Submitted by naidu suvarna p... on 28 November, 2018 - 04:34
तुझ्या माझ्या मिलनाचा निश्चित आहे क्षण ,
हे सारे जाणते रे माझे हि मन ,
येशील जेव्हा माझ्या तू भेटीस,
आनंदाने विसावेल तुझ्याच कुशीत ,
भेटण्यास मला तू होशील आतुर,
माझ्याकडूनही न व्हावा क्षणभर उशीर,
भेटताना तुला मन असावे शांत,
मनात न उरावी कसलीच खंत,
तुझ्या माझ्या नात्याचाही होणार आहे अंत ,
विचार करण्यासही नाही मिळणार उसंत,
जन्मापासून आहेस माझ्या तू सोबत,
तरी या नात्याचा मज नाही उबग,
तुझ्या माझ्या या नात्याची अशी हि संगती,
मनापासून करते तुज एक विंनती ,
येशील जेवा तू माझ्या भेटीस,
सुगंधाची उडावी चौफेर उटी
भेटताना तुला मन असावे शांत,
मनात न उरावी कसलीच खंत,
भेटताना तुला मन असावे शांत,
भेटताना तुला मन असावे शांत,
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मृत्यूप्रती अतिशय प्रगल्भ आणि
मृत्यूप्रती अतिशय प्रगल्भ आणि संयत भावना. पण कविता म्हणून जरा सॅड वाटली.
मला जन्म मृत्य्यू मधले आयुष्य म्हणजे आनंद सोहळा असावा असे वाटते
लिहित रहा.