साडेसातीचा प्रवास

Submitted by नितीनचंद्र on 1 November, 2014 - 01:45

२ नोव्हेंबर २०१४ रात्री ८ वाजुन ५४ मिनिटांनी शनि निरयन वृश्चिक राशी प्रवेश करतो. गेले साडेसात वर्ष पिडलेल्या कन्या राशीची साडेसाती पासुन सुटका होईल.

याच बरोबर साडेबावीस वर्षांनी धनु राशीला साडेसाती सुरु होते.

तुळ राशीची साडेसातीतली शेवटची अडीच वर्षे सुरु होतात तर वृश्चिकेला पाच वर्ष साडेसाती बाकी आहे.

या कालावधी विषयक अनेक गोष्टी व कथा लोकांनी वाचल्या असतील. अनुभवही घेतले असतील. खास जाणवते ती मानसीक पीडा आणि त्यातुन बदलणारी मानसीकता.

साडेसाती तुळ, वृश्चिक आणि धनु राशीला काय परिणाम जाणवेल हे जाणुन घेऊ या.

तुळ राशीला शेवटची अडीचकी आहे. शेवटची अडीचकी काही चांगले घडवुन जाते. तुळ राशीला शनि राजयोग कारक असल्याने किंवा तुळ राशीत शनि उच्चीचा असल्यामुळे पहिली अडिचकी सोडली तर दुसर्‍या आणि तिसर्‍या अडीचकीत फारसा त्रास होत नाही.

शेवटच्या अडिचकीत कुटुंबस्थानातुन किंवा धन स्थानातुन होणारे शनिभ्रमण हळु हळु सांपत्तीक स्थितीत सुधारणाच करेल. याचा वेग मंद असला तरी स्लो बट स्टेडी अश्या प्रकारचा असेल.

कुटुंबात शनि हा वाढ करणारा ग्रह नसुन कितीही हवे असले तरी कुटुंबातील सदस्य संख्या एका आकड्याने किमान कमी होताना काहिंना दिसते. अत्यंत वृध्द असे आजी - आजोबा यांचा या अडिचकीत वियोग होण्याची शक्यता असते तेव्हा लवकरच त्यांच्या जिवंतपणी आशिर्वाद घेण्याचे मनात आणा. त्यांच्या बरोबर काही काळ व्यतित करा. त्यांच्या इच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करा.

शेवटी अमर कोणीच होत नसते. पण मोठ्यांचे कृपाछ्त्र मात्र कायम रहावे असे वाटत असते. अश्या वेळी रुख रुख राहु नये या दृष्टिने हे लिहले आहे.

वृश्चिक राशीला ही मधली अडिचकी. प्रत्यक्ष चंद्रावरुन शनिचे भ्रमण होताना होणारा मानसीक त्रास लक्षात राहिल असा असतो. तुमच्या राशीला अनुरुप बदला घ्यायचा स्वभाव जरा अजुनही लांब ठेवा . शांत पणे पहात रहा काय घडते आणि का घडते या कडे. अनुकुल काळ येईल तेव्हा तुम्हाला सव्याज उट्टे काढायची संधी येणारच आहे. पहिलीच साडेसाती असेल तर आत्मपरिक्षणाची सवय याच काळात लागेल.

शनिवारी तेलाने मालीश करुन गरम पाण्याने स्नान करावे हा उपाय साडेसातीत करायला जुने व जाणते ज्योतिषी सांगतात. मनाचे व्यापार वाढतात तेव्हा शरीरातले रक्ताभिसरण वाढवणे सुखद अनुभव देते असा काहिसा प्रकार यामागे असावा.

शनि हा शिक्षक आहे. जे नुकसान होते यातुन मोठा धडा मिळतो याकडे लक्ष द्या.

धनु राशीला पहिलीच अडीचकी आहे. व्यावसायीक महात्वाकांक्षांना आवर घालुन लो रिस्क असलेले करार मदार करणे क्रमप्राप्त ठरेल. धनु राशीला धन स्थानाचा मालक असलेला शनिच व्ययस्थानात या अडिचकीत असल्यामुळे स्थावर / रोकड यांचा क्षय होताना दिसणार आहे. तो थांबविण्यासाठी अतिरिक्त कामाचा ताण आणि मानसीक ताण जाणवणे अपरिहार्य आहे.

