होती पण अशक्य नव्हती . प्रलयकारीकेला काहीही अशक्य नाही . तीन बहिणी काहीतरी करतीलच पण आपल्यालाही हालचाली कराव्या लागतील . तीन राजांचे एकत्र येणे आता कधी नव्हे ते अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे .....
ज्वालेतून आवाज येत राहिला
प्रलय जागृत होण्यासाठी आता फार काळ शिल्लक राहिला नव्हता . एकदा प्रलय जागृत झाला की हळूहळू मानवाची मानवता संपणार होती नि एकदा का मानवता संपली की मानव संपणारच....
प्रलय-२९

विश्वनाथ भैरव आणि पार्थव काळ्या भिंतीपाशी आले .
" तुला लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत . लवकर सुरू कर..." भैरव म्हणाला
" चिंता नको काही क्षणात ही भिंत कोसळलेली असेल ...." विश्वनाथ म्हणाला . नंतर त्यांनी आणलेल्या गोष्टी मांडायला सुरुवात केली . विचित्र भाषेत कसलेतरी मंत्र तो उच्चारत होता . मधुमोध पेटवलेल्या अग्निकुंडात एकापाठोपाठ एक आहुती देत होता . त्यातूनही चित्रविचित्र आवाज निघत होते . पण भिंत अजून हलली सुद्धा नव्हती .
" काही होत नाही वाटतं . किती वेळ झाला ....." भैरव म्हणाला .
" विक्रमासाठी तुम्ही इतकी वर्षे वाट बघितली , अजून काही क्षण वाट पाहू शकत नाही का तुम्ही....
अजूनही बराच वेळ तो काहीतरी मंत्रोच्चारात राहिला व त्या आगीत काही ना काही टाकत राहिला शेवटी तो उभा राहिला . उजव्या हाताच्या खूप धरत त्याने डावा हाताचा पंजा कापला . ते रक्त अग्निकुंडात पडताच साप फुत्कारल्याप्रमाणे फुस्ससssss असा आवाज होत अग्निकुंडतून लाल धूर निघू लागला. सर्वत्र जळक्या माणसाचा वास सुटला त्या दोराने दोरखंड सारखा आकार धारण करत भैरव पार्थव व विश्वनाथ या तिघांनाही काळा भिंतीवरती काळ्या महलाकडील बाजूला बरोबर मधोमध बांधून टाकले . तिघांनीही सुटण्याची धडपड सुरू केली तसा तसा तो दोरखंड अधिक जाड होत ते लाल मांस त्यांच्या शरीराभोवती सर्वत्र पसरू लागले .

" जास्त हालचाल करू नका , अन्यथा गुदमरून मराल ...." कनिष्क भिंतीवरून बोलला .
" आश्चर्य वाटले ना , भिंत पडली नाही आणि आपलाच विधी आपल्यावरतीच उलटला ....." चैतन्य आबाजीला डिवचत म्हणाला .
" आम्हाला वाटलंच होतं त्या बिया मध्ये काहीतरी घोळ आहे म्हणून . पण आयुष्यमानच्या डोक्यात मोहिनी बसलेली होती . मग आम्ही दोघांनी तपास केला तेव्हा आम्हाला विश्वनाथ उर्फ वेड्या आबाजीचे कारणामे कळाले . .." कनिष्क बोलत होता . " सर्व ज्येष्ठांचे खून घडवून आणले पण मोहिनीचे वडीलही ज्येष्ठ होते हे तू विसरला वाटतं . त्यांच्याकडून सारी माहिती काढली व तुझा डाव तुझ्यावरतीच उलटवला.....

विश्वनाथ मात्र वेड्यासारखा हसत सुटला .
" मला कल्पना होतीच असं काहीतरी होईल म्हणून. म्हणूनच मी पूर्वतयारी केली होती ...." त्यांनी त्याच्या गळ्यातला दोर तोंडाने ओढला . कसलीतरी धूळ उडाली व विश्वनाथ तिथून गायब झाला .

