चिरुमाला (भाग ९)

Submitted by मिरिंडा on 12 July, 2018 - 08:26

मी घरी आलो. रात्री लीनाला त्या भिकाऱ्याबद्दल सांगितल्यावर ती थोडी गंभीर झाली. तिचं म्हणणं मी त्याला धक्काबुक्की करून घालवायला नको होतं. भीक म्हणून काहीतरी देऊन घालवायला पाहिजे होतं. त्याने फेकलेल्या धान्याने तिचा चेहरा ढगाळल्यासारखा झाला.
आपल्याला मुलं आहेत , त्यांना त्याने काही केल तर .....? ही तिची काळजी मला रास्त वाटली. ती रात्र जरा विवंचनेतच गेली. शेवटी मी तिला जवळ घेऊन पुन्हा असं न करण्याचं वचन दिलं . तेव्हा कुठे ती झोपली. .........सध्या नवीन गाद्या आल्याने तिन्ही बेडरूम , म्हणजे खालच्या , वापरण्यासारख्या झाल्या होत्या. पण मुलं लहान असल्याने आम्ही त्यांना घेऊनच झोपत होतो. सध्या पावसाळा नसल्याने वातावरण आल्हाददायक होतं. मी वेळेवर घरी येत होतो पार्टीच्या याद्या तयार झाल्या. हा गोळे कोण होता मला कळत नव्हते. बँकेतलं काम सांभाळून तो मांत्रिकाचं काम कसं करीत होता, मला कळत नव्हतं. मला माझ्या लहानपण्चा प्रसंग आठवला............आमच्याच आळीतल्या एका मारवाड्याच्या सुनेला भुताने झपाटल्यामुळे भूत उतरवणारा एक मांत्रिक आला होता. त्याचं नावही गोळे होतं. वडील त्या रात्री मारवाड्याकडे बसले होते. सून मोठमोठ्याने ओरडत होती. आणि सासर्याला शिव्या देत त्याच्या अंगावर धाऊन येत होती. तिचे केस चेहऱ्यावर पसरले होते. तिचे चढलेले डोळे फार विचित्र दिसत होते. थोड्यावेळाने मांत्रिक आला त्याने काही लिंबं कापली आणि छोटासा यज्ञ केला त्यात त्याने वेगवेगळ्या पदार्थांची आहुंती दिली होती. काही काळ्या बाहुल्या तारेने बांधून तो " ओम फट स्वाहा " असे म्हणून हातातले राळे सारखे पदार्थ तो आहूती म्हणून देत होता. विचित्र तिखट वास पसरला होता. सुनेच्या तोंडावर आगीच्या लाल पिवळया ज्वाळांचा उजेड पडला होता. तेवड्यात त्याने एक लहानसा पक्षी आणला होता तो कापून त्याचीही " ओम भूत भूतेश्वराय नमः स्वाहा , असे म्हणून त्याचीही आहुती दिली. वातावरण विचित्र होते. भीतीदायक होते. तरीही सुनेचे भूत सोडून जात नव्हते. शेवटी मांत्रिकाने भुताला काय घेणार आणि हिला सोडणार असे विचारल्यावर ते म्हणाले " र क्त " . मग मांत्रिकाने एक मोठी बाटली काढली . आणि त्याला त्या बाटलीत उतरण्याचे सांगितले , तेव्हा त्याने प्रथम रक्ताची मागणी केली. ते म्हणाले, " तू लबाड बोलतोयस, आधी त्या बाटलीत रक्त दे , मग त्या बाटलीत मी शिरेन." असे म्हंटल्यावर किती रक्त पाहिजे ते विचारले. त्यावर त्याने पन्नास थेंब असे उत्तर दिले. मांत्रिक असल्या गोष्टींना तयार असतात असे दिसले. त्याने सांगितले मी प्रथम फक्त पंचवीस थेंब देईन . मग तू बाटलीत उतरायचं. भुताला ते पटेना शेवटी ते तयार झाले. त्याने आपल्या मनगटाच्या वरच्या भागावर लखलखता सुरा मारला आणि मोजून पंचवीस थंब बाटलीत टाकले . आणि एकदाचे भूत सुनेच्या केसातून खेचून बाटलीत भरले. मग त्याने पटकन बाटली लाखेने सीलबंद केली. मी स्वतः बाटलीत भरलेले भूत तेव्हा पाहिले होते. पांढऱ्या रंगाचे मोठ मोठ्या मिशा आणि दाढी असलेले भूत त्यात तरंगत होते. भुताने आकांडतांडव केलं . कमी रक्त दिल्याने ते मांत्रिकाकडे मुठी आणि दात आवळून काहीतरी बडबडत होते. वडील मला बरेच रागावले . असल्या गोष्टी मुलांनी पाहायच्या नसतात असे म्हणत ते मला घरी घेऊन आले. मी त्यांच्या नकळत तिकडे गेल्याने ते रागावले होते. असो. त्या मांत्रिकाचे नाव गोळे होते. अर्थात ह्या गोळेचा त्याच्याशी काही संबंध असेल असे वाटत नाही........