तृतीयेश शनि तुमच्या व्ययात असल्यामुळे सहोदरांची खास करुन मोठ्या भावा - बहिणीची चिंता सतावेल.

आपली मानसीकता अध्यात्मीक आणि परमेश्वराला मानणारी असल्यामुळे या कालखंडातुन आपण पार जाणारच आहात.

शनिवारी शनिमहाराजांना तेल आणि काळे उडीद याच बरोबर रुईपत्रांची माला अर्पण करा. मारुतीचे दर्शन घ्या. हा उपाय पुढील साडेसात वर्षे न चुकता करा. सोबत शनिस्तुती आणि हनुमान चालिसाचा पाठ सुरु ठेवा.

सर्वांसाठीच शनिचा नवग्रहपिडाहर स्त्रोत्रातला मंत्र रोज जपावा असा आहे.

सुर्यपुत्र दिर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिया:|
मंद्चार प्रस्सनात्मा पीड़ा हरतु में शनि ||

हा मंत्र रोज किमान ११ वेळा रोज म्हणावा म्हणजे साडेसाती सुखकर होते

|शुभंभवतु |

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उ बो, शनी ज्या राशीत तिथे साडेसाती या नियमाने तुमची जी काही रास आहे त्या राशीच्या मागे शनी आल्यावर तुम्हाला साडेसाती सुरू झाली असणार. वर कित्येकांनी म्हटलेय की ज्यांची पूर्वकर्मे चांगली त्यांना त्रास कमी होतो. तुमची नुसतीच चांगली नसावीत, उत्तम असावीत म्हणून तुम्हाला साडेसाती कधी येऊन गेली हे कळले नसावे.

काय आहे ना, चांगल्या आयुष्यासाठी प्रयत्न सगळेच करत असतात पण सगळेच सारख्या प्रमाणात यशस्वी होत नाहीत. जे होत नाहीत, ज्यांना प्रयत्न करूनही सतत कटकटी, अपयश वाट्याला येते ते शेवटी कंटाळून हे असे का होतेय याचा शोध लावायचा प्रयत्न करतात. काहीजण ज्योतिषी गाठतात. त्यांना जेव्हा कळते की आपल्याला साडेसाती म्हणून हे सगळे सुरू आहे तेव्हा त्यांना थोडे बरे वाटते. कारण साडेसात वर्षांनंतर का होईना, पण यातून सुटका मिळेल ही आशा निर्माण होते. मनुष्य हा शेवटी आशेवर जगणारा प्राणी आहे हो. आशा नसेल तर त्याचे आयुष्य शून्य.

ज्यांच्या आयुष्यात अडथळे येताहेत, कामे होत नाहीयेत, ती का होत नाहीयेत हे कळत नाही, बाहेर पडायचे मार्ग दिसत नाहीत त्यांच्यासाठी हे ज्योतिष बीतिष सगळे आहे. ते एकतर त्यांना आहे ते आयुष्य तसेच निमूट स्वीकारायला भाग पाडते किंवा भविष्यात चांगले आयुष्य वाट पाहतेय ही आशा निर्माण करते.

तुमचे आयुष्य तुम्हाला अपेक्षित होते तसेच चाललेय, दुःख चिंता करण्यासारख्या बाबी आयुष्यात नाहीत तर तुम्हाला ज्योतिषाची गरज नाही. तुम्हाला साडेसाती कधी येणार वगैरे विचार करून शिणू नका, तुमच्या आयुष्यात ती कधीही येणार नाही.

<<< सोपा उपाय. कोणता तरी मोठा गुन्हा करा , मग बघा साडेसाती येते की नाही? >>>
आता कसं मुद्द्याचं बोललात. मग ते अमकी-तमकी रास, ग्रहदशा वगैरे थोतांड कशाला?

<<< तुम्हाला साडेसाती कधी येणार वगैरे विचार करून शिणू नका, तुमच्या आयुष्यात ती कधीही येणार नाही. >>>
धन्यवाद, आभारी आहे.