विश्वनाथ गायब झाला होता , पण भैरव आणि पार्थ दोघे तिथेच होते .
" या दोघांचं काय करायचं...." चैतन्य म्हणाला .
" या दोघांनीच तर सारा गोंधळ माजवलाय . प्रलय काय प्रलयकारिका काय ......" कनिष्क भिंतीपलीकडे रागाच्या भरात गेला. त्याने दोघांचेही गुडघ्यापासून पाय व कोपरापासून हात तोडून टाकले. दोघेही गुरासारखे ओरडत होते . पण त्यांना काही करताहेत नव्हतं . कारण दोघेही भिंतीला पुतळ्याप्रमाणे चिटकले होते . जखमांमधून रक्त वाहत होतं . वाहणारं रक्त थांबावं म्हणून कनिष्काने कसलीतरी भुकटी त्या जखमांवरती टाकली .
भैरव हा साऱ्या पृथ्वीतलावरती राज्य करायला निघाला होता . साऱ्या काही गोष्टीचं त्यांनं नियोजन केलं होतं . पण प्रत्येक गोष्ट नियोजन करून करता येते असं नाही . सारंकाही नियोजन केल्याप्रमाणे घडतच असं नाही.....

लोहगड ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा असा उठाव होऊ नये म्हणून अंकितने एक उत्सव ठेवला होता . नाव उत्सवाचे होते खरे पण कारण होते लोक एकत्र यावे . एकमेकांबद्दलचा द्वेषभाव कमी व्हावा . हेवेदावे काही असतील तर ते बाहेर पडावेत . पण हा उत्सव रक्तरंजित होणार होता . कारण प्रलयकारीका तिथे पोहचली होती . भैरवाने सांगितल्याप्रमाणे संसाधन राज्यावरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी ती त्या ठिकाणी आली होती . प्रलयकारीकेला अंकितचा शिरच्छेद सहज करता आला असता . सार्‍या संसाधन राज्य सत्ता गाजवण्यासाठी फक्त तिच्या डोळेच भरपूर होते . पण तिच्या डोक्यात एक क्रूर खेळाची कल्पना भरली होती .

ती हवेत उंच उडाली . तिचे डोळे आता पूर्णपणे काळेकुट्ट होते . तिच्या संपूर्ण शरीरावर ती काळसर वलय होते . त्या ठिकाणचा प्रत्येक जण जागेला स्थिर झाला . कोणालाही त्याच्या इच्छेप्रमाणे हालचाल करता येईना .
" मी या क्षणी तुम्हा साऱ्यांना जागीच ठार करू शकते . पण त्यात काहीच मज्जा नाही . त्यामुळे तुमच्यातल्या काही लोकांना जगण्याची संधी मी देणार आहे . मला फक्त तुमच्या राजाचे मस्तक हवे आहे . जो कोणी मला ते मस्तक देईल , तो पुढचा राजा असेल . आणि त्याला जे हवे आहेत तेच लोक फक्त जिवंत राहतील .......

