भेटी लागी जीवा-सोनी मराठी

Submitted by मोक्षू on 29 August, 2018 - 10:06

नवीन channel सोनी मराठी वर लागणारी मालिका... झी मराठी वरच्या फालतू मालिकांना कंटाळलेल्या सुज्ञ प्रेक्षकांनी काहीतरी चांगलं पहावं आणि त्यावर चर्चा करावी असं वाटतं म्हणून हा धागाप्रपंच... वेगळी कथा आणि उत्तम अभिनय...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

विकास अतिशय चुकीचं वागतोय. रेवतीला एवढं समजल्यावर, तिच्या प्रश्नांची उत्तरं त्याने द्यायलाच हवी आहेत. सर्व खरं सांगायला हवं.

स्वतः चा भूतकाळ समोर येऊ नये म्हणून ओमच्या मरणाची कामना करणे, त्यासाठी प्रयत्न करणे हे फार वाईट.

विकास परळीकर स्वतःला देव समजायला लागलाय. बाप्पाला वेठीला धरतोय. आता एकेक गोष्टी बाप्पा बाहेर काढेल त्याच्या, ज्या त्याला लपवायच्यात रेवतीपासून.

तो पत्रकार मुलीशी ओळख वाढवणार. पत्रकारावर पण संशय येतोय फोन नं स्पेसिफिक मागितला म्हणून. पण आवाज त्या दिवशी मला विघ्नेश जोशीचाच वाटला.

बापरे डोळ्यातून किती छान अभिनय केला समीर आणि मुग्धाने... Just loved it... चारदा पाहिला हात धरण्याचा scene.... खास एकदम... Young couple पेक्षाही विकास - रेवती ही जोडी खू........प आवडतेय... त्यांच्यातलं प्रेम, राग, रुसवेफुगवे, मनवणं... सगळंच मस्त आहे..

ढोल वाजवतानाचा अभिनय मस्त केला समीरने. अ न कधी कधी बोअर होतात, पण कथा छान सांगतात.

आज ती मित्राची बायको छान व्यक्त झाली, एकदम कुल पण ठाम, आकांडतांडव अजिबात नाही. तिचे डायलॉग्ज छान होते.

पण विघ्नेश जोशीने एकंदरीत मस्करी जी केली त्यावरून मला तोच आहे असं वाटतंय कारण फोन बंद आहे त्यामुळे तिला सांगायचा तो मार्ग आहे, ते काम तो करत होता.

स ध चिडला हे स्वाभाविक होतं पण त्याने वर्मी घाव घातला. त्यामुळे त्याची मानलेली बहिण पण अशी react झाली.

माझ्या मते समीर आणि बबन वर लक्ष ठेवायला त्या समीरच्या मित्राने च कुणाला तरी सांगितलं असावं . विघ्नेश जोशी ने . मुग्धा ला आलेल्या फोन वर चा आवाज त्याचाच आवाज वाटतोय . समीर ला ऑफिस मध्ये त्याच्या पेक्षा जास्त महत्व मिळत हे त्याला खटकत असावं. कदाचित म्हणूनच त्याच्या (विघ्नेश ) बायकोने त्याच्या मनात हे भरवलं असेल त्याच्यावर लक्ष ठेव . त्याची इमेज त्याच्या बायकोजवळ खराब कर . त्याची बायको त्याला सोडून जाईल समीर कोलमडून पडेल कदाचित काहीही करेल आणि जेल मध्ये जाईल आणि सगळा बिझनेस त्याच्या मित्राला म्हणजे विघ्नेश ला मिळेल असा विघ्नेश चा प्लॅन असावा एपिसोड १९ पाहिल्यानंतर ची प्रतिक्रिया आणखीन पुढचे एपिसोड अजून बघितले नाहीयेत Happy

त्या विग्नेशला मात्र त्यांच्या ऑफिस मध्ये नवीन लागलेला पत्रकार माहिती पुरवत असावा किंवा ऑफिस मधलच कोणी तरी कदाचित ती सेक्रेटरी मुलगी

२४ व्या एपिसोड च्या शेवटी मिलिंद ( विघ्नेश ) ची बायको जे काही विकास ला मुलं नसण्यावरून बोलते ते अगदीच भिडलं . सगळ्यांचे अभिनय अतिशय सुरेख आणि डायलॉग तर काय विचारायचेच नाहीत . खूप सुंदर खूप सुंदर. हि मालिका झी मराठी वर का नाही?

