मायबोली गणेशोत्सव २०१८ - काव्य अंताक्षरी

Submitted by संयोजक on 14 September, 2018 - 03:35

आपण गाण्याच्या भेंड्या खेळतो तश्याच कवितेच्या भेंड्या "काव्य अंताक्षरी"
नियमावली:
१)कविता चारोळी असावी.
२)लिहताना आधीच्या कवितेतील शेवटची ओळ/शब्द घेऊन पुढील ओळी लिहाव्या.
३) शेवटचा शब्द/ओळ घेताना ती आहे तशीच घेतली जावी. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घेऊ नयेत.
४)दोन किंवा अधिक कविता एकाच वेळी किंवा काही अंतराने पण एकाच शब्द/ओळी पासून लिहीली गेली तर सर्वात आधी आलेली कविता ग्राह्य धरुन पुढील कविता लिहावी.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरुवात कोणत्याही आवडीच्या शब्दावरून केली तर चालेल का?
चालत असेल तर माझी चारोळी Happy

शब्दाविना शब्द सारे
मुके होऊनि गेले
निःशब्द भावनांना या
अर्थ देऊनि गेले

गेले गेले म्हणताना
आले फिरून सामोरे
माझे माझे ठरलेले
आसू म्हणू की सोयरे

दुहिचा अर्थ देवूनि गेले
व्यापारी देश विकुन गेले
सेनानी व्यर्थ खंगून गेले
तुरंग सारे रक्तात भिजुन गेले

मला वाटतंय असं कंटीन्यु करायचंय ->

अर्थ देऊनि गेले >> ही चारोळीची शेवटची ओळ तर पुढची-

अर्थ देऊनि गेले
जगण्याला, दर्शन तुझे
चरणी लीन होऊन तुझ्या
जीवन सफल झाले माझे

किंवा शेवटचा शब्द 'गेले'
गेले विसरुनि मी
अस्तित्व हे माझे
लाभले जेव्हा मला
चरणकमल तुझे

(दोन्ही चारोळ्या गणरायाच्या चरणी समर्पित! Happy )

{लिहताना आधीच्या कवितेतील शेवटची ओळ/शब्द घेऊन पुढील ओळी लिहाव्या.}
शेवटचा शब्द / शेवटची ओळ कुठेही आले तरी चालेल की त्यावरूनच सुरुवात करायला हवी?

नियम क्र ३ व ४ बघा.
शेवटच्या शब्दा/ओळी पासून कविता सुरू व्हायला हवी.
द्वादशांगुला नंतर नियमानुसार भरत यांनी केलेली चारोळी बरोबर आहे. आता तिथून सुरवात करा Happy

सोयरे म्हणावे की
शत्रूच त्यांस मानावे
स्वतःच्याच चुकांना
दूरतरी कसे लाथाडावे

लाथाडावे म्हणुनी ताटकळत राहिले
विपक्ष सारे एकवटुन पाहिले
हाती मात्र काहीच न उरले
बघता बघता चौथे वर्षही सरले

दूरतरी कसे लाथाडावे
आपुले म्हटले ज्यांना,
काळजावर वार करती
दया कशी येईना त्यांना.

ते काळजात वसले
हसणे तुझ्या गालीचे
बहरले माझ्या या
मनीचे फुलांचे बगीचे

फुलांचे बगीचे
स्वरांनी भिजावे
चांदण्या बनूनी
अंबरी रुजावे

अंबरी रुजावे
स्वप्न तुझे नि माझे
चांदण्यात फुलावे
हास्य तव गाली चे

रुजावे फुलांनी
ईशचरणापाशी
अंत गोड होईल
अशा ध्येयाशी

बाबारे! इधर मेरा काम नही. Happy
भारीच आहात तुम्ही सगळे. शीघ्रकवी का काय म्हणतात ते Happy मेरेभी बस की बात नही

ध्येयाशी नाते आमुचे
जसे देवाचे अन भक्ताचे
नशिब नाही हे भाळीचे
अर्पण करु फुल कर्माचे

गालीचे खळे
डोळ्यांचे तळे
कुठे बुडवावे
मन माझे खुळे

खुळे जीव वाट पाहतात
आर्ततेने त्याना साद घालतात
एखादाच असतो हाकेला ओ देणारा
जीवान्ची व्याकुळता जाणुन धावणारा

द्वादशांगुला या़ंंची चारोळी बाद आहे>>>> हो का, मेहनत वाया गेली. आधीच काही येत नाहीये Proud

धावणारा धावतो
पाहणारा पाहतो
काळ कोठे का कधी
थांबलेला राहतो?

राहतो मी चराचरात
प्रत्येकाच्या मनामनात
तरीही लोक शोधतात मला
मुर्ती अन देवळात

देवळात शांतपणे जळणारी पणती
तिन्ही सांजा मिणमिणती
स्वतः जळूनी इतरांना प्रकाश देती
वर्णाया तिला अपुरी माझी शब्द संपत्ती

देवळात माझ्या मनीच्या
मी फक्त तुलाच वसवावे
तुझीच रे मी होताना
स्वतःतच हरवून जावे

Pages