आणि तिने साऱ्यांना हालचाल करण्याची मुभा दिली . त्याबरोबर दहा-पंधरा सैनिक शस्त्रांकडे धावले .
" अरे वा इतक्या लवकर तुटली का तुमची ऐकी....... " सैनिकांनी घेतलेले भाले प्रलयकारिकेकडे फेकून मारले . तिने ते सहजपणे चुकवले . " ही मात्र फार मोठी चूक केली .......
असं म्हणत तिने तिच्या त्यांची हालचाल केली . ते पंधरा सैनिक एकमेकांवर धावून गेले . स्वतःची इच्छा नसतानाही त्यांनी स्वतःच्याच मित्रांना जीवे मारले . एकमेकांची मस्तके धडावेगळी केली . बाकीचे लोक अजूनही जागेला स्थिर होते .
" या खेळात काही मज्जा आली नाही . आपण एक नवीन खेळ खेळूया . जर तुमच्या राजाने उजव्या हातातील तलवारीने त्याचा डावा हात कापला नाही तर ही लहान मुले मरतील ...... त्याचवेळी तेथील सैनिकांनी लहान मुलांना उचलून घेतले व त्यांच्या गळ्याला चाकू लावला . त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे शरीर काम करत होते. साऱ्यांच्या शरीरावर तिचे नियंत्रण होते .
" अंकित मला सांग बर तुझा हात महत्वाचा आहे की या लहान मुलांचे आयुष्य .... लवकर ठरव नाहीतर एक एक लहान मूल मरेल बघ ......
अंकितने तलवार घेतली व हात जमिनीवर ठेवला . तो हात तोडण्यासाठी तयार होता . त्याला हात तोडावाच लागणार होता . कारण ती लहान मुलांचा जीव घ्यायला मागेपुढे बघणार नव्हती . त्याने तलवार जोरात उचलली आणि एक किंकाळी घुमली . त्याचा हात मनगटापासून तुटून पडला होता . रक्ताच्या धारा वहात होत्या .
" अरे वा राजाचे खरेच प्रेम आहे म्हणायचे.... " सैनिकांनी त्या लहान मुलांना खाली सोडले . मात्र तिच्या डोक्यात आता वेगळीच युक्ती आली होती . तिने त्या लहान मुलांच्या हातात तलवारी उचलायला लावल्या होत्या . त्या तलवारींनी तिने सैनिकांना मारून टाकले . तिने लहान मुलांच्या हस्ते त्या सैनिकांच्या हत्या घडवल्या होत्या .

संसाधन राज्यात रक्तरंजित खेळ सुरू असतानाच आग्नेय राज्यात त्या तीन बहिणींनी प्रलयकारिकेला थांबवण्यासाठी विधी सुरू केला होता . प्रत्येकीच्या गर्भाशयात एका राजाची बीज होते . तिघांचेही हात एकमेकींच्या हातात होते व तिघीही कोणतातरी मंत्र गुणगुणत होत्या . त्या ठिकाणी काही वेळानंतर अग्नि जल आणि वायूचा एकावेळी तांडव सुरू झाला . प्रत्येकीच्या गर्भातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडत होता . एक तांबडा अग्नीसारखा , एक निळा पाण्यासारखा आणि पांढरट वायुसारखा . तीन रंगाचे तीन धागे एकत्र येत एक मानवी आकृती तयार झाली व हवेत विरून गेली . त्या तिघीही जागीच बेशुद्ध झाल्या .
त्याच अग्नि जल आणि वायू च्या शक्तीपासून बनलेल्या मानवी आकृती ने अंकितची निवड केली होती . तुटलेला हात नीट होत त्याने त्याचे रूप बदलले . तो अधिक उंच धिप्पाड होत गेला . साधारण मानवापेक्षा तीन ते चार पटीने तो उंच धिप्पाड होता . त्याची शक्तीही कितीतरी पटीने अधिक होती . त्याच्यावरती आता प्रलयकारिकेचे नियंत्रण चालत नव्हते . तो सरळ तिच्या वरती धावून गेला . हवेत मध्यंतरी तरंगणाऱ्या प्रलयकारीकेला खाली पाडत त्याने तिला दगडावरती जोरात आपटले . ती पडलेली असताना त्यांनी बाजूला पडलेला एक मोठा दगड घेऊन तिच्यावरती फेकला पण तिने तो दगड चुकवला . तिने तिच्या नियंत्रणाखाली असलेली सामान्य माणसे अंकितवरती पाठवून दिली व ती पळून जाऊ लागली . पण अंकितने उंच उडी मारत हवेतच तिला पकडले . एका हातात तलवार घेऊन तो तिच्यावर ती चालवणार तेव्हाच सुरूकु तिथे आला .

अंकितला तोंडात पकडत त्याने लांब फेकून दिले . तोपर्यंत आयुष्यमान प्रलयकारी केला घेत सुरूकू रती बसला व तिघेही तिथून निघून गेले ...

