Submitted by इस्रो on 22 April, 2016 - 00:08
बोलले खोटे कुणी की खूप मजला दु:ख होते
पाहतो दु:खात जेव्हा मी कुणाला दु:ख होते
मानतो की मोह होतो फूल सुंदर तोडण्याचा
पण कळी खुडतात जेव्हा लोक काही दु:ख होते
श्वापदाचे वाटणे भय साह्जिक आहे परंतू
माणसाला वाटता भय माणसाचे दु:ख होते
खर्च पैसा होत असतो जास्त थोडा काय त्याचे!
मेळ नाही लागला की केवढे मग दु:ख होते
रानडे अन रामशास्त्री आजही आहेत येथे
पण हमीवर मुक्त होता भ्र्ष्ट नेता दु:ख होते
वार हल्ले दुश्मनांचे भय कधी ना दु:ख त्याचे
सोबती करतात अपुले वार जेव्हा दु:ख होते
-नाहिद नालबंद 'इस्रो'
[९९२१ १०४ ६३०]
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नहिदभाई काफिये चुकले आहेत
नहिदभाई काफिये चुकले आहेत
गजलतंत्र पाळले गेले
गजलतंत्र पाळले गेले नाही!
शेवटचे दोन शेर छान!