उपाशी बोका, आयुष्यात साडेसाती यावी अशी तुमची इच्छा दिसते. ते वाचून मला महाभारतातल्या 'तुझी आठवण राहावी म्हणून संकटं दे' अशी मागणी कृष्णाकडे करणाऱ्या कुंतीची आठवण झाली Happy

करिअरमध्ये प्रचंड भरभराट, त्याचवेळेस व्यक्तिगत आयुष्यात प्रचंड अपेक्षाभंग, पण ते आयुष्य सोडून लांब जायला सतसद्विवेकबुद्धी परवानगी देत नाही म्हणून भराभराटी करीयरचे पंख कापून सामान्य करीयर स्विकारून त्याच आयुष्यात राहणारे माझे एक स्नेही होते, अजूनही आहेत. त्यांच्यासारख्या माणसाच्या वाट्याला हे सगळे का आले हा प्रश्न मला वारंवार पडायचा. एकदा त्यांनाच विचारले की हे असे तुमच्याबाबतीतच का व्हावे? ते म्हणाले, नशिबाच्या गोष्टी असतात. मी म्हटले कसले नशीब घेऊन बसलात? टाटा, बिर्ला, किर्लोस्कर कधी म्हणाले का, आमचे नशीब खूप चांगले म्हणून आम्ही यशस्वी झालो? तेव्हा ते चटकन म्हणाले की नशीब, नियती, ज्योतिष, ग्रहतारे ह्याचा विचार तेच करतात ज्यांना अपयश येते. जे आयुष्यात यशस्वी होतात ते 'मी माझ्या मनगटाच्या बळावर यश खेचून आणले' असेच म्हणतात. प्रयत्न सगळेच जण करतात, सगळेच यशस्वी होत नाहीत. यशस्वी होण्याची भरपूर कारणे असतात, चांगले नशीब हेच एकमेव कारण नसते पण नशिबाची साथ सुद्धा लागते. या स्नेह्यांची तेव्हा साडेसाती सुरू होती का माहीत नाही पण त्यांच्या आयुष्यातील खूप वाईट असा सात आठ वर्षांचा काळ मी जवळून बघितला. ती साडेसाती असावी. कारण नंतर अचानक व्यक्तिगत आयुष्यात अशा घडामोडी घडल्या ज्याने तणाव पूर्ण नाहीसे झाले, त्यादरम्यान जे काही वाईट झाले त्यातूनही नंतर चांगले मार्ग निघाले, करिअर पहिल्यासारखे होणे अशक्य होते पण तरी बऱ्यापैकी सुधारले. आता करीयरमधून रिटायरमेंट घेऊन शांत निवृत्त आयुष्य जगताहेत, मुलाची भरभराट पाहताहेत.

"आपत्ती पण अशी यावी कि तिचा इतरांना हेवा वाटावा....व्यक्तिचा कस लागावा.पडायचंच असेल तर, ठेच लागुन पडू नये, चांगलं २००० फ़ुटांवरुन पडावं..म्हणजे माणूस किती उंचावर पोचला होता हे तरी जगाला समजेल."
- व पु काळे

आपत्ती पण अशी यावी कि तिचा इतरांना हेवा वाटावा....व्यक्तिचा कस लागावा>>>> हे सर्व वाचायला,दुसर्‍यांना सांगायला(व.पुंना उद्देशून नाही) खूप सोपं आहे.व्यक्तीशः भोगताना कठीण आहे.

उ बो
तुम्ही हनुमंताची उपासना / भक्ति करत असाल तर साडेसातीचा त्रास अत्यल्प / नगण्य जाणवतो (बहुतांश जाणवतच नाही आणि जी संकटे त्या काळात येतात ती अंतिमतः भविष्यात फायद्याचीच सिध्द होतात ― इति मीच Happy कारण अनुभवाचे बोल )

Hi,
Mazi dhanu raas aani Shani 8 vya grahaat yurenous,nep aani Chandra sobat...
Saadesatee Cha kitpat trass....???

नवऱ्याची शनी महादशा सुरु आहे.
तब्येतीच्या तक्रारी 2 वर्षांपासून सुरु आहेत.
एक ऑपेरेशनही झालं पण तरी तब्येत सुधारत नाही.
हे कमी म्हणून की काय हापिसात मॅनेजर चा त्रास सुरु झाला आहे.
शारीरिक, मानसिक पातळीवर दोघांचाही कस लागतो आहे.
आणखी 3 वर्ष आहे म्हणे त्याची महादशा.
आम्ही दोघेही इतक्यातच दमलोय. अजून 3 वर्ष कशाकशातून जावं लागणार काय माहिती (sad बाहुली ).