प्रलय-३०

आयुष्यमान जेव्हा दुसऱ्यांदा प्रलयकारीके चा सामना करण्यासाठी मारूतांच्या जुन्या मंदिरात सामोरा गेला , त्यावेळी प्रलयकारिकेच्या आत्मबलीदानाचा विधी पूर्ण झाला होता . प्रलयकारिका संपूर्ण शक्तिशाली झाली होती . तिच्या त्या काळ्या डोळ्यात पाहत असतानाच तो तिच्या नियंत्रणाखाली आला होता . ज्यावेळी ती पेटी आयुष्यमानला दिसली त्यावेळी प्रलयकारिकेचा सेवक जागृत झाला . आयुष्यमानने ती पेटी चोरली व सुरुकु सोबत प्रलयकारीके कडे निघाला .

इकडे तीन बहिणींच्या किमीयेमुळे प्रथम मानवांचा प्रमुख अंकितला प्रलयकारिकेला लढण्याची शक्ती प्राप्त झाली होती . प्रलयकारिकेचा मृत्यू निश्चित असतानाच , सुरूकू व आयुष्यमान त्या ठिकाणी आले . त्या दोघांबरोबर प्रलयकारीका तिथून निघाली . पेटी पाहिल्यानंतर तिने आयुष्यमानला रक्षक राज्याकडे न्यायला सांगितले . ज्या ठिकाणी या साऱ्याची सुरुवात झाली होती , ती घटना ज्या ठिकाणी घडली होती , तिथेच त्याचा जन्म व्हायला हवा होता म्हणून ते रक्षक राज्याकडे चालले होते . उत्तरेच्या जंगलात असलेल्या सैनिक तळ हाता रक्षक राज्यातील महालात पोचला होता . विक्रमाच्या वधानंतर त्यांना काहीही न करता महाल ताब्यात घेतला होता . सरोज भिल्लव सार्थक अधिरात आणि अद्वैत बरोबरच सर्वजन उत्साहात होते . नाही म्हटलं तरी महालात उत्सवाचे स्वरूप आले होते . महाराज विक्रमांची काळी छाया गेल्यामुळे जनु महालही आनंद झाला होता .

पण खरी दुरावस्था होती ती महाराणी शकुंतलेची . काही केलं तरी विक्रम त्यांचा मुलगा होता . नवीन जन्मलेला राजपुत्र नसत्या कारणासाठी बळी गेला होता . पहिला मुलगा स्वतःच्या पतिनेच म्हणजेच महाराज सत्यवर्माने जिवंत जाळला होता . तिचा आयुष्य म्हणजे एक शोकांतिकाच होती . सारा उत्साहाच्या वातावरणात महाराणी शकुंतला त्यांच्या कक्षात शांतपणे बसल्या होत्या . महाराज विश्‍वकर्माचा परतीच्या मार्गावर आहेत हे सांगण्यासाठी भिल्लव गेला होता पण महाराणींनी द्वारही उघडले नाही .

सरोज हातात मदिरेचा प्याला घेऊन महालाच्या एका बाजूला असलेल्या सज्जातून बाहेर पाहत होती . समोर पसरलेलं नगर दिसत होतं. थोडंसं दूर , जुन्या जळून खाक झालेला महालाचा सांगाडा दिसत होता . जिथे या साऱ्याची सुरुवात झाली होती .

" तुला काय झालं अजून अशी काय एकटी उभारली आहेस ......" भिल्लव सुरोजला म्हणाला ....
" काहीही म्हण पण जरा उदास वातावरण वाटतय , जणू काही वादळापूर्वीची शांतता.....
" काही नाही सगळे व्यवस्थित झालय . आपण जिवंत आहोत , राजद्रोही नाही आहोत आणि चक्क राजमहालात शाही मदिरा प्राशन करत आहोत . अजून काय पाहिजे.....
" अरे ते तर आहे रे पण , प्रलय प्रलयकारिका या गोष्टी ऐकल्या नि मनात उगाच हुर हुर लागलीय रे .....

