लोकशाही झिंदाबाद

Submitted by Prshuram sondge on 3 April, 2018 - 12:37

आता आताचं ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या.गाव गावचं पुढारी निवडण्यात अालं.या गाव पातळीवरच्या निवडणूकात भी भारी रंगत अाली.नात्या गोत्यात,पावण्या रावळयातचं फाईटी लागल्या.सख्या सासू सुना आमने सामने अाल्या.भावा भावातल्या दुश्मन्या टोकाला गेल्या. बाप लेक एकमेकांची उणी धुणी काढु लागले.बाधांवरल्या दुशमन्या गावाचे मोठे प्रश्न झाले.गावातल्या पोरा पोरीची लफडे,मोठयाला माणसाची जुगाड प्रचाराची मुद्दे झाले.जातीजातीचे गटाव झाले.भावकीचे गटाव झाले.तालुक्यातील,परिसरातली नेते मंडळी आपआपला पाऊर वाढण्यासठी गावागावात चकरा मारू लागले.डावपेच रंगलं.कुणी खुटया हाणू लागलं.कुणी गुंडया मनात धरू लागलं.सारं रोडची धाबे फुल्लं चल्लु लागली.पंग झालेली माणसं प्रचार करू लागली.इरोधातल्याची आयमाय उजारू लागले.पापंलेटी,बॅनरं झळकू लागले.गावातली हुशार माणसं बेरजा करू लागले.एक्झीट पोल सांगू लागले.कशाच्या ही वावडया उठया लागल्या.साध्या साध्या गोष्टीवर माणसं हमरी तुमरी येऊ लागले. वातावरण तंग झाले.कवा काडी पडणं कवा भडका उडलं.याचा नेम राहीला नवहता.रातच्या बैठका रंगू लागक्या.एकदंरीत वातावरण चांगलचं तापलं होतं. अशाच एका संवेदनशील बूथ असलेल्या गावात निवडणूकीत मतदान अधिकारी म्हणून माझ्या एका मित्रांची निवड झाली होती. त्यानं सांगितलेली ही घटना अाहे.त्यानं सांगितली पण अापल्या सभोवती सरार्स या घटना घडत असतात.आपण तसे याबाबतीत एवढे गंभीर नसतोत.गंभीर तर नसतोतच पण बेजबाबदार ही असतोत. मतदाराला मतदान स्वतंत्रपणे व निर्भीडपणे करता यावे असा प्रशासनाचा प्रयत्न असतो.ते अधिकारी याचा कसून प्रयत्न करत होते.अनेक उत्साही कार्यकर्ते नियमाचं उल्लघनाचं करण्याचा प्रयत्न करत होते.अर्थात त्यात स्टंटचबाजीच जास्त असते.मोठयाने आवाज करणे,उगच शिव्या देणं,समोरच्यावर अाक्रमण करणे.हे सारं उगचं करणं.दहशत पसरविणे हा त्यांचा उद्देश असतो.कधी कधी अापणच फक्त प्रमाणिक अाणि आक्रमक कार्यकर्ता अहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.ती त्यांची गरज असते.प्रत्येक धंदयाचं एक कौशल्य आसत.एक नीट असते.राजकारण हा जर धंदा मानला तर अशी नाटक करणं अावश्यकच असते.अभिनय उत्तम करावा लागतो.एखादया कसलेल्या कलाकारापेक्षा ते ग्रेट असतात. नेत्यांना ओरिजनल स्टेज असते. इतर पात्र ही खरे खुरे माणसं असतात.त्यांच्या भावना नाटकी नसतात.ओरिजनलं स्टेजवरहा अभिनय करावा लागतो.एकटयालाच हे करावं लागतं.असा' शो 'च असतो पण गोंधळ होतो.तो खरा गोंधळ होतो.पोलिस शिपायाची दमछाक होते.अनेक लोक पळत ....पुन्हा येत.मतदान केल्यानंतर तिथचं थांबत.अापल्या मतदानाचा अधिकार बजावून शांत जाणारे मतदार दुर्लभ असतात.गावातील झाडून माणसं मतदानाला आणण्याचा प्रयत्न जो तो करत होता.म्हतारे कोतारे,रानातून छप्परातून आणले जात होते.कुणाला गाडीवर. ...कुणाला चालत,तर कुणाला चक्क पाटकोळी....त्यांना अंधाळे दाखवून मतदान घरातले लोकच ठोकतहोते.या वेळी मात्र दोन्ही पार्टया समजदार होतात.विधानसभेत नाही का सारे आमदार एक होऊन स्वत:चं मानधन व भत्ते वाढवून घेत.बहुमताने नव्हे तर सर्वानुमते.

