Mera Naam Raj Kapoor

Submitted by Niilesha on 2 June, 2018 - 11:11

RK2.jpg

Tribute to Late Raj Kapoor Ji the prolific Indian film actor, producer, director and the greatest showman of Indian Cinema on his 30th death anniversary today. Raj Kapoor Sahab dominated the Indian Film Industry with his good work with ease and poise.

While Raj Sahab called him as joker but for the hear-throb of the millions he was the Raju the common man next door. In show business where the stakes are high and pressure tremendous Late Raj Kapoor Ji went way ahead in his life to establish R K Studios, producing and directing some of the biggest box office hits in the history of Indian Cinema.

Bobby2.jpg

Amongst all of his movies I would like to share some interesting anecdotes from his movie "Bobby". The man Raj Kapoor Sahab at one point of time in his career was considered at par with the Almighty. Even the dust he tried to touch used to get converted into gold. But, after the release of "Mera Naam Joker" then next three to four years left Raj Saab under deep mental turmoil coupled with huge financial losses. Raj Sahab not only lost his parents during the said but but also lost his his dear friend and close associate Jaikishen Ji from the duo Shankar-Jaikishen.

But, as they say, "All it takes is one big success to wipe out all your previous failure". Same thing happened with Raj Kappor Ji after the release of Bobby. Raj Sahab was inspired watching the 1970 Hollywood movie "Love Story" an American romantic drama film written by Erich Segal. Lover of Archie comics Raj Sahab went ahead to read the bestselling novel "Love Story" also written by the author Erich Segal before adapting it into a movie. The adage “Love Means Never Having To Say You’re Sorry” has been well said by the author Erich Segal in his enduring classic.

Neetu Singh was one of them aspiring for the role in the movie "Bobby". She did not get "Bobby" in reel life but got her "Bobby" in real life. Two new stars were born post the release of this movie one was Rishi Kapoor and other was Dimple Kapadia. In an interview Rishi Kapoor stated, "There was a misconception that the film was made to launch me as an actor. The film was actually made to pay the debts of Mera Naam Joker".

With Jaikishen having passed away the probability of doing the music with just one half of the team was something Raj Sahab wasn't convinced off. Music score for "Bobby" was finally done by the duo Laxmikant Pyarelal Ji. It is indeed creditable that Late Anand Bakshi Saab placed his stamp of creativity in "Bobby" with his prolific lyrics. "Bobby" became a sensatational box office hit not only within India but also globally. "Bobby" restored the position of Late Raj Kapoor Ji within the industry once again in good sound and financial position. Raj Sahab became the biggest film maker and continues to remain the greatest showman of Indian Cinema.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@Niilesha
मायबोलीवर मराठीत (देवनागरीत) असलेले लेखन प्रकाशीत करावे असा संकेत आहे. तुम्ही इथे नवीन आहात म्हणून सांगतो आहे. तुम्ही या संकेताप्रमाणे लिहाल अशी अपेक्षा करतो.

कां ते व्यवस्थित सांगता येणार नाही पण काही काही अ‍ॅक्टर्स मला लहानपणापसूनच आवडले नाही. उदा. राजकपूर, राजेन्द्र्कुमार वगैरे. हे 'थोराड' व्यक्तिमत्व हिरो म्हणून बघण्याचा अन्याय लहानपणी सहन करावा लागला!

त्यातल्या त्यात राजकपूर ह्याने स्त्रीदेहाचे केलेले प्रदर्शन हा मला 'Taboo' वाटला. जवळपास सगळ्याच चित्रपटांमध्ये ओलेती नायिका व त्यांचे काही अवयवांचे deliberate प्रदर्शन काही काही ठिकाणी न पटण्यासारखे वाटते. उदा. सत्यम शिवम सुंदरम ह्या गाण्यातल्या 'पहाटगीतातील (!) चित्रिकरणामधील नटीच्या (?) श्रुंगारिक अदा!. त्यात तिने शिवलिंगाशी भलत्याच प्रकारे केलेल्या सलगीची एक अत्यंत खटकणारी अदाकरी. राजकपूरला नेमके काय सुचवायचे होते देव तोच जाणे.

असो त्याचे एकंदरीत भावणारे प्रसंग फार थोडे. इतरर्वेळेस पडद्यावर बरेच सहन करावे लागायचे.

अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. कुणाच्याही राजकपूरविषयी अस्लेल्या भावना दुखावण्याचा उद्देश नाही व त्याबद्दल क्षमस्व!

कां ते व्यवस्थित सांगता येणार नाही पण काही काही अ‍ॅक्टर्स मला लहानपणापसूनच आवडले नाही. उदा. राजकपूर,>>>> +१.मला राज्कपूर कधीही आवडला नाही. राजेंद्रकुमार आवडायचा.आता हसायला येते.एक मॅच्युअर,समंजस लूक होते.

