‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’

Submitted by shantanu paranjpe on 13 May, 2018 - 03:11

aurangzeb-1.jpg

या टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –

“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने विध्वंस केला. हिंदू तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या यात्रा भरत त्याला त्याने बंदी घातली. सर्वसाधारण जीवनात हिंदूंचे स्थान हे अतिशय कमी प्रतीचे आहे हे दर्शविणारी निशाणी त्याना आपल्या अंगावर बाळगावी लागत असे आणि त्याशिवाय राज्यातील हिंदू प्रजेवर एक तर्हेचा खास आर्थिक बोजा लावण्यात येई. याशिवाय औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदुना फक्त एकाच तर्हेने जगण्याचा अधिकार होता. जोपर्यंत एखादा माणूस हिंदू म्हणून जीवन जगत होता तोपर्यंत त्यांना स्वर्ग व पृथ्वी ही सारख्याच तर्हेने बंद होती.”

- संदर्भ- औरंगजेबाचा इतिहास (A Short History Of Aurangjeb) – सर जदुनाथ सरकार, अनुवाद भ. ग. कुंटे. (पृ. क्रमांक. ९६१)

याच ग्रंथात आणखी अनेक वाक्ये आहेत, ती अशी
-
“त्याच्या अंगातील हे सारे गुण पक्षपाती होते. त्याचे मन हिंदूंच्या द्वेषाने भरलेले असे” – पृ. क्रमांक. ५

- "कालांतराने प्रत्यक्ष सत्ता हातात आल्यावर त्याने हिंदुंवर जिझीया कर लावून त्याचा मनसुबा दाखवला. इतकेच नव्हे तर कशी विश्वेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यात आणि छत्रपती संभाजी यांना कैद केल्यावर ‘राजकीय विरोधक’ नव्हे तर हिंदूधर्मीय म्हणून हाल हाल करून मानण्यात औरंगजेबाने धन्यता मानली.” – पृ. क्रमांक. १७
-
“औरंगजेबाच्या पालमाऊ मोहिमेत त्याने पाठवलेल्या पत्रात तो असे म्हणतो की, “राजा मुसलमान होत नसल्यास त्याचा नाश करावा.” – पृ. क्रमांक. २२५

याउपर औरंगजेबाने केलेल्या हिंदू मंदिरांच्या नाशाची उदाहरणे पाहू –

1. १६४४ मध्ये गुजरातच्या सुभादारीवर असताना औरंगजेबाने अहमदाबाद येथील चिंतामणीचे नवीन बांधलेले देवालय एका गायीची कत्तल करून बाटवले आणि पुढे त्याचे मशिदीत रूपांतर केले. त्यावेळी त्यानी गुजरात मधली अनेक देवालये पाडली.

2. ओरिसा प्रांतातील कटकपासून मेदिनीपुरच्या दरम्यान असणाऱ्या प्रत्येक खेड्यातील अधिकाऱ्यांना त्याने निरोप पाठवला की मागील १०-१२ वर्षात बांधण्यात आलेले प्रत्येक देऊळ पाडून टाका.”

3. ९ एप्रिल १६६९ रोजी त्याने एक सर्वसाधारण फतवा काढला त्यानुसार ‘काफरांच्या सर्व शाळा व देवालये’ पाडून टाकण्यात यावी.

4. दारा शुकोहने मथुरेच्या मंदिराला एक दगडी कठडा बांधला आहे असे जेव्हा याला कळले तेव्हा त्याने तो कठडा पाडून टाकण्याचा हुकुम काढला.

5. याउपर त्याने १६७० च्या जानेवारीत ते देऊळ साफ पाडून टाकण्यात यावे आणि मथुरेचे नामकरण इस्लामाबाद असे ठेवण्यात यावे असा हुकुम पाठवला.

6. १६८० मध्ये जयपूर या राज्याची राजधानी असलेल्या अंबर येथील देवळांचा विध्वंस केला. लक्षात घ्या जयपूर हे मांडलिक होते मुघलांचे.

7. १६७४ मध्ये गुजरातच्या सुभ्यातील धार्मिक सनदांच्या रूपाने हिंदूंच्या ताब्यातील सर्व जमिनी जप्त करण्याचा हुकुम याने दिला.

अजून काही औरंगजेबाची ‘राजकीय कृत्ये’

१. ९ मे १६६७ रोजी मुसलमान विक्रेत्यांना द्यावी लागणारी जकात त्याने पूर्णपणे रद्द केली पण हिंदुना ती कायम ठेवण्यात आली.

२. एखादा हिंदू मुसलमान झाल्यास त्यांना मोठ्या मोठ्या बक्षीसा तो देत असे तसेच सरकारी नोकरीत मोठ्या मोठ्या जागा देत असे.