असाच वेळ गेल्यानंतर एक जर्जर म्हतारी आणली गेली. तिला चक्क उचलूनच आणलं होतं.एका तरूणाने त्याला अजून मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला नसावा .तो इतका लहान वाटत होता.त्याला नुकतचं मिसरूड फुटलं व्हतं.त्याचं तिथ यायचं काहीचं कारण नव्हतं. तो म्हतारीचा सोबती म्हणून आला होता.त्यालाच म्हतारीच मतदान ठोकायचं होतं.अाता ज्यालाच मतदानाचा अधिकार नाही त्याला दुस-याच मतदान करण्याचा अधिकार कसा दयायचा? हा प्रश्न अधिका-यासमोर असताना तेवढयात दुसरा ही मुलगा पळतच आला.तो ही म्हतारीचा नातू होता.हा ही नातूच होता.मीच मतदान करणार म्हणून त्यांनं लांबूनच डरकाळी फोडली.जो घेऊन आला होता.त्यान तर अगोदरच दावा केला होता.आता दोघांची तिथचं जुंपली.अर्थात दोन्ही पार्टयाचा नेहमीप्रमाणे काही आक्षेप नव्हता.ते म्हतारीचे नातूच होतॆ. अधिका-याने उत्तर घराच्या भांडणात पडायला नको.त्यांचे आपापले सपोटर ही बोलू लागले.प्रश्न हा होता.कोणत्या नातवाला मत ठोकू दयायचे? एकच कालवा झाला.मतदान अधिका-याकडं प्रकरणं आलं. अधिकारी: "आजी,खरच दिसत नाही का ?" आजी:" म्या काय दाटून म्हणतेयं काय ? पारं डोळयाचं खाचा झाल्यात की." अधिकारी:"हे बोट किती?" तीन बोट म्हतारी पुढं दाखवत ते म्हणाले.म्हतारीनं थोडा वेळ घेतला.पटकन उत्तर दिलं. पाच"तसं त्यसतलचं एकजण अाराडलं,सायेब,म्हतारी काय लबाड बोलती काय? खरच तिला दिसत नाही." सायबाची भी खात्रीच झाली होती.त्यांनी पुढच्या प्रश्न विचारला,"हे दोघ कोण आहेत ?" आजी:" हा थोरल्याचं नि हा धाकल्याचायं." अधिकारी:मतदान कुणाला करू दयायचं ?" आज:"या धाकल्याच्याला.इकासला".असं ती म्हतारी म्हणल्या बरोबर थोरल्याचं ते पोरग पारं म्हतारीच्या अंगावरच धावून गेलं आणि म्हणालं,"म्हतारे काय म्हणालीस ?" आजी :"काय नाय बाबा तुला देते ना निम्मे.तेव्हचं नातू नि तू नाहीस काय ?" नातू :"बघ इचार कर.मतदान मला करू दे."तो पोरगा डायरेक्टचं दम टाकत होता.हा काय तमाशा आपल्यामुळे झालाय याचं प्रेशर त्या म्हतारीला आलं होतं.तो नातू नंबर दोन जास्तच कालवा करत असल्यामुळे त्याला बाहेर काढण्यात आलं.तवा मात्र दोन्ही पार्टया हातघाईवर आल्या.तेव्ह कराकरा दात ओठ खातचं बाहेर गेला.ते पण मोठं रगील होतं.मागं गुरकू गुरकू बघ. सर्व प्रोसीजर झाल्यानंतर त्या नातवांन मतदान केल.मतदान केल्या नंतर तेव्हखूश झाला होता.ते खुशीतच पळालं बाहेर.म्हतारी राहिली तिथंच.अाता म्हतारीला चालता येईना,उठता येईना.ती तिथचं अारडू लागली.बाकीचे म्हतारीला घेऊन बाहेर नेऊ लागले.म्हतारी जाईना."अगोदर त्याला बोलवा.महया इक्कासाला बोलवा."असं ओरडू लागली.इक्कासला मोठयाने चार पाच जणानी हाका मारल्या तवा तेव्ह आला.म्हतारीला हाताला धरून घेऊन जाऊ लागला.म्हतारी तरी जायला राजी होत नव्हती.अाता सा-यांनाच काही कळेना की म्हतारीचा असा हट्ट का? "तू अगोदर त्या दोन नोटा दे." "चल बाहेर देतो" "नायआता दे.इथच दे.त्या सुभ्याला लगेच माझ्या हाताने देते.तेव्ह आताच डाफरून गेलाय.उग कशाला भांडणाचा कहारं."ती सर्व लोकांकडे पाहत पाहत म्हणाली.लोकांचा काहीच आक्षेप नव्हता.अर्थात ततो पण त्याचा घरगुती मुद्दाच होता.फक्त त्यांनी तो घरी मिटवावा एवढीच अपेक्षा होती. बबळच इक्काश्या ओढू लागला.म्हतारी कावाली. ""तू दे आधी...त्याची भी अन् तुझी पण आजीच त्यांनी दिलेत ममताला.पण मला कोण देतेय.मत माझं अाणि मालक हे झालेत.म्हतारी साराचं पोलखोल करिल म्हणून त्या नातवानं एक शंभराची नोट काढली.तशी म्हतारी अोरडली,"म्या काय अांधळी काय?पाचश्याची दे" तसा तो विकास नावाचा नातू तिला ओढीतच घेऊन गेला.प्रश्न हा होता म्हतारीला दिसतं होत.ती आंधळी नव्हती.मग ती खोट का बोलली? इक्कासने हे डील केल असेल.म्हतारीच मतदान करून घेतो अस सांगून तिन्ही ही पार्टयाकडून पैस उकळले असणार.लय्यीचं चाप्टर गडया.त्याच्या चापटर पणाचे सा-यांच एकमत झालं होतं.मतदानाचा अधिकार नसलेला इक्कसही आजच मतदान विकत घेण्याच व्यवहार करतो.त्याला हा देश व्यवहारचतुर म्हणतो.मताचा निलाव केला जातोय.हे सारेच बघतात.नागरिकशास्त्राच्या पुस्तकात शिकलेले अधिकार आणि कर्तव्य कुठे शोधायचे?तेव्ह इक्कस मोठा नेता होणार.हे निश्चितच आहे.असे इक्कास गावागावातून शेकडयांनी तयार होत आहेत.भारतीय नसगरिक 'भारत माझा देश आहे'ही प्रतिज्ञा म्हणत लोकशाहीच ही झिंदाबाद करत राहील.कुणाला काही डाऊट?
परशुराम सोंडगे,पाटोदा
९५२७४६०३५८
(या व अशा अनेक कथा अाणि व्यथा वाचण्यासाठी माझ्या या ब्लाॅगला भेट दया
prshuramsondge.blogspot.com
sahitygandha.blogspot.com)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults