धुळे ,खान्देशात एक गरमा मसाला करतात, सगळे जिन्नस कच्चे अस्तात कोनस महिती अहे?

Submitted by तनमयी on 5 December, 2016 - 05:40

धुळे ,खान्देशात एक गरमा मसाला करतात, सगळे जिन्नस कच्चे अस्तात कोनस महिती अहे?
धुळ्याची माझी एक शेजारी काकु गरम मसाला आणत असे माहेरुन ,त्याचि चव फार युनीक होती
खोबर त्यात किसुन टाकत असे धने भर्पुर आणि १० किलोचा ती तयार करत असे
धुळे ,खान्देशात एक गरमा मसाला करतात, सगळे जिन्नस कच्चे अस्तात कोनस महिती अहे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला माहित असलेली कांदा-लसूण मसाल्याची गावराण पाकृ

(आई कडून शिकले आहे ती एथे देत आहे. मी सोलापूरकरीन आहे पण धुळे ,खान्देशातली पाक्रु अशीच असेल असे वाटते)

कांदा-लसूण मसाला वर्षाचा एकदाच बनवतो त्याचे प्रमाण मी देवू शकते पण फोटो वैगेरे नाहित

हा कांदा-लसूण मसाला(आम्ही त्याला मसाला तिखट/काळे तिखट असे म्हणतो) फार झणझणीत असतो, थोडासाही पुरे होतो. मस्त तर्रीवाले मटण्-चिकण होते आणि हे वापरुन भाजी केली तर इतर मसाल्याची गरज ही नसते

साहित्य -

१ किलो लाल मीरच्या , शक्यतो लवंगी घेणे नसेल तर कोणतीही तिखट असणारी

१ किलो कांदा (कापून वाळवलेला )

१/४ लसून

१/४ धने

१/४ खोबरे खिसून / पातळ काप करून

५० ग्राम हळकुंड

५० ग्राम मोहरी

५० जिरे

मुठभर धोंड्फुल आणि तमालपत्र

तेल

१/४ किलो खडा मीठ

मसाले १ किलो मिरची साठी प्रत्येकी १० ग्रॅम (प्रत्येक मसाल्याचे २ भाग करणे - ५-५ ग्रॅम )

लवंग

दालचिनी

शाहजीरे

सालीसकट वेलची

(मिरे वापरत नाही कारण त्याने खूपच तिखट आणि जळजळीत तिखट होते, हवे असल्यास वापरू शकता पण थोड्या प्रमाणात )

इतर मसालेही वापरू शकता तुमच्या आवडी प्रमाणे

असेलतर कोथिंबीर वाळवून

सुंठ (वाळवलेले आले )

कृती-

मिरच्या १ दिवस चांगल्या कडक उन्हात वाळवणे आणि नंतर त्याची देठे काढणे (सगळ्यात कंटाळवाणे काम आणि हात हि तिखट होतात चुकून डोळ्याला लागला कि शिमगाच )

आता साहित्य भाजायला घेणे

जाड बुडाची कढई तापत ठेवणे (आम्ही गावी हे शक्यतो बाहेर चूलीवर करतो कारण पुढे सांगते)

१) त्यात आता कांदा भाजायला घ्या. तेल न घालता कांदा खरपूस अगदी लालसर असा मंद आचेवर भाजून घ्यावा, हाताने दाबले तर तुटायला हवा. आवश्यक वाटल्यास थोडेसे मीठ घालून भाजू शकता

२) लसूण थोडासा ठेचुन ठेवावा

३) धणे कपभर तेलात परतून घ्यावेत ३-४ मिनिट

४ ) आता खोबरेही खरपूस भाजून घेणे , याला तेल लागते

५) आता हळकुंड तळून घ्यायचे, तळला कि हा छान फुगतो

६) मोहरी जिरे देखील थोड्याशा तेलात टाकून परतून घेणे , हे करताना कढईवर १ मीन झाकण ठेवावे, नाहीतर अर्धे जिरे मोहरी तडतडून कढईच्या बाहेर पडतील

७) धोंड्फुल तमालपत्र आणि वापरणार असल्यास सुंठ देखील थोड्याशा तेलात तळून घ्यावे

८) साहित्यात मसाल्याचे २ भाग करण्यास सांगितले होते (प्रत्येकी ५-५ ग्रॅम )

१ भाग मसाला तेलात तळून घेणे, करपवू नयेत लगेच काढायचे तेलातून नाहीतर तुमचे तिखट कडवट होईल

आणि १ भाग मसाला तसाच कच्चा घ्यावा (याचे कारण मला नक्की सांगता येणार नाही, कदाचित मसाल्याचा सुगंध तीखटाला यावा यासाठी असेल)

आता महत्वाचा भाग, मिरच्या भाजणे

मिरच्या भाजताना भयंकर ठसका उठतो, किचनमध्ये केले तर घरात असणाऱ्या व्यक्ती याच्या ठसक्याने खोकायला लागतात म्हणून आम्ही हा मिरची भाजणीचा कार्यक्रम बाहेरच्या चुलीवर करायचो

मिरच्या मोठ्या लोखंडी पाटीत किंवा कढईत भाजाव्यात, थोडेसे कोरडे भाजून झाले कि त्यात पळीभर तेल घालावे आणि २-३ मिनिट पर्यंत चांगले भाजत राहणे (मिरची भाजताना सतत हलवत राहणे नाहीतर करपेल )

आता हे सर्व साहित्य आम्ही गावी मिरची कांडपात नेत असू पावडर करायला, मिरची कांडपाची सोय नसेल तर तुम्ही घरी मिकसर मध्ये करू शकता फक्त प्रमाण कमी हवे

एक एक करून सर्व साहित्य बारीक करून घ्यावे आणि चांगले मिसळावे

नंतर हि पावडर बारीक चाळणीतून चाळून घ्यावी आणि शक्यतो आपण लोणची वैगेरे ठेवतो तश्या चीनी मातीच्या बरणीत भरून घट्ट झाकून ठेवावे जेणेकरून मसाल्याचा वास टिकून राहील

टिप - १) भाजलेले खोबरे,कांदा आणि ठेचलेला लसुन हे तिन्ही वेगवेगळया भांड्यात ठेवावे , कांद्याचा कडकपणा टिकून राहायला हवा ना म्हणून

२) तळून राहिलेले तेल नंतर आम्ही तिखटाच्या पावडरीत मिसळतो पण जर तिखट खुप दिवस म्हणजे ६ महिने वैगेरे टिकवायचे असेल तर तेल घालू नये, कुबट वास येवू शकतो तेलाचा

ही पाक्रु मी दुसर्या संस्थाळावर दिलि होति तिथून एथे कॉपी करते आहे

तन्मयी मॅडम, विषय संपादित कराल का : धुळे ,खान्देशात वापरला जाणारा गरम मसाला कृती पाहिजे (वैगरे असा सुद्धा चालेल)

धुळे ,खान्देशात एक गरमा मसाला करतात, सगळे जिन्नस कच्चे अस्तात कोनस महिती अहे?
<<
तनमयी ताई,

यातले जिन्नस कच्चे नसतात. धणे हा मेजर बेस असतो, व किसलेले खोबरे असते हे बरोबर आहे. पण सर्व आयटम तेलावर भाजून घेतलेले असतात.

लवंग, मिरी, दालचिनी, बाजा, दगडफूल, जायपत्री, तमालपत्री, जायफळ, लहान व मोठी विलायची, शहाजिरं, जिरं, धणे, कपुरचिनी, खसखस, खोबरे इ. घटक योग्य प्रमाणात असलेले खानदेशी खड्या मसाल्याचे तयार पाकीट सुपरबाजारात मिळायला हरकत नाही.

घरी करायचे असल्यास एक्झॅक्ट प्रमाण जाणकारांना विचारून लिहितो.

***
तर, खानदेशी गोडा मसाला:

धणे : १/२ किलो
जिरे : १०० ग्राम
शहाजिरे : १०० ग्राम
मिरे : २५ ग्राम
लवंग : २५ ग्राम
दालचिनी : २५ ग्राम
जायपत्री : २५ ग्राम
जायफळ : १ नग
तमालपत्र : ५० ग्राम
दगडफूल : ५० ग्राम
मसाला वेलची: २५ ग्राम
नागकेशर : २५ ग्राम
चक्रीफूल : ५० ग्राम
सुंठ : २५ ग्राम
हिंग : पाव तोळा (२.५ ग्रॅम्स, खडा हिंग)
हळकुंडे : ३-४
खोबरे : पाव किलो
खसखस : २५ ग्राम

खोबर्‍याव्यतिरिक्त सर्व पदार्थ तेलावर वेगवेगळे भाजून व मिक्सर/ग्राइंडरमधे बारीक करून घ्यावेत.
खोबरे किसून कोरडे भाजावे. व वरील मसाल्यात मिक्स करावे.

...