हि मालिका झी मराठी वर का नाही?>>>sorry पण झी मराठी कडून आता आपण काहीच अपेक्षा ठेवू नये असं मला वाटतं.. त्यापेक्षा दुसरे मार्ग शोधावे... कारण आपण काहीही दाखवलं तरी भला मोठा प्रेक्षकवर्ग बघतोच अशी त्यांना खात्री आहे... जोपर्यंत त्याच्या मालिकांचा trp कमी होत नाही तोपर्यंत हे असेच चालणार म्हणून आपणच बदललं पाहिजे.. मी तर केली आहे सुरवात... झी मराठीवर बहिष्कार Lol त्याहीपेक्षा जास्तीत जास्त प्रेक्षकांनी भेलाजी पहावी असं मनापासून वाटतं.. म्हणून हा धागा प्रपंच.. खरंच स्तुत्य आहे ही मालिका...

हि मालिका झी मराठी वर का नाही? >>> नाही ते बरं आहे, झीवाले वाट लावतात. सगळेच लावतात म्हणा पण सोनीने करु नये ही अपेक्षा.

भेलाजी >>> Lol

उशिरा प्रकाश पडला माझ्या डोक्यात.

मिलिंद ( विघ्नेश ) ची बायको जे काही विकास ला मुलं नसण्यावरून बोलते ते अगदीच भिडलं . >>> + १०००
पण barbeque party साठी हे दोघं सुटाबुटात आणि बायका ही चांगल्या डीझायनर साडीत !
असं का बरं . निदार घरी तरी साधे सुटसुटीत कपडे घालावेत की .
त्या श्वेताचे गाल कित्ती गोबरे आहेत .

मस्त जातेय सिरीयल.

विकास चुकीच्या लोकांच्या जाळ्यात हळूहळू अडकणार, त्यासाठी मित्राचा बळी देणार बहुतेक.

विहंग चांगला आहे तसा पण त्याने शेअर्सवर पैसे लावणे सोडायला हवं कारण तो स्वतः कमवत नाहीये.

कौन्सेलर totally प्रेमात आहे विकासच्या पण तो मात्र नाही. तो त्याच्या family वर मनापासून प्रेम करतो.

विघ्नेश जोशी त्या दिवसाच्या प्रसंगानंतर दाखवलाच नाही.

हो खूपच छान चालली आहे...hero फक्त गुडी गुडी नाहिये तर real hero वाटेल असा चांगला माणूस आहे... चूका माणसाकडूनच होतात आणि म्हणूनच वेगळी आहे ही मालिका.. कॅमेराचे angles पण कसले भारी घेतलेत.....मंत्र्यासोबतची meeting दाखवली तेव्हा जास्त जाणवलं... प्रत्येकाचा अभिनय उत्तम...

काय जबरदस्त सुरु आहे सिरीयल.... i am loving vikas..>>>> +10000 . त्याच character इतक complicate करून ठेवले आहे की बस् रे बस्.
विहंग आणि त्याचा सुसंवाद फार आवडला. त्या घोरपडे ला कसला घोळात घेतला त्याने ! एकदम वकीली खाक्या.
कौन्सेलर totally प्रेमात आहे विकासच्या पण तो मात्र नाही. तो त्याच्या family वर मनापासून प्रेम करतो.>>>> अगदी अगदी! ,ती हातावर हात ठेवते तर तो रेवती बद्दलच बोलत राहतो.त्या ला काही जाणवत ही नाही. तोही सीन आवडला.
योगीताचा stand अगदी बरोबर . विकास चा अगदी मोजक्या शब्दात अपमान करते.