३. हिंदूंचा सण दिवाळी आणि होळी हे सण गावाबाहेर साजरे करण्यात यावेत असा हुकुम त्याने काढला.

४. सरकारी नोकरीत मुसलमान असले पाहिजेत असा नियम त्याने काढला.

उदाहरणे देऊन हात थकतील पण उदाहारणे संपणार नाहीत. एवढी सारी उदाहरणे देऊन सुद्धा काही जण औरंजेबाच्या दरबारातील एका फारसी फर्मानाचा उल्लेख करतात ज्यात ‘औरंगजेबाने पैसे घेऊन मंदीर पाडले नाही’ असा उल्लेख असतो आणि त्यावरून औरंगजेबाचा राज्य विस्तार हा फक्त राजकीय होता आणि धर्माची जोड नव्हती असे प्रतिपादन करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. एक उदाहरण ते ही लाचखोरीचे आणि त्याच्या विरुद्ध ही इतकी सारी!!! श्री. गजानन मेहेंदळे सरांच्यामते असे कोणतेही फर्मान नाही हे विशेष.

मला औरंगजेबाबद्दल वैयक्तिक वाद मुळीच नाही. तो किती साधा होता, त्याला खर्च करायला आवडत नसे, फलाण-बिलाण जरूर असेल. औरंगजेब इतिहास आहे आणि इतिहास म्हणूनच वाचला गेला पाहिजे हे खरे आहे. पण मज सारख्या सामान्य वाचकाला इतक्या स्वच्छपणे जे दिसू शकते ते शिवाजी राजांचा अनेक वर्षे अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना कळू नये यात दुर्दैव आहे. यापेक्षा सर जदुनाथ सरकारांचे पुस्तक एकदा वाचले असते तर कदाचित औरंगजेब नकीच कळला असता. औरंगजेबाचे स्वधर्मवेड लपवून पुढच्या पिढीला सांगून काय हाशील?? अनेक जण म्हणतात शिवाजी कळण्यासाठी औरंगजेब कळायला हवा, अगदी खरे आहे ते. औरंगजेबाचे धर्मवेड पाहून राजांना समर्थांनी दिलेले विशेषण लागू पडते ते म्हणजे ‘या भूमंडळाचे स्थायी धर्मरक्षी ऐसा नाही’....!!

www.shantanuparanjape.com

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते हिंदू राहिले कारण औरंगजेबाला त्याची गरज होती.
>> एक काहीतरी ठरवा रे... शिवाजी होते म्हणून सुन्नत झाली नाही की औरंगजेबाला गरज होती म्हणून झाली नाही... इतिहासकार म्हणवतो स्वतःला..
Rofl

नथुरामच्या नावाने मंदिर आणि पुतळे उभारायची तयारी चालली आहे... काय म्हणतो याबद्दल?>> अहो करा की विरोध!! नथुरामचे मंदीर उभारण्याला माझा विरोधच आहे! तो काही देव नाही मंदीर उभारायला!

तुम्ही लिहा की संदर्भ देऊन.. स्वतः लिहायचे नाही आणि दुसऱ्यांनी लिहिले की विरोध हा काय मुद्दा!!

बघा ह्या भामट्याचा खरा चेहरा कसा समोर आला. खर्‍या इतिहासकारांची भाषा अशी नसते. हे आगलावे आहेत. परांजप्याच्या सर्व प्रतिसादातली भाषा आणि सूचकता बघा....>> अरे नावाप्रमाणे दारू पिऊन नको बोलू रे..मी सभ्यच बोलतो आहे.. यात पुरावे देऊन मांडले आहे जमत असेल तर विरोध कर.. नाहीतर मला काही रस नाही!!

एक काहीतरी ठरवा रे... शिवाजी होते म्हणून सुन्नत झाली नाही की औरंगजेबाला गरज होती म्हणून झाली नाही... इतिहासकार म्हणवतो स्वतःला..>>

कुणी काही म्हणत नाही आहे.. कोण म्हणाले इतिहासकार? मी म्हणालो का कुठे? पुरावे दिले आहेत पुराव्यांनी विरोध करावा.. तर्काला इतिहासात थारा नाही!!

उत्तर असेल तर देशील रे.... तुला फक्त आगी लावण्यात इंटरेस्ट आहे हे पुरते कळले आहे... Rofl
तुझ्यासारखे छप्पन पळपुटे इतिहासकार पाहिलेत. स्वतःच आगी लावायच्या आणि मग स्वतःच हिंदू खतरेमें करत बोंबलत फिरायची तुमची आयडिया आता उघडी पडली आहे... जाव, अपनी इज्जर बचाव...