इथे कुणी शनी महात्म्य वाचलंय का?
नवऱ्याला वाचायला सांगितलं आहे.
अर्थात त्यानं येणारी संकट कमी होणार नाहीत हे माहितीय
मनःशांती साठी वाचायला सांगितलंय.
पण त्यात बरेच अध्याय आहेत.
एवढं सगळं एका बैठकीत वाचणं अपेक्षित आहे का?
की रोज थोडं थोडं वाचलं तरी चालतं?

एवढं सगळं एका बैठकीत वाचणं अपेक्षित आहे का?
की रोज थोडं थोडं वाचलं तरी चालतं?>>> हो चालते! तुमच्या नवर्याच्या अन्य श्रद्धा स्थाने असतील तर त्या त्या श्रद्धांचे आचरण करावे. ही मन:शांतीसाठी असलेली माईंड डायव्हर्टिंग टेक्निक्स आहेत. अश्रद्धांची सुद्धा अश्रद्ध श्रद्धास्थाने असतात. Happy

प्रतिसादाबद्दल धन्यवाद घाटपांडे काका.
नवऱ्याची एकूण श्रद्धा बघता तो हे सगळं कितपत करेल यात शंकाच आहे.
ह्या कठीण परिस्थिती तून बाहेर पाडण्यासाठी आम्हा दोघांना मानसिक आणि शारीरिक बळ मिळो हिच देवाकडे प्रार्थना...

रुचा, शनि महात्म्य मोठे आहे परंतु रोचक आहे. रस घेउन वाचले तर कंटाळवाणे होणार नाही.
बेसिकली आपल्या मनाची शांती महत्वाची. मग थोडंथोडं वाचा, पूर्ण वाचा कसेही. प्रघा यांनी उत्तम सल्ला दिलेला आहे.

शनि महात्म्य मोठे आहे परंतु रोचक आहे. रस घेउन वाचले तर कंटाळवाणे होणार नाही>>ओह्ह हे माहिती नव्हतं. मी ते जस्ट
चाळ ल होत. मी वर म्हटल्याप्रमाणे नवऱ्याने वाचणं अपेक्षित आहे.
बघू त्याला सांगून बघते. प्रतिसादाबद्दल धन्यवाद सोनाली.

शनिदेव हे आयुष्यात काहीच चिरंतन नाही, जे काही आहे ते एक दिवस संपेल त्यामुळे यात गुंतून न राहता जे शाश्वत आहे चिरंतन आहे त्याचा पाठपुरावा करा हा संदेश द्यायलाच जणू आयुष्यात साडेसाती किंवा महादशेच्या स्वरूपात येतात. त्यामुळे या काळात संसारात, व्यवहारात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. उद्देश्य हाच कि संसारातील किंवा या जगतातील क्षणभंगुरत्व लक्षात यावे. त्यामुळे असे मानले जाते की संसारातील आसक्ती जास्त असेल तर त्रास जास्त होतो. अर्थात हे फळ केवळ याच नाही तर पूर्वजन्मातील कर्मांवर पण अवलंबून असते. त्यामुळे नक्की काय केल्याने त्रास कमी होईल हे वारंवार सांगणे अवघड आहे. त्यासाठी पत्रिका योग्य ज्योतिषाकडून तपासून घेऊन तश्या प्रकारे साधना करावी.
तरीही शनी महादशेत किंवा साडेसातीमध्ये काही छोट्या आणि सोप्या गोष्टी पाळल्या तरी साडेसाती किंवा महादशा खूपच सुसह्य होते.
प्रथम म्हणजे गोरगरिबांना यथाशक्ती मदत करणे. शनी ही गोरगरिबांची देवता आहे. त्यांना मनापासून केलेली मदत नक्कीच त्रास सुसह्य करू शकते. दुसरे म्हणजे परमेश्वरी शक्तीला शरण जाणे. आपल्यापेक्षा वरचढ ह्या जगामध्ये एक शक्ती आहे आणि त्या शकतील अनन्यभावे शरण जाण्याने आत्मिक बळ वाढते आणि त्रासही कमी होतो. शनिदेव हे आयुष्यात काहीतरी शिकवायला येतात आणि एकदा ती गोष्ट शिकली की होणार त्रास आपोआप कमी होतो. मध्ये माझ्या एका मित्राला साडे साती सुरु होती आणि त्याला ऑफिस मध्ये प्रचंड अपमान सहन करावा लागला त्या काळात. परंतु तो स्वतः देखील थोडा उद्धट आहे. कधीकधी विचार न करता फटकीनी बोलून जातो जे दुसऱ्याच्या मनाला लागते. साडेसातीमधील त्रास त्याला नम्रपणा शिकवण्यासाठीच होता.

