टीव्ही व मालिका

Submitted by शिवाजी उमाजी on 18 July, 2017 - 20:10

टीव्ही व मालिका

माणुस एक तर आक्रमक असावा किंवा फार दुबळा असावा, या दोघांनाही अनुक्रमे सर्वांचे लक्ष केंद्रित करता येते वा सहानुभुती मिळवता येते. असलेच विषय हल्लीचे हिंन्दी व मराठी मालिका तयार करणारे निवडतात, ज्या मधुन समाजाला कोणताच सकारात्मक संदेश दिला जात नाही. उलटपक्षी नैतिकतेच्या चिंद्या करीत, अनैतिक संबंधाचं बटबटीत चित्रण दाखवून केवळ साचेबद्ध नातेसंबधांच उदात्तीकरण केलेलं दाखवतात, जवळचेच काहि नातेवाईक, मित्र खलनायक दाखवत कथानक तयार करून प्रायोजक मिळवून प्रसारीत करायचे व गल्ला वाढवित रहायचे. या सार्‍यात केवळ टी.आर.पी. वाढवायच्या नावाखाली मुळ कथेचं पार मातेरं केलं जातं.

समाजात टी.व्ही. सारखे माध्यम फार व्यापक व ठोस परीणाम करणारे ठरते, परंतु काही लोकं याचं गांभिर्य न जाणता केवळ प्रायोजक सांगतात तेवढंच करतात. खोटेपणा, ढोंग, अवास्तव चांगुलपणा, पराकोटीचा द्वैष, तेवढीच सहनशीलता व जुन्या परंपरांचा पगडा व बेगडी अाव वगैरे गोष्टी सहज दाखवून लांबी वाढवत राहतात. मी मी म्हणनार्‍या एका चँनलच्या काही मालिका तर केवळ धंदेवाईक मुल्य जपून निर्माण केलेल्या स्पष्ट जाणवतात. निर्माते व प्रयोजकानी लोकांना, प्रेक्षकांना इतकं गृहित धरायला नको. एक प्रकारे हे लोक संस्कार मुल्याची पार वाट लावुन टाकतात.
(माझ्या विचारांशी सर्वांनी सहमत असावेच असा आग्रह नाही)

=शिवाजी सांगळे, मो. +91 9545976589

Group content visibility: 
Use group defaults

एक प्रकारे हे लोक संस्कार मुल्याची पार वाट लावुन टाकतात. >>> खरं आहे तुमचं एकदम.
म्हणूनच टीव्हीला शहाणी लोकं ईडियट बॉक्स म्हणतात ते काही चूक नाही.

(माझ्या विचारांशी सर्वांनी सहमत असावेच असा आग्रह नाही) >> कोणी असहमत असण्याचा प्रश्नच येत नाही.. छानच लिहिता तुम्ही.

अहो आजकाल टीव्ही, सिनेमा, नाटके, वर्तमानपत्रे, पुस्तके, मासिके हे सर्व केवळ पैसे मिळवण्यासाठी आहे. त्यातून लोकांना शहाणपणा शिकवायचा प्रयत्न केला, तर कुणि टीव्ही, सिनेमे बघणार नाहीत, काहीहि वाचणार नाहीत. त्यापेक्षा बहुजन समाजाला जे हवे ते दिले तर पैसे मिळतात.
हे समजण्या इतका शहाणपणा असूनहि कुणि त्यातून सकारात्मक नि आध्यात्मिक वगैरे शोधायला जातील तर तोंडघशी पडतीलच. सकारात्मक विचार सांगणारे अनेक आहेत. पण ते जाहिरात करू शकत नाहीत, कारण तेव्हढे पैसेच त्यांना मिळत नाहीत.