Submitted by दत्तात्रय साळुंके on 28 July, 2018 - 03:46
अपूर्ण कविता
माझ्या कवितेच्या वहीत
काही पाने उगाच फडफडतात
अपूर्ण कवितेची
कथा सांगतात
भरल्या ताटावरुन उठलेल्या
माणसाची
शब्द सुरेख असतात
पानं भळाळतात
खंत
अर्धवट अनुभूतीची
उगाच म्हणायचं जगलो
परीपूर्ण
समज काढायची वेड्या
मनाची
© दत्तात्रय साळुंके
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
उगाच म्हणायचं जगलो
उगाच म्हणायचं जगलो
परीपूर्ण
समज काढायची वेड्या
मनाची
मस्तच!
क्या बात है.....
क्या बात है.....