कां ते व्यवस्थित सांगता येणार नाही पण काही काही अ‍ॅक्टर्स मला लहानपणापसूनच आवडले नाही. उदा. राजकपूर, राजेन्द्र्कुमार वगैरे. >>>> १००१ % बरोबर. पण त्याच्या सिनेमातील गाणी फार छान असायची.

यक्ष +++११११
अतिशय सुरेख पोस्ट.

बाकी लिखाण मराठीत करा कृपया.

यक्ष+1
आवडत नसला तरी राजेंद्रकुमार एखादवेळ चालेल पण राजकपूरची फारच किळस यायची.

राज कपूर यांच्याविषयी दोन टोकाचे मतप्रवाह नेहमीच ऐकायला मिळतात. त्यांच्याबाबत जितक्या चांगल्या गोष्टी चर्चिल्या जातात तितक्याच गोसिप्स (अफवा/आख्यायिका/दंतकथा) पण खूप आहेत. त्यातल्या खऱ्या किती खोट्या किती माहित नाही. निर्माता दिग्दर्शक म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक कलाकारांना पण घडवले. शंकर-जयकिशन, शैलेन्द्र, हसरत जयपुरी, मुकेश यासारखे दिग्गज आणि अद्वितीय कलाकार राज कपूर यांच्यामुळे उदयास आले. अनेक नवोदित नायक नायिका राज कपूर यांच्यामुळे घडल्या. अशा कलाकारांची पारख करून त्यांना संधी देऊन त्यांच्यातल्या कौशल्याला झळाळी मिळवून देणे हे इतके सोपे नाही. म्हणून व्यक्तिश: मला अभिनेता/दिग्दर्शक/निर्माता म्हणून ते जितके मोठे होते त्यापेक्षा त्यांच्या काळात त्यांनी जी टीम घडवली कलाकार घडवले त्यासाठी मला ते सर्वात ग्रेट वाटतात.

सुरवातीच्या काळातल्या त्यांच्या चित्रपटांचा कलात्मक दर्जा खूपच उच्च होता हे कोणीही मान्य करेल. अगदी "संगम" पर्यंत हा दर्जा कायम राहिला. ("संगम" मधली काही दृश्ये आणि प्रसंग केवळ आणि केवळ अप्रतिम आहेत). पुढे मात्र सामाजिक परिस्थिती व मानसिकता झपाट्याने बदलत गेली. तरुण वर्ग अस्वस्थ होत गेला. बेकारी, अन्याय, पिळवणूक इत्यादीमुळे असंतोष खदखदत होता. त्यातून सत्तरीच्या दशकात अमिताभचा झंझावात सुरु झाला. अन्यायाविरोधात झटणाऱ्या भडक माथ्याच्या तरुण वर्गाचे पडद्यावर प्रतिनिधित्व अमिताभ पडद्यावर करू लागला. त्यातूनच लोकांना जे हवे आहे ते सिनेमातून देणे हा फॉर्म्युला बनला. राज कपूरच्या काळातला आदर्शवाद वगैरे उराशी बाळगणारा नायक मिळमिळीत वाटू लागला. सरळ वागून मिळत नसेल तर कानाखाली आवाज काढून मिळवणाऱ्या नायकाला शिट्ट्या पडू लागल्या. याच काळात "मेरा नाम जोकर" सारखा चित्रपट फ्लॉप गेल्याने राज कपूरने बॉबी, सत्यम शिवं सुंदरम सारखे चित्रपट आणले. ते हिट पण झाले. जे विकले जात होते ते दिले गेले. मी कोठेतरी वाचले होते कि याच काळात म्हणे राज कपूरला कोणीतरी विचारले कि "अमिताभला घेऊन तुम्ही चित्रपट का निर्माण करत नाही?" तेंव्हा राज कपूरने उत्तर दिले "सेक्स सेल्स बेटर दॅन अमिताभ" (आता हे कितपत खरे खोटे माहित नाही)

पण मी काही उदाहरणे नमूद करू इच्छितो....

'संजीवकुमार, शम्मीकपूर' वगैर, हे ढोले होते पण त्यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे ते नेहमीच बघणेबल / हवेहवेसे होते. त्यांन्ना राजकपूरसारखा 'सेक्स' वगैरे कुबड्यांचा कधीच आधार घेतल्याचे माझ्या तरी स्मरणात नाही.

जेंव्हा माझी 'नाविलाज को क्या विलाज' व नासमझी ची स्थिती होती तेन्व्हा राजकपूर चे पिक्चर्स बरे वाटायचे पण जेंव्हा खरोखरचे, उत्कृष्ट व सहजाभिनयाचे दर्जेदार चित्रपट पहायला मिळाल्यानंतर 'जाणिवा' जाग्रृत जाहल्या (थोडी समझ आयी) तेंव्हा राजकपूरच्या निर्मितींमधला पोकळपणा, फोलपणा प्रकर्षाने जाणवला!