जेवणाची ऑर्डर दिली गेली. सगळ्या स्टाफचा उत्साह ओसंडून वाहत होता. माझ्या डोक्यात परत गोळेची बायको थैमान घालू लागली. पार्टी झाल्यावर मी जुडेकरला लोनचे अर्ज जास्त कसे येतात हे विचारण्याचे ठरवले. अजून दोन आठवडे होते. मी लोनच्या अर्जांची काळजीपूर्वक छाननी करीत होतो. शक्यतोवर काही ना काही हरकत घेऊन अर्ज निकाली काढीत होतो. जुडेकरच्या चेहऱ्यावर जरादेखिल प्रातिक्रिया उमटत नव्हती. खरंतर मला हे प्रकरण जिल्ह्याच्या मुख्य ऑफिसकडे जावं अशी इच्छा होती. तसं काहीच झालं नाही. पण लोनचे अर्ज मात्र येतच राहिले. कोणितरी मुद्दाम करीत असल्याचे मला जाणवत होते. पण मी तिकडे लक्ष देत नव्हतो. काही नाही तरी निदान मला मुख्य ऑफिसकडून विचारणा व्हावी असे वाटत होते. म्हणजे मी माझी भूमिका आणि मला आलेला संशय व्यक्त करीन . पण तसं काही झालं नाही. एक दिवस गोळे केबिनचा दरवाज्या ढकलून आत आला आणि म्हणाला, " सर उद्या माझ्याकडे सत्यनारायणाची पुजा आहे , मॅडम आणि मुलांना घेऊन तीर्थप्रसादाला जरूर या. " मी होकार दिला. तो जायच्या आधी मला त्याच्या तोडावर दोन तीन जखमेच्या खुणा, म्हणजे चावल्यासारख्या दिसल्या . मी त्याला विचारले, " तुझ्या तोंडावर या चावलेल्या खुणा कशा ? " त्यावर तो म्हणाला, " सर मी राहतो तिथे
डांस फार आहेत. " मग तो गेला. मी यावर काही विशेष विचारलं होतं असं मला वाटलं नाही. पण गोळे अचानक माझ्याशी जेवढ्यास तेवढं
बोलू लागला. त्याविषयी मी जुडेकरला विचारलं तेव्हा तो म्हणाला, " सर लक्ष देऊ नका, तो असाच आहे बोलेल पुढे केव्हातरी. त्याची मंत्र तंत्र साधना चालते म्हणून तो कधी मधी असा विचित्र वागतो. आमच्याशीही असाच वागतो. आम्ही लक्ष देत नाही. " मी घरी गेलो. काही काही गोष्टी मला विचित्र वाटू लागल्या. एक म्हणजे हरिदास एजंटचं वाग्णं , तो भिकारी, फकीर बाबा, जुडेकरचं अति उपयोगी पडणं , कवटी सापडणं आणि नाहीशी होणं, गोळेची बायको, गोळे , मोहंती साहेबांनी मला गाडी देणं, लोनचे अर्ज भारंभार येणं , जुडेकर आणि श्रीवास्तव यांचा संबंध .