एक काहीतरी ठरवा रे... शिवाजी होते म्हणून सुन्नत झाली नाही की औरंगजेबाला गरज होती म्हणून झाली नाही.

नथुरामच्या नावाने मंदिर आणि पुतळे उभारायची तयारी चालली आहे... काय म्हणतो याबद्दल?>> पुतळे तर लेनिनच्या नावाने पण उभारलेत की अहो!! त्याने जर जास्त कत्तली केल्या

शिवाजी होते म्हणून सुन्नत झाली नाही की औरंगजेबाला गरज होती म्हणून झाली नाही???

परांजपे मागिल प्रतिसादकुणाला उद्देशून होता नाव न लिहीण्याचा जरा स्पष्ट करा

तुम्हाला नीट संदर्भ देऊन विचारले आहे तुम्हाला कळत नसेल तर तो तुमच्या आकलनशक्ती प्रोब्लम आहे.. ते दुरूस्त होते का बघा.

राहीले उरूस चे जे म्हणतात तर ती कबर शिवाजी महाराजांनी बनवून घेतली व माझ्यामाहिती प्रमाणे अफजल हा धार्मिक नेता पण असल्याने तिथे उरूस च्याच काळात अथवा मागेपुढे काळात सुरू झालेला आहे शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रावर मराठी हिंदूंचीच सत्ता राहीली.. मग तेव्हा ते बंद का झाले नाही? याचे उत्तर आहे का तुमच्याकडे? त्या राजेलोकांना जर ते चालत होते तर तुमची काय पात्रता त्यांना विरोध करायची?

पुतळे तर लेनिनच्या नावाने पण उभारलेत की अहो!! त्याने जर जास्त कत्तली केल्या>>> कत्तली भारतीयांच्या केलेल्या? तुम्हाला कळतंय का काय लिहीतात ते?

भेकड नथुची तुलना लेनिन बरोबर? किती हास्यास्पद Wink

परांजप्याचे तोंड बंद झाले म्हणून आता मुद्दा नसलेल्या माझ्या खर्‍या नावाच्या मागे लागला आहे.... अभ्यास न करता आखाड्यात उतरलं की अभिमन्यू होतो रे शांतनू... तुला शाखेत शिकवले नाही काय? अरेरे....

चला संघावर आले म्हणजे तुम्ही कुणाचे प्रतिनिधित्व करता ते समजले.. कबर राजांनी बसवून घेतली असली तर अफजल मेमोरियल सोसायटीची स्थापना आत्ताआत्ताची आहे दत्तू साहेब!!

तुम्ही कत्तलींचे समर्थन करत असाल तर आनंदच आहे!! ज्यांनी कत्तली केला त्याचे पुतळे उभारणे म्हणजे कत्तलीला समर्थन देण्याचा भाग झाला हा!! आणि हो जोकर खरे नाव लाव मग सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो.. हव तर फेसबुकवर देतो जाहीरपणे तुला tag करून!!

मी मेमोरियल हाॅल बद्दल बोललो का? जितके विचारले तितके उत्तर द्या> उरूस तेव्हा चालू झाला याला काहीही पुरावा नाही!! हा आत्ता आत्ता सुरु झालेला उत्सव आहे!! जेव्हा ती संस्था स्थापन झाली तेव्हा! स्वातंत्र्यप्राप्ती नंतर

शिवाजी होते म्हणून सुन्नत झाली नाही की औरंगजेबाला गरज होती म्हणून झाली नाही???

> प्रस्तुत प्रश्नावर माननीय सदस्य 'shantanu paranjpe' ह्यांच्याकडे कोणतेही उत्तर नाही असे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच प्रश्नाचे उत्तर टाळण्यासाठी, मूळ मुद्दा भरकटवण्यासाठी ते माबोचे सदस्य ज्यांचे सदस्यनाम तर्राट जोकर असे आहे त्यांना विनाकारण त्रास देऊन आपले खरे नाव घोषित करण्याचा दबाव आणत आहेत.

मायबोलीवर स्वतःच्या नावासोबतच, आवडेल तसे सदस्यनाम घेण्याची सदस्यांना पुर्ण मुभा आहे, ह्याबद्दल कोणीही सदस्य दुसर्‍या सदस्याला हिणवू शकत नाही किंवा आपले खरे नाव उघड करण्याचा दबाव आणू शकत नाही अशी माझी समजूत आहे. मायबोली प्रशासनाने ह्या वर्तणूकीबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी अशी विनंती करतो.