शनिदेव ही सत्य आणि न्यायप्रिय देवता आहे. त्यामुळे या काळात दुसऱ्यांना फसवणे, आर्थिक लुबाडणे, कामाचा मोबदला न देणे किंवा दुसऱ्याच्या कामाचे श्रेय स्वतः घेणे अश्या गोष्टी टाळाव्यात. तसेच ऐषोआराम, अतिशय सुखासीन जीवन किंवा राहणीमान देखील टाळावे. थोडक्यात पतंजली योगातल्या इ आणि नियम यांचे यथाशक्ती पालन केल्यास त्रास बराच कमी होतो. याव्यतिरिक्त कोणत्याही देवाचे ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे किंवा इष्टदेवतेचे किंवा कुलदेवतेचे नामस्मरण देखील उपयुक्त ठरते. शनिमाहात्म्य वाचनाने देखील फायदा होतो परंतु भाव आणि भक्ती हवी नाहीतर तेही व्यर्थ. त्याऐवजी इष्टदेवतेचे किंवा कुलदेवतेचे नामस्मरण जास्त फायदेशीर ठरते कारण शेवटी परमेश्वरी शक्ती एकच आहे.

तुमचा त्रास कमी होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

सोहंजी, नवऱ्याची पत्रिका कोथरूड मधल्या एका निष्णात kp astrologer ला दाखवली होती आणि त्यानेच नवऱ्याला शनिमाहात्म्य वाचण्याचा आणि रोज मारोतीस्तोत्र म्हणण्याचा सल्ला दिला आहे. डिटेल प्रितिसादासाठी खूप धन्यवाद.

Submitted by me_rucha on 19 September, 2019 - 18:28 >>>> त्रास कमी होणार नाही हे माहीत असूनही मानसीक शांतीसाठी दुसरे भरपूर चिंतनात्मक-मननीय पुस्तके आहेत. कृष्णमूर्ती, रमण महर्षी, ओशो, निसर्गदत्त अशी बरीच ज्ञानमार्गातील लोक चांगलं सांगून गेलीत. शनिमाहात्म्य एक गोष्ट म्हणून वाचायची असेल तर निवांत झोपून-पडूनही वाचता येईल. शनी कर्मफळ दाता असून आधी जे पेरलं ते उगवतं या काळात. शनीचा काय प्रत्येक ग्रहाच्या दशेत हाच नियम असतो. मोठ्या अनुभवातून सांगतोय शनी किंवा कोणताही ग्रह उपाय- तोडग्याना दाद देत नाही. शनी माहात्य्म वाचन, मारुती स्तोत्र किंवा इतर उपासना या ठराविक काळात करायच्या गोष्टी नसून त्या नित्यजीवनाचा भाग असतील तरच फळतात काहीएक काळ लोटल्यावर. अर्थात चान्गल्या गोष्टीला मुहूर्त पाहायची गरज नसल्याने तुम्ही ह्या निमित्ताने का होईना चालू कराल तर चांगलंच आहे. फक्त काही उद्या तुम्हाला अपेक्षित फळ न मिळाल्यास त्यात मारुती- शनी दाद देत नाही असं नको वाटायला.
ज्या देवतेची इतक्या दिवस काही उपासना असेल तिलाच चालू ठेवलेलं उत्तम. बाकी राम रक्षेचे संपुट लावून हनुमान चालीसा पठण , काळभैरवष्ट्काचे संपुट लावून देवीकवच, गजेंद्रमोक्ष असल्या प्रभावी उपासना आहेत, पण इथं हेटाळणीखोर मंडळी जास्त असल्याने त्यात पडत नाही. शिवाय त्यांनाही बराच वेळ द्यावा लागतो आणि आचार-वर्तणुकीचे नियमहि लागू पडतात. हे करायला जमलं तरी कर्मफळ अटळच आहे फक्त थोडा त्रास कमी होऊन पुढील आयुष्यात कुठेही उपयोग होईल योग्यवेळी.