मी यात काही लिंक सापडते का पाहू लागलो. पण यात नक्कीच लिंक असावी. घरी गेलो. लीनाचा चेहरा भेदरलेला दिसला. मी विचारलं तेव्हा तिने मला बाथरूम मध्ये येण्यास सांगितलं. मी बाथरूममध्ये डोकावलो. मला काहीच दिसेना " कुठे काय .......? इथे तर काहीच नाही " त्यावर
चिडून लीनाने म्हणाली " जरा पाणी जाणाऱ्या पाईपच्या मागे बघा. ........ " तरी मला काही दिसेना. मी मुद्दामच काही बोललो नाही. मग मी मोबालचा टॉर्च चालू केला. त्या प्रकाशात मला तिथे कवटी पडलेली दिसली. खरं तर मीही घाबरलेलाच होतो. पण माझं आश्चर्य दाबून मी लीनाला म्हणालो, " गंभीर आहे खरं हे प्रकरण . पण आपण काय करू शकतो. नाही का ? मी हरिदासला विचारतो. काही झालं तरी आपल्याला ही कवटी काढून बाहेर फेकून दिली पाहिजे. " मलाही चांगलीच भीती वाटत होती त्यावर लीना आणखीन मागे होत म्हणाली, " हो . पण सध्या
काय करायचं ....? " मी म्हंटले, " काय म्हणजे ....? कवटी बाहेर फेकून द्यायची. " मी बाहेर आलो. एक प्लस्टिकची पिशवी धेतली ती हातात घातली आणि अंग शहारत असतांनाही ती कवटी तशीच धरून बाथरूमच्या खिडकीतून बाहेर फेकून दिली. थंडीचे दिवस होते पण मला घाम फुटला होता. बाहेर आल्यावर लीना म्हणाली, " बरं झालं मुलांना दिसली नाही ते. मला वाटतं आपण वास्तुशांत करून घ्यावी. " मी विचार केला आणि म्हंटलं. , " अगं पण घर आपलं थोडंच आहे, आपण इथे भाड्यानि राहतो. तरीपण पाहतो एखादा भटजी.... " ते तेवढ्यावरच थांबलं. माझ्या मनात गोळे चा सल्ला घ्यावा असं आलं. पण बाहेर बभ्रा होईल. आणि पार्टी मध्ये विग्न येईल. " किंवा गोळेच्या हातात निष्कारण एक निमित्त येईल. आणि एकदा का मी या गोष्टीत अडकलो की मग यातून सुटका होणार नाही , असे वाटून मी भटजी पाहण्याचे ठरवले. गोळेकडे सत्यनारायणाच्या पुजेला एकटाच निघालो. त्यावर लीना म्हणाली, " हे काय मला आणि मुलांना घेऊन जाणार नाही ? " मला ती बरोबर नको असल्याने आणि गोळे जेवढ्यास तेवढे बोलत असल्याने मी तिला म्हंतलं., " अगं तसाही तो क्लास फोर आहे, त्याच्या घरी तुझं काय काम ? नाही का ? " लीनाला राग आला होता. "मग जुडेकरकडे तरी कशाला घेऊन गेलात , तोही क्लास फोरच होता.
तुम्ही बरे आता क्लास फोर क्लास थ्री करायला लागलात. तुम्हाला तर सगळे सारखेच असं तुम्ही म्हणायचात ना ? " मी जरा चीड आली .
मी म्हंटलं, " मी नाही म्हंटलय ना . मग आता पुरे. वाद नकोय मला. " ; तिला नाराज करून मी निघालो. पण मनापासून नाही. गोळेकडे गेलो. त्याने मुलं आणि बायको का आली नाही म्ह्णून काही विचारलं नाही. आत्ताही तो जुजबी बोलत होता . मी पण प्रसाद घेऊन लगेचच निघालो.