जोकर साहेब मी खरे नाव लिहा असे सांगतच नाही!! तुमच्या प्रश्नाला उत्तर मी तुमचे खरे नाव कळल्यावर देऊन एवढेच म्हणालो आहे!! यात माझेही व्यक्तीस्वातंत्र्य आहे की!! माबोवर असे कुठे आहे का विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायची आहेत म्हणून?? उत्तर देण्यासाठी माझी एक अट आहे ती तुम्हाला पूर्ण करायची नसेल मी का उत्तर देऊ?? बर हव असेल तर फेसबुक वर मेसेज करा, खरे नाव कळले की इकडे उत्तर देईन मी!!

रूस तेव्हा चालू झाला याला काहीही पुरावा नाही!! हा आत्ता आत्ता सुरु झालेला उत्सव आहे!! जेव्हा ती संस्था स्थापन झाली तेव्हा! स्वातंत्र्यप्राप्ती नंतर.. दत्तू हे वाचा आपण

शिवाजी होते म्हणून सुन्नत झाली नाही की औरंगजेबाला गरज होती म्हणून झाली नाही???

> प्रस्तुत प्रश्नावर माननीय सदस्य 'shantanu paranjpe' ह्यांच्याकडे कोणतेही उत्तर नाही असे सिद्ध झाले आहे

उत्तर खरे नाव समजल्यानंतर देण्यात येईल!! उत्तर द्यायचे की नाही यावर माझी असलेली अट तुम्हाला मान्य नसेल तर मी काय करू?? आणि तुम्हाला फक्त प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर फेसबुक वर साधा की संपर्क!! तुम्हाला जर खरेच प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर म्हणतोय हा मी!! उगाचच शंका असेल तर मी काय कुणीही उत्तर देत बसणार नाही!!

पुरावा नसेल तर शांत बसावे, द्वेष पसरवू नये ती कामे संघात करावी

महाराजांनी ज्यांना सन्मान दिला त्यांना आम्हीपण सन्मान देतो महाराजांपुढे कोणी नाही
संघाकडून इतिहास शिकावा इतके दुर्देव अजून आल नाही व त्यांनी तो प्रयत्न ही करू नये

आपल्याला कळले असेल ही अपेक्षा आहे

प्रस्तुत प्रश्नावर माननीय सदस्य 'shantanu paranjpe' ह्यांच्याकडे कोणतेही उत्तर नाही असे सिद्ध झाले आहे>> हे मी म्हणालोच नाही!! उत्तर आहे पण त्यासाठी माझी अट आहे!! ती मान्य नसेल करता येत तर काय करू!!

समाजात माझ्या लिखाणाने तेढ होते हे समप्रमाण सिद्ध करा!! माझ्या लेखात बिनपुराव्याने काय लिहिले आहे ते सिद्ध करा नाहीतर माझ्यावर 'तेढ निर्माण करतो' हा आरोप मागे घ्या.. मायबोली वर बिनबुडाचे खोटे आरोप करण्यात येत असतील तर माबो व्यवस्थापकांनी यात लक्ष घालावे!!

महाराजांनी ज्यांना सन्मान दिला त्यांना आम्हीपण सन्मान देतो महाराजांपुढे कोणी नाही>> महाराजांनी पहिले कोथळा बाहेर काढला आणि मग हिंदू शास्त्राप्रमाणे मेल्यावर वैर संपते या न्यायाने छोटीशी कबर बांधली!! महाराजांना मारण्याच्या हेतूने आलेल्या माणसाला आम्ही सन्मान देत नाही.

आणि काही झाले की संघाचे हा विचार बंद करा!! त्या न्यायने तुम्ही ब्रिगेडी होता!!

शंका नाहीच हो महोदय... तुम्हीच इथे केलेली दोन विधाने आहेत. त्या आधारे तुम्हाला प्रश्न विचारल आहे.. आता पर्यंत चुरु चुरु बोलणारी तुमची जीभ माझ्या एका प्रश्नावर धाडकन बंद झाली आहे ह्यातच् काय ते आले... अटीबीटी घालायला तुमचा ब्लॉग नाहीये हा... तुम्हाला हवे ते पसरवण्यासाठी ह्या संस्थळाचा वापर करणार असाल तर सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरेही द्यावीत. खरे नाव सांगा ही स्पेशल अट माझ्यासाठीच का घालत आहात? आजपर्यंत तर अशी अट कुणाला घातलेली नाही तुम्ही...? कशाला नाटके करता आता?

हे लहान मुलांचे खेळ थांबवा. हसं होतंय आता....

वैर संपल्यावर कसले कायमग? महाराज वैरापुढे निघून गेले पण तुमच्यासारखे द्वेषाचे राजकारण करणारे संघोटे मात्र त्याच कबरी भोवती घुटमळत राहीले हे महाराष्ट्राचे मोठे दुर्दैव आहे.

Pages