बळीराजा की बळी गेलेला राजा?

Submitted by www.chittmanthan.com on 5 April, 2019 - 03:36

काल रद्दी घालण्यासाठी न्यूजपेपर पोत्यमध्ये भरत होतो. त्यावेळी गेल्या वर्षीचा एक पेपर हातात पडला. सहज नजर फिरवली तर काही हेडलाईन्स वाचल्यानंतर वाटलं या बातम्या जर क्रमाने लावल्या तर शेतकरी आत्महत्या, कारणे आणि उपाय सगळेस समजेल

पहिल्यांदा बातमी होती ती म्हणजे यंदा ९८% पाऊस!! म्हणजे सगळ्यात पाहिलं गेम निसर्गाने केला..!! लगेच दुसरा हल्ला तो म्हणजे मान्सून कमीपण आणि उशिरापण..!! निसर्गानं शेतकऱ्याच्या नशिबाला हा बेभरवशी पांडू जो पडला तर अगदी मुसळधार आणि नाही तर यंदा काही खरं नाही.

मान्सून पण काय त्याच्या मर्जीने चुकत नाहीच. माणूस नावाच्या स्वताला सर्वश्रेष्ठ समजणाऱ्या प्राण्याच्या निसर्गातील हस्तक्षेपामळे जे ग्लोबल वॉर्मिग होतंय त्याचाही फटका पावसाला बसतोय.

त्या पेपर मधली पुढची बातमी होती "भाज्यानी खाल्ला भाव" मागच्या वर्षी जो शेतकऱ्यांचा संप झाला त्या काळात भाजीपाला आणि दूध यांची बाजारपेठेत टंचाई होती आणि त्याचे दर गगनाला भिडले गेले . परराज्यातील माल आयात करावा लागला. जवळपास दुप्पट दर असूनही शेतीमाल खरेदी केला गेला. मला वाटतं १० रुपयांची कोथिंबीर ८ रुपयाला मागणाऱ्या पब्लिकला खरी किंमत कळायला शेतकऱ्याला संप करावा लागतो हे खरंच दुर्दैव आहे.

शेतकऱ्याच्या पत्रिकेतील आणखी एक मंगळ म्हणजे व्यापारी...!! हे लोक शेतमालाचा दर पाडून अगदी नगण्य दरात खरेदी करतात . परवा शेतकऱ्याची कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांचा तर विकायचाच खर्च मालाच्या किमतीपेक्षा जास्त झाल्याने शेवटी वैतागून त्याने ते पैसे पंतप्रधानांना money order केले.

शेतकऱ्याला जर हमीभाव मिळवून द्यायचा असेल आणि स्वामिनाथन आयोग प्रामाणिकपणे लागू करायचा असेल तर शेतीला उद्योगधंद्याच्या पंक्तीत बसवलं पाहिजे. ज्याप्रमाणे उद्योगाला जागा , भत्ता आणि परवाना दिला जातो त्याप्रमाणे शेतकऱ्याला आपला माल विकण्यासाठी फक्त शेतकऱ्यांनी चालवलेली बाजारपेठ बनवायला पाहिजे. आणि हो ही बाजारपेठ मोठ्या शेतकऱ्यांनी ताब्यात घेऊ नये म्हणून या ठिकाणी विक्रीसाठी परवान्याची अट काढून टाकावी.

मागच्या वर्षी कर्जमाफी देऊ अशी घोषणा झाली . अनेक लोक याला विरोध करतात म्हणतात की पाहिलं सक्षम बनवलं पाहिजे . प्रत्येकाची वेगवगळी मते असतात. पण दोन्ही गोष्टींचा समतोल राखून काही करता आल तर बघता यावं. ज्याप्रमाणे किमान उत्पन्न देता येऊ शकत तस किमान दर ही देता येऊ शकेल. जितका दर कमी तितकी भरपाई..!!!

शेतकरी आंदोलन अशी गोष्ट आहे ज्यामध्ये सत्ताधीश सोडून सगळे लोक स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि स्वताला मोठं करण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर करतात. पुन्हा ते सत्तेत आले की सत्तेतून गेलेले संप करतात.म्हणजे ज्यांचा वापर करून सत्ताधीश बनलं जात ते फकीर ते फकीर राहतात.

एका कवीची एक कविता आहे

" अवघे झाले जीर्ण शिर्न,सुन्न झाल्या दिशा...खूप सोसले आता झाली मुक माझी भाषा...!!!

त्याप्रमाणे शेतकरी सहन करतो आणि जेव्हा कुटुंबाची फरफट चालू होते त्यावेळी तो आत्महत्या करतो. आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही की आपल्याला या गोष्टीचं घेणं देणं नसतं. त्यामुळं शेतकऱ्याला स्वतःलाच आंदोलनच हत्यार उचलाव लागत. हे हत्यार जेव्हा मिटवण्याचा आणि दाबून टाकण्याचा पलीकडे जात तेव्हा कर्जमाफी होते अस म्हणतात...!!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users