जाताना एस. टी स्टँड जवळच असल्याने आणि मला वेळ असल्याने मी पाटलांचा वाडा शोधण्याचं ठरवलं. स्टँडजवळ गाडी पार्क केली आणि
तिथे उभं राहून मी कोणत्या वाटेने पाटलांबरोबर गेलो ते आठवू लागलो. तिथल्याच कंट्रोलरच्या कार्यालयात चौकशी केली. त्यावर तिथले लोक माझ्याकडे एखाद्या वेड्याकडे पाहतात तसे बघू लागले. पाटलांचं नाव घेतल्यावर ते म्हणाले, " अहो असे पाटिल बिटिल कोणी नाही हो
या गावाला. तुम्हाला भास झाला असेल. ..... " मी मग त्यांच्या नादी न लागता मी गेलेल्या पायवाटेवरून चालू लागलो. पुढे लागणारं टेकाड
वगैरे ओलाँडून समोर पाहिले तर तिथे एक पडका वाडा होता. त्याचा वरचा मजलाही एका बाजूने पडलेला होता. मोठ्मोठाले गवत उगवलेले
दिसले. बाहेरचे गेट गँजलेले दिसले. दरवाजे केव्हाच पडलेले असावेत. आतला हॉल जिथे मी बसलो होतो तिथेही गुडघा गुडघा गवत उगवलेले दिसले. माझी चाहूल लागताच आतून चार पाच वटवाघळे चिर्र चिर्र असा आवाज करीत बाहेर उडाली. पण आत काही दिसले नाही
वरच्या मजल्यावर जाण्याचा जिनाही मोडलेला दिसला. मग मला भास झाला का ? माझँ मन मानायला तयार होईना. मी मागे वळणार, तेवढ्यात एक कँबरेत वाकालेले , काठी धरलेले , खोल डोळ्याँचे गृहस्थ दिसले. त्याँनी विचारलँ, " काय कुनाल शोधतोस ? पाटलाला ?"
मी हो म्हणालो. त्यावर ते म्हणाले," म्हँजे तू बी फसलास म्हनायचा. त्याचँ काय हाय , तीस चाळीस वर्सामागँ होता के पाटील. त्याचा पोरगा
मँम्हईला गेला. तो परत आलाच नाही. मँग हा खँगला आणि मेला की. एकटाच होता. काय करनार . पुढ गाववाल्यानी आपल्या खरचानी
त्याला नेला मशानात. . पन त्याची पोराला भेटन्याची विच्छा पुरी झाली नाय. म्हनून त्यो मँम्हईची गाडी आली का पकडतो कुनाला तरि
आनी घेऊन येतो वाड्यावर. घेतो समाधान करून . दुसरँ काय.........." " अहो पण मी त्याँच्याकडे खाल्लँ , जेवलो. ते देखिल खोटँ. ?
हासत हासत म्हातार बाबा म्हणाले," व्हतँ असँ कधी कधी, दुसरँ काय ?" आणि ते वाड्यामागे निघून गेले . आणि दिसेनासे झाले. सँध्याकाळचा काळोख पडला होता. कदाचित म्हातारबाबा म्हँजेच पाटील होते की काय , मला समजेना.