योगीताचा stand अगदी बरोबर >>>मला नाही आवडलं योगिताचं वागणं.. विकास चुकला हे मान्य.. पण समोरचा चुकीचा वागला म्हणून तिनेही चुकीचं वागावं हे काही पटलं नाही...बरं बोलली तेही मान्य राग, दु:ख असेल तिचं... पण विकासाच्या ऑफिस वर हल्ला झाल्याची न्यूज बघितल्यावर ती म्हणते "ही तर सुरवात आहे विकासाच्या संपण्याची" ते अजिबातच नाही आवडलं..

हो योगिताचा कालचा attitude नाही आवडला. त्यादिवशी ती योग्य होती.

काल त्या मंत्रांच्या पी ए ला विकास मस्त सुनावतो.

पण विकासने बायकोला सर्व सांगावं, खरं लग्नाआधीच सांगायला हवं होतं. ती समजून घेईल असं वाटतंय मला, खरं सांगावं सर्व, वकिली बाण्याने नको.

हो मला पण योगिता नाही आवडली. मागे पण एका एपिसोड मध्ये ती असच वाकड बोलताना दाखवली आहे, विकास कुठेतरी निघून गेला असतो अँड सर्वजण वाट बघत असतात...
बाकी काही सीन्स खरंच खूप मस्त... ते ऑफिस आवरत असतात तो पण छान वाटला मला.
विकास ला शाप देणाऱ्यांचा भयंकर राग येतो मला.... आणी रेवतीला इतका ताणायची गरज नाहीये.
त्याचा भूतकाळ त्याने सांगावं की नाही हा त्याचा प्रश्न आहे, उगीच तिने त्याला फोर्स करणं मला पटत नाही. मला एक कळत नाही भूतकाळ जाणून घेऊन हि काय करणार? हीच वागणं बदलणार ahe का विकासासोबतच,? म्हणजे vikas भूतकाळात वाईट वागला असेल तर ती याला सोडून जाणार आणी चांगला असेल तर याचा उदो उदो करणार ka? जसा आहे तसा त्याला स्वीकारणं हेच महत्वाचे. मला तर असं वाटत की तिने म्हणावं "विकास तुझा भूतकाळ जाणून घेण्यात मला इंटरेस्ट नाही. तो कसा हि असला तरी माझा तुझ्यावर विश्वास आहे "..., अर्थात हे माझं मत ahe. May be मला विकास आवडतो म्हणून मी त्याच्या बाजूने विचार krte...
Anyways मी इन्व्हॉल्व्ह होत आहे सिरीयल मध्ये...

तो मुलाबद्दलच पण लपवून ठेवतो ना, फक्त भुतकाळ लपवला आहे असं नाही. मुलाबद्द्ल जाणून घ्यायचा अधिकार होताना तिला. तिला फोनवर कळतं, मग ती विचारते तेव्हा समजतं.

हो ते पण आहेच, त्यावेळी ती चिडली ते एक्दम योग्य होतं. पण आता तो मॅटर संपला. त्यात त्याने माफी मागितली सगळं झालं..... मग परत ते फोन कॉल उगीच अटेंड करते असं मला वाटलं. कारण ती फोनवल्यावर विश्वास ठेवते n विकास वर नाही असं वाटत राहत मला... Sad

पण का कोणास ठाऊक, बाहेर काही जणांना भूतकाळ माहितेय त्याचा आणि तो चुकीच्या पद्धतीने कोणी सांगण्यापेक्षा त्याने नात्यात पारदर्शकता ठेवावी आणि तिला सांगावं असं मलातरी प्रामाणिकपणे वाटतं. ती सुजाण आहे, विचारी आहे, प्रेम करते त्याच्यावर. ती स्वीकारेल सर्व.

. मागे पण एका एपिसोड मध्ये ती असच वाकड बोलताना दाखवली आहे, विकास कुठेतरी निघून गेला असतो अँड सर्वजण वाट बघत असतात...>>>>+111

Pages