भिलवा ने तिला जवळ ओढले आणि तिच्या ओठाचे चुंबन घेतले " आता गेली का तुझी भीती......"
आणि दोघेही हसले

त्याचवेळी जळालेल्या जुन्या महाला वरती एक गोलाकार प्रकाश कोसळला . एक मोठा विस्फोट झाला . त्याच्या ज्वाला पसरत काही क्षणात त्या दोघांपर्यंत पोहोचल्या . एकमेकांच्या मिठीतच ते होत्याचे नव्हते झाले . राजमहाल व रक्षक राज्याची राजधानी काही क्षणात पृथ्वीतलावरून नाहीसे झाले होते .

ज्यावेळी प्रलयकारीका व आयुष्यमान रक्षक राज्याच्या राजधानी वरून सुरूकु वर बसून निघाले होते , त्यावेळी आयुष्यमानच्या हातात असणारी पेटी हलू लागली व ती खाली पडली . त्यातून निघालेला निळसर प्रकाश त्या जळालेल्या मालाच्या सांगड्याकडे गेला . आणि एक मोठा विस्फोट झाला . विस्फोटानंतर काही वेळ ते आकाशात उडत राहिले नंतर ज्या ठिकाणी तो जूना महाला होता त्या ठिकाणी उतरले . त्याठिकाणी आता फक्त काळी राख होती . तो निळसर गोलाकार प्रकाश एका गोलाकार उंचवट्यावरती चमकत होता . प्रलयकारिका तिथे गेली आपला हात पुढे केला चाकूने कापला . त्यातून रक्त पडू लागले . त्यावेळी ती कसलेतरी मंत्र बरळू लागली . तिच्या हातातून रक्त पडत होते व त्या प्रकाशात विलीन होते . हळूहळू त्या प्रकाशाचा आकार मोठा होऊ लागला. आताच्या प्रकाशाच्या गोलातून गोलाकारा दोरखंड निघाले व त्यांनी सुरुकुला स्वतःमध्ये सामावून घेतले . सुरुकुचा बळी त्या प्रकाशाने घेतला व त्यानंतर एक छोटासा विस्फोट झाला . आयुष्यमान व प्रणय कार्यक्रम दोघेही मागे फेकले गेले आता त्या प्रकाशाचा कार भरपूर मोठा झाला होता । पुन्हा एकदा त्यातून दोन विजा चमकल्या . एक वीज आयुष्यमान वरती पडली व दुसरी प्रलयकारीके वरती आयुष्यमानचा जागीच हाडाचा सांगाडा तयार झाला व तोही हवेत विरून गेला . प्रलयकारीका मात्र फक्त बेशुद्ध झाली व खाली पडली .

हळू हळू तो प्रकाश लहान होत गेला व शेवटी त्यातून एक लहान मुलाप्रमाणे दिसणारा तरीही विचित्र असा आकार बाहेर पडला . त्याचे संपूर्ण शरीर समुद्राच्या पाण्यासारखे फिकट निळे होते . डोळे काळेकुट्ट होते . हाताची पायाची नखे व जीभ लालभडक होती . जन्मताच एखाद्या प्राण्यासारखे चार पायावर चालत तो आकार निघून गेला प्रलयाचा जन्म झाला होता .

उपसंहार

जन्म त्याचा झाला होता
विनाश धरतीचा आला होता
मृत्यू एक वेळ बरा , पण आता
धरतीवरती नर्क येणार होता

माणसाची माणुसकी
सर्वात आधी संपणार होती
माणुसकी संपल्यावरती
मानवता कुठे उरणार होती
एकदा का मानवाची
मानवता जर हरवली
मानवाची कर्मे मग
दानवाला ही घाबरवतील

तीन राजांच्या नावाखाली
धरती जेव्हा एक होईल
प्रलयला मात्र तेव्हा
पळता भुई थोडी होईल

Group content visibility: 
Use group defaults