मला अजूनही त्या म्हातारबाबाचं म्हणणं पटलं नव्हतं. ज्याअर्थी मी जेवलो होतो त्या अर्थी तिथे काहीतरी असणारच.मी रात्रीच्या वेळेस जायचे ठरवले. मी घरी गेलो. गेल्याबरोबर लीना माझ्यवर कडाडली. . " तुम्हाला न्यायचं नव्हतं तर ठीक आहे, पण उशिर कितीझालाय पाहिलत का. मुलं हिरमुसली ती वेगळीच. " मी जास्त लक्ष दिले नाही. अजूनही माझ्या डोक्यातून ती कवटी गेली नव्हती. थोड्यावेळाने लीनाने मला भटजींची आठवण केली. मी त्यांच्याकडे केव्हा जाणार या विचाराने ती काळजीत पडली. मी दुसऱ्याच दिवशी जायचं ठरवलं. आता पुन्हा मला गोळेची मदत घ्यावी लागणार होती . मी जुडेकरला विचारले, त्यावर तो म्हणाला, "गोळेला विचारून सांगतो. पण कोणाकरता पाहिजे असं विचारलं तर काय सांगू ? कारण माझ्याकरता तर नक्कीच नको आहे. " मी त्याला माझं नाव सांगायला सांगितलं. त्यात एक धोका होता. गोळे त्या भटजीला कशाकरता बोलावले ते विचारेल. मी गावातल्या एका मंदिरात संध्याकाळी जायचे ठरवले. तिथल्या शंकराच्या मंदिरातील पुजाऱ्याला विचारल्यावर तो म्हणाला, " वास्तुशांत ? कुठे करायची ? तुमच्या वाड्यावर. ठिक आहे, पण मी जेवणार नाही. " मी का ते विचारल्यावर तो पुढे म्हणाला," या वाड्यावरची ही तिसरी वास्तुशांत असेल. एकदा माझ्या आजोबांनी केली. जवळ जवळ साठ ते सत्तर वर्षांपूर्वी , ते तिथे जेवले आणि थोड्या दिवसातच त्यांना देवाज्ञा झाली. दुसरी माझ्या वडिलांनी केली ती तीस पस्तिस वर्षांपूर्वी . तेही तिथे जेवले आणि थोड्याच दिवसातच तेही गेले. त्यामुळे मी जेवणार नाही. जेवायला दुसरे ब्राह्मण आणीन . चालेल का सांगा. " मला यातली काहीच माहिती नसल्याने मी होकार दिला. मग तो म्हणाला," हो पण अवकाशात आग्नी आहे की नाही हे पाहावे लागेल , तात्पुरते सतरा डिसेंबर तारीख आपण पक्की करूया. दोन दिवसांनी या. म्हणजे नक्की सांगतो. "पार्टीच्या आधी एक आठवडा वास्तुशांत करण्याचे ठरले. मी भटजी जेवणार नाहीत हे लीनाला सांगितले नव्हते.आगाऊ रक्कम म्हणून गुरुजींना शंभर रुपये दिले. लीनाला बाकी सगळे सांगितले. त्यावर ती म्हणाली , "आपण पार्टीच्याच दिवशी वास्तुशांत केली तर काय बिघडणार आहे ? त्यादिवशी सगळेच असतील. " मी नाही म्हंटले, कारण मला ही बाब गोळे पासून लपवायची होती.

दोन दिवसांनी मी परत भटजींकडे गेलो. यावेळी त्यांनी त्यांच्या घरी नेले. मंदिराच्या मागेच ते राह्त होते. जेम तेम दोन खोल्या .
पण अत्यंत नीट नेटक्या ठेवलेल्या. त्यांनी पंचांग काढ्ले. ते पाहून मला म्हणाले, " बघा आपण सतरा डिसेंबर म्हणतोय, पण त्यादिवशी महामहा वारूणी योग आहे. पण तेव्हा अवकाशात अग्नि नाही. त्यामुळे तो मुहूर्त बाद झाला. आता अग्नी असलेले दिवस म्हनजे सत्तावीस , दोन जानेवारी, तीन फेब्रुवारी. बोला कोणत्या दिवशी करु या. तुमची इच्छा असेल तसं. " मग मात्र मी सत्तावीस तारीख पक्की केली. मी भटजींना
नाव विचारले .त्यांचं नाव राजेश्वरशास्त्री पारलोके. सर्व तयारी आणण्ञाची त्यांची तयारी होती. एकूण खर्च एक हज्जार रुपये येणार होता. खरंतर मला त्यादिवशी वास्तुशांत नको होती. कारण गोळे आणी जुडेकर यांच्या गैर हजेरीत मला ती करायची होती. पण आता इलाज नव्हता. घरी आलो लीनाला सांगितले. तिला जरा बरं वाटलं. आता मला जुडेकर ला तयारी करण्यास सांगायचे होते. एक खास मांडव वास्तुशांतीसाठी मी