ज्यांना शनिवारी सुट्टी असते त्यांनी कामाला जात जा, शनिवार शनी देवाचा वार आहे, शनी मेहनतीची देवता आहे, शनी देवाला शनिवारी आळसात झोपलेली माणसं आवडत नाहीत, जे शनिवारी आळसात उशिरापर्यंत झोपून राहतात त्यांना साडेसातीत जास्त त्रास होतो.

शनि साडेसातीमध्ये मी भयानक त्रास भोगलेला आहे. परंतु तदुपरांत जे काही कमावलं, जे काही शनिने दिले, त्याची तुलनाच नाही. एकदम स्टेबल, अतिशय मनःशांति दिली. तेव्हा आयुष्यात येतो जरुर पण कमालीचे काहीतरी दान पदरी टाकुनही जातो असा माझा अनुभव आहे. माझ्याच एका लेखातून (https://www.maayboli.com/node/69281) -
>>श‌नि या ग्र‌हास क‌र्माचा कार‌क अशी उपाधी दिली गेलेली अस‌ली त‌री फ‌क्त श‌नि हाच जात‌काच्या आयुष्यात येणाऱ्या अड‌च‌णी दाख‌वितो असे म्ह‌ण‌णे हे अतिसुल‌भीक‌र‌ण ठ‌रेल्. श‌नि जात‌काच्या आयुष्यातील अतिमंद‌ ग‌तीने पुढे स‌र‌क‌णाऱ्या अड‌च‌णी, आव्हाने,स‌म‌स्या, क‌सोटी ज‌रुर द‌र्श‌वितो. ज्या घ‌राम‌ध्ये श‌नि प‌ड‌तो ज्या अन्य ग्र‌हांशी तो दृष्ह्टींम‌धुन (aspects) स‌ंप‌र्कात येतो त्यातुन ब‌रेच् आराख‌डे मांड्ता येतात हे स‌त्य‌ आहे. प‌र‌ंतु लोकांम‌ध्ये "क‌र्म्" या विष‌याब‌द्द‌ल‌ची स‌म‌जूत म्ह‌ण‌ज काहीत‌री न‌कारात्म‌क, भ‌याव‌ह‌, क‌सोटी, न‌शीबाने घेत‌लेली प‌रीक्षा अशी चूकीची अस‌ते. आणि त्यामुळे श‌नि ग्र‌हाने द‌र्श‌विलेले प‌रीणाम‌ही त्याच छटेत पाहीले जातात्. प‌रंतु हे अतिसुल‌भीक‌र‌ण झाले.आता क‌र्म म्ह‌ण‌जे त‌री काय त‌र श‌निचे घ‌र, श‌निची दृष्टी (स‌ंल‌ग्न = ० अंश‌, काट‌कोन्=९० अंश, प‌र‌स्प‌र‌विरुद्ध = १८० अंश्) या आप‌ले त‌थाक‌थित वाईट क‌र्म द‌र्श‌वितात म्ह‌ण‌जे काय त‌र श‌नि जात‌काच्या नैस‌र्गिक प्र‌कृतीस, जीव‌नेच्छेच्या नैस‌र्गिक निर्मीतीक्ष‌म अशा ऊर्जाप्र‌वाहास बाधा आण‌णाऱ्या आप‌ल्याच स्व‌भाव‌विशेषास अधोरेखीत क‌र‌तो. भाषांत‌र अव‌घ‌ड गेल्याने लेख‌काचे स्व‌त:चे श‌ब्द् देते आहे -
These challenging aspects of Saturn show crystallized habit patterns of thought and action which inhibit the flow of our creative energy.
उदा - पूर्व‌ज‌न्मी केलेल्या स‌त्तेचा किंवा एखाद्या गुण‌विशेषाचा दुरुप‌योग जो की या ज‌न्मी सुधारुन व्य‌व‌स्थित कृतीशील, चॅन‌लाइझ क‌र‌ण्याची मिळालेली स‌ंधी श‌नि ब‌हाल‌ क‌र‌तो. जीव‌नाची ती क्षेत्रे श‌नि द‌र्श‌वितो ज्याम‌ध्ये मूल‌भूत, आमूलाग्र त‌ड‌जोड ग‌र‌जेची होऊन ब‌स‌ते.>>

सामो खरंच आपल्या ज्योतिष व्यासंगाला सलाम, लिंक मधील केतू, शनि च्या वैशिष्ट्यांची छान ओळख आवडली.

@me_rucha
pl check your myboli inbox

Pages