विपश्यना - काही प्रश्न

Submitted by विजय देशमुख on 28 January, 2014 - 20:35

विपश्यना, या विषयावर अनेकदा हा आनंददायी अनुभव आहे, इतकच वाचल्या गेलं. पण एकदा तरी विपश्यना शिबिराला गेलं पाहिजे, असाही सल्ला बर्‍याच लोकांनी दिला आहे. त्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडले आहेत.

१. ह्या शिबिराला वेगवेगळ्या केंद्रात (उपकेंद्रात) काही फरक आहे का? असल्यास कोणता.
२. या शिबिरात शिकवल्या जाणार्‍या ध्यान-पद्धती बाहेर सांगू नये, असे वाचले होते, ते बरोबर आहे का? असल्यास त्याचे काय कारण असावे?
३. या शिबिरासाठी काही पुर्वतयारी असावी का? असल्यास कोणती ? उदा. काही विशेष कपडे, जसे योगासनांसाठी वापरतात तसे, वगैरे...
४. ज्यांना रोज काही औषधे घ्यावी लागतात (उदा. रक्तदाब, डायबेटिस, इ.) त्यांच्यासाठी काही विशेष सुचना.
५. या शिबिरातुन कोणत्या अपेक्षा असाव्या/ असू नयेत.
६. इतर काही माहीती.

येत्या मार्च महिन्यात १० दिवसांच्या कोर्सला जायचे ठरतेय. बघुया, कसं जमते ते.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गौरी, लिम्बुटिम्बु, आतिवास, प्रकाश तुमचे अभिप्राय आवडले. प्रकाश, तुम्ही दिलेल्या लिंक्स खूप वाचनीय आहेत. ही गोष्ट अनेकदा जाणवते कि ध्यान धारणेचे बाजारी करण केले जाते, जसे अनेक इतर उत्पादनांचे केले जाते आणि त्या साठी शास्त्रीय द्रुष्ट्या फोल दावे केले जातात. त्यामुळे या बाबतीत लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

हे सगळे खरे असले तरीही जेव्हा वैज्ञानिक पध्दती जेव्हा धर्म किंवा परंपरा या सारख्या मुख्यत्वाने मानवी भावनांशी निगडीत गोष्टींना लावल्या जातात तेव्हा अनेकदा विवेक जाऊन तर्ककर्कश्यता येते असे मला वाटते जे तुम्ही दिलेल्या लिक्स वाचून मला वाटते. जसे काही ध्यान पध्दतीं मध्ये काही काळ सर्व जगाचा किंवा बाह्य परिस्थीतीचा आहे तसा स्वीकार करा असे सांगतात तेव्हा बाह्य परिस्थीती म्हणजे काय आणि त्याचा स्विकार म्हणजे काय आणि त्या साठी वैज्ञानिक मोजमाप इत्यादी केले गेल्याचे लिहिले आहे. वस्तूतः तुमच्या आजू बाजूंच्या व्यक्तींचा त्या आहेत तसा स्विकार करा अशा प्रकारचे मत अनेक मानसोपचार तज्ञ नाते संबंध सुधारण्या साठी देतात. अशा वेळी अशा व्यक्तींचा आहे तसा स्विकार म्हणजे काय? अशा प्रकारचे वस्तुनिष्ट मोजमाप करायला जायचे का?

एखाद्या व्यक्तीला देवा समोर दिवा लावल्यावर शांत वाटते, एखाद्याला ध्यान केल्याने शांती मिळते, एखाद्याला सुर्यास्त पाहिल्याने मिळते, कोणाला चांगले चित्र पाहिल्याने किंवा गाणे ऐकल्याने मिळते. अशावेळी त्यांना शांती मिळते हे खरे का खोटे आणि त्या साठी वस्तुनिष्ट मोजमाप काय याची चिकित्सा करत बसायची का?

मी वर लिहिल्या प्रमाणे धर्म आणि काही प्रमाणात ध्यान याचे बाजारीकरण केले जाते आणि त्या साठी काही प्रमाणात फसवणूक होउ नये
यासाठी काळाजी घेणे आवश्यक आहे. त्या द्रुष्टीने पाहिल्यास आपण दिलेल्या लिंक्स खरोखर महत्वाच्या आहेत.

त्याच प्रमाणे ज्या गोष्टी व्यक्ती परत्वे बदलणार्या आणि मानवी भावनांशी निगडीत आहेत तेथे आत्यंतिक वैज्ञानिक चिकित्सा आणि जेथे चिकित्सक असणे गरजेचे आहे तेथे विश्वास अशा गोष्टी पण घडतात. माझा एक खूप वैज्ञानिक द्रुष्टीकोनाचा मित्र, ध्यान वगैरे ची भरपूर वैज्ञानिक द्रुष्टीकोनातून चिकित्सा करत असे, पण एका विशिष्ट कंपनीचा सेलफोन घेतल्याने लोकांचे वैवाहिक नाते सुधारते, किंवा काही विशिष्ट कंपनीचे शेअर घेतल्याने जीवनातले प्रोब्लेम्स कमी होतात अशा गोष्टींवर मात्र त्याची नितांत श्रध्दा होती (शेअर खरेदी करताना अर्थशास्त्रीय निकष वापरले जात नसत, फोन घेताना किंमत, वॉरंटी ईत्यादी निकष न लावता, ब्रँड नेम वगैरे पाहिले जात असे.).

ध्यान धारणा असो किंवा वैज्ञानिक द्रुष्टीकोन असो, या सगळ्या विवेकाने, तारतम्याने घेण्याच्या गोष्टी आहेत.

Pages