दोन दिवस आधी घालून घेतला. आदल्या दिवशी लीनाचा मूड जरा बरा होता. म्हणून मी मुलं झोपल्यावार बाजूचया बेडरूममधे बोलावलं. तिला जवळ घेऊन चुंबनं वगैरे घेतली. तिला मी जवळ असल्याने घाबरण्याचे काही कारण नाही. असे म्हंटले, ती पौर्णिमा असल्याने चंद्राचा प्रकाश
बेड जवळच्या खिडकीतून आत येत होता. नदीचा आवाज आणि थंडी यामुळे तिचा ही मूड चांगला झाला होता. ती मला बिलगली. एकमेकांच्या
ऊष्ण श्वासांमधे आम्ही बराच वेळ अडकलो. मग वस्त्रांची अडचणही दूर झाली. तिच्या उघड्या गोर्‍या शरीरावरून माझे हात फिरू लागले. एक
प्रकारचं मादक वातावरण तयार झालं. आता खिडकी कडून मी तिला उचलून घेऊन बेडवर आणून ठेवलि .एकमेकांच्या शरिराच्या गंधांमधे आम्ही बाजूचे जग विसर लो. लवकरच प्रणयाच्या चरम सीमेवर असताना ती एक दम चित्कारली. " ते पाहा कोण उभं आहे तिथे .........." मी तिला जास्तीत जास्त जवळ घेत म्हंटले , " चल कोणी नाही. ............" असे म्हणून मी तिच्या उघड्या छातीवरून हात फिरवीत चुंबनं घेत राहिलो. पण तिचे शरीर एकद म आक्रसल्यासाराखे झाले. तिने मला दूर ढकलले. मी धडप डत उठलो. हाफ पँट चढवीत ति च्या बोटाच्या दिशेने पाहिले. तिथे
एक पाठ मोरी काळसर सावली उभी होती. आता माझेही श्वास दुरून धावून आल्याप्रमाणे जोरात होऊ लागले. हळू हळू आणखी दोन सावल्या
तिथे दिसू लागल्या. मी माझ्या मागच्या बाजूला असलेले दिव्याचे बटण दाबले. पण लाइट गेलेल असावेत. त्यामुळे आत येणार्या चंद्र प्रकाश्याच्या
उजेडात त्या सावल्या आणखी वाढू लागल्या. लीनाची तर शुद्धच हरपली. मी सावकाश तिला उचलून बाकी कपडे तसेच टाकून तिला विवस्त्र
अवस्थेत खोलीबाहेर घेऊन मुलांच्या खोलीत आलो. तिच्या अंगावर प्रथम मी पांघरून घातले. हळू हळू ती भानावर आली. तिने फक्त एकच सावली पाहीलि होती म्हणून बरं. तिला कपाटातून दुसरे कपडे घालायला देऊन आम्ही खोलीचा दरवाज्या बंद करून झोपलो. आमच्या दोघांची ही झोप जवळ जवल गेलेली होती. पहाटे केव्हातरी डोळा लागला. आणि जाग आली तेव्हा आठ वाजले होते,. त्याच दिवशी भटजी नऊ वाजता येणार होते. तासाभराच्या आत कसे तरी सावरून आम्ही भटजींची वाट पाहत बस लो. साडेनऊ वाजता जुडेकर आला. मी त्याला आज
वास्तुशांत असल्याचे सांगितले. त्याने भटजी कोण विचारल्यावर राजेश्वर शास्त्री असे सांगितले. त्याव्र तो म्हणाला," हे भटजी ऐन वेळेवर न येण्याबद्दल प्रसिद्ध आहेत असे तो म्हणाल्याने मला चांगलीच काळजी वाटू लागली. त्यात रात्रिचा प्रसंग अधून मधून डोक्यात येत राहिला.

(क्र म श )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त चालू आहे !!

उमानु>> ग्रुप मध्ये नविन टॅब बघा तिथे सगळे दिसेल.

आपण म्हणता कथेची शैली सुधारा. पण प्रत्येकाची स्वतःची शैली असते, ती काही ना आवडेल काहीना नाही आवडणार. माझी कथा सांगण्याची
अशी पद्धत आहे. निवड आपली आहे. असो. शैली आवडलेली नसली तरीही आपण प्रतिसाद दिलात याबद्दल आभारी आहे. मी नवशिका आहे असे
मानले तरी हरकत नाही. माझा कधीही मी सिद्धहस्त लेखक आहे असा दावा नव्हता.