उदा. सिध्दहस्त 'श्री. श्यामजी बेनेगलजी' ह्यांची 'भारत एक खोज' मधल्या 'महाभारत' ची निर्मिती 'समजली' (त्यांन्नी साध्यासुध्या साधनांतून केलेले अप्रतीम सेटस, तत्कालीन उपलब्धतेचा केलेला अफाट अभ्यास -केवळ अप्रतीम) (उदा. वैदिक काळात जंबुद्वीपात 'गुलाबाची फुले' नव्हती - ती आली गुलछबू 'मुगलांतर्फे' - बेनेगलांनी त्यांच्या 'खोज' मध्ये त्या त्या काळातील उपलब्ध असण्याचा उल्लेख असणारी फुलेच दाखवली -उदा. झेंडू वगैरे. पण गुलाब कुठ्ठेकुठ्ठेही नखमात्रही नाही. रामानंद सागरांच्या शिरियलीत मात्र गुलाबांची उधळण दिसते (!)...ह्याची जाणीव झाल्यानंतर तीव्रतेने खटकते! व आपण कसे 'xवत्या' बनवले गेलो ह्याचे भान येते!!)

तुम्ही एकदा माझ्या वरील प्रतिसादातील "... सत्यम शिवम सुंदरम ह्या गाण्यातल्या 'पहाटगीतातील (!) चित्रिकरणामधील नटीच्या (?) श्रुंगारिक अदा!. त्यात तिने शिवलिंगाशी भलत्याच प्रकारे केलेल्या सलगीची एक अत्यंत खटकणारी अदाकारी.." बघाच...तुम्हाला माझे म्हणणे कदाचीत आकळेल. (अर्थात हेही सांगू इच्छितो की शिवलिंगाबद्दल जाणिवा समृद्ध करणारे 'ज्ञान' प्राप्त जाहल्यानंतरच्च मला ते गाणे वेगळे भासले....)

{{{ ज्युली चित्रपटाच्या वेळी नेहा धुपिया म्हणलेली "only sex and shahrukh sells" ते आठवलं.
नवीन Submitted by अॅमी on 12 June, 2018 - 20:43 }}}

एका सुमार अभिनेत्रीच्या त्याहून सुमार आणि तद्दन बकवास म्हणाव्या अशा विधानाला ब्रह्मवाक्य म्हणावं अशी प्रसिद्धी मीडियानं दिली. हे वाक्य म्हणजे शंभर टक्के थाप आहे. सलमान खानचे बहुतांश चित्रपट त्यात शाहरुख आणि सेक्स दोन्ही नसतानाही धोधो चालतात तर कभी अलविदा न कहना सारखा शाहरुख + सेक्स असूनही फारसा चालत नाही.

>> ह्याची जाणीव झाल्यानंतर तीव्रतेने खटकते! व आपण कसे 'xवत्या' बनवले गेलो ह्याचे भान येते!!)
>> सत्यम शिवम सुंदरम ह्या गाण्यातल्या 'पहाटगीतातील (!) चित्रिकरणामधील नटीच्या (?) श्रुंगारिक अदा!. त्यात तिने शिवलिंगाशी भलत्याच प्रकारे केलेल्या सलगीची एक अत्यंत खटकणारी अदाकारी.."

हो मान्य आहे. म्हणूनच म्हटले नंतरच्या काळातला राज कपूर हा पूर्णपणे वेगळा होता व हे अनेक चित्रपट जाणकारांच्या लेखणीतूनही आले आहे. पण दुसरीही एक बाजू आहे कि आज जरी बघावासा सुद्धा नाही वाटला तरी सत्यम शिवम एके काळी सुपरहिट चित्रपट होता. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राज कपूरला तो अर्थसुद्धा अभिप्रेत असेल ते तशाप्रकारे दाखवण्यामागे. यु नेव्हर नो.

एनीवेज, त्या काळातले अनेक चित्रपट हे तसेही वास्तवादी नव्हतेच. आज अनेक जुने चित्रपट पाहिले कि बेगडी वाटतात (पण सगळेच नव्हे). तत्कालीन मानसिकताच कालबाह्य झाली आहे. तसेच अनेक दृश्ये खटकतात (विशेषकरून छोट्या मोठ्या कारणावरून लगेच ढिशुम ढिशुम वर उतरणारी पात्रे, प्रत्यक्षात लुकडा व मेकप मुळे चिकनाचोपडा दिसणाऱ्या हिरोला आर्मीचा ड्रेस घालून "मै जवान हु" म्हणून सांगावे लागत असे, अनेक चित्रपटातून अनोळखी मुलींची छेड काढल्याची दृश्येसुद्धा ग्लोरिफाय केली गेली आहेत इत्यादी) . कारण तो काळ व त्या काळातल्या प्रेक्षकांची मानसिकता आता राहिली नाही.