असं म्हणतात की, चारोळी हा कवितेतला सर्वांत सोपा प्रकार आहे. एका लयीत बसणार्या चार ओळी जमवा, 'र'ला 'र', 'ट'ला 'ट' करत दोन यमके जुळवा अन् झाली की चारोळी तयार.
पण जातिवंत चारोळी अर्थवाही असते. कमीत कमी शब्दांत अचूक आशय पोहोचवायचा म्हणजे खायचं काम नाही.
खरं म्हणजे चारोळी हे नेमक्या शब्दांत केलेलं 'मार्मिक' भाष्य! कुठल्याही ओळी जेव्हा मनात जन्म घेत असतात तेव्हा त्यामागे एक कल्पनाचित्र असतं. त्या चित्राचा अर्थ उमगत जातो तसा तसा एक आशय जन्म घेतो आणि मग त्याला शब्दांची महिरप चढवली जाते.
आता समजा या कल्पनाचित्राच्या ऐवजी एक प्रकाशचित्र दिलं आणि 'रचा' म्हटलं चार ओळी तर? सोप्पं आहे ना?
तुम्हांला फक्त एवढंच करायचंय, एरवी तुमच्याभोवती पिंगा घालत बसणार्या, पण गरज असते तेव्हा गाव भटकायला जाणार्या शब्दांना हुडकून आणून एकेका ओळीत अचूक बसवायचंय!
तुमच्यासाठी हे अवघड नाहीये... एरवी बिनविषयाच्या विषयावरसुद्धा चारोळ्यांचे रतीब घालतो आपण. इथेतर विषय तुमच्यासमोर मूर्तिमंत उभा आहे!
तुमच्यासारख्या चारोळीकारांना काही नियम लावणं बरोबर नाही, पण काही किमान अपेक्षा आहेत!
१) चारोळीचा विषय प्रकाशचित्राला धरूनच असावा.
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी.
३) एका आयडीला कितीही चारोळ्या लिहिता येतील. फक्त त्या वेगवेगळ्या पोस्टमध्ये पोस्ट कराव्यात.
४) दरदिवशी एक नवीन चित्र देण्यात येईल.
५) तुम्हाला तुमच्या आवडत्या चारोळीला 'लाइक' करायची सोय दिलेली आहे.
६) ही स्पर्धा नाही, एक खेळ आहे.
तर होऊन जाऊ द्या.... छायाप्रकाशाच्या चित्रलिपीला लेखणीच्या शब्दलिपीचा इंगा दावा!
आजचे चित्र:
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
तू वाईट बोलत नाहीस तू अश्लील
तू वाईट बोलत नाहीस
तू अश्लील बघत नाहीस
तू आयटम साँग ऐकत नाही
काय हे!! तू जगण्यास समर्थ नाही!!!
अरे माणसा असा कसा तू.. न
अरे माणसा असा कसा तू..
न ऐकावे; ते ऐकतोस तू
न बघावे; ते न्याहाळीतो तू
न वदावे, ते नित्य बोले तू..!
ऐकून कर न ऐकल्यासारखे पाहून
ऐकून कर न ऐकल्यासारखे
पाहून कर न पाहिल्यासारखे,
पण न बोलून कर
बोलल्यासारखे.
उगाच.
असे काय पाहिलेस? असे काय
असे काय पाहिलेस?
असे काय ऐकलेस?
की दातखिळीचे
व्रत घेतलेस?
हे खाऊ नका, ते पाहू नका असं
हे खाऊ नका, ते पाहू नका
असं तसं बोलू नका
स्वातंत्र्यावर घाला घालतात?
ठेवलेत कानावर हात.
भरत पहिली छान जमतेय.. चौथी ओळ
भरत पहिली छान जमतेय.. चौथी ओळ जमव ना..
ऐकून दंगा विटले कान नको पाहणे
ऐकून दंगा विटले कान
नको पाहणे गेले त्राण
गप्पच बसले गिळुनी शब्द
तीन माकडे कित्ती छान
काssहीssच्याss काssहीsss
बगिच्यातली सुंदर
बगिच्यातली सुंदर मुर्ती
सभोवती युगुलांची चलती
प्रणयक्रिडेला उधाण-भरती
श्रवण, दृष्टी अन वाचा बसली..!!
न राहवून भरतच्या चारोळीची
न राहवून भरतच्या चारोळीची चौथी ओळ मीच लिहितोय...सॉरी भरत..!
ऐकून कर न ऐकल्यासारखे,
पाहून कर न पाहिल्यासारखे,
पण न बोलून कर बोलल्यासारखे
राजकारणी तू यथार्थ शोभे..!
आहे आक्रोश जिथे तिथे, आम्ही
आहे आक्रोश जिथे तिथे, आम्ही नाही ऐकणार
भ्रष्टाचार, गुंडगिरी आहे कुठे? डोळे झाकून घेणार
कानी पडले, डोळ्यास दिसले तरी तोंड दाबून ठेवणार
खरंच, हेच अभिप्रेत होतं का महात्मा गांधींना!!!
गांधीजीनी, अन्याय डोळ्यांनी
गांधीजीनी, अन्याय डोळ्यांनी नुसता बघितला नाही
गोर गरिबांचा आकोश नुसता ऐकला नाही
गांधींनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला
गप्प नाही राहिले, बघे झाले नाहीत, कुणाचे ऐकून घेतले नाही!
गांधीजींची तीन माकडे आता जुनी
गांधीजींची तीन माकडे आता जुनी झाली आहेत
आता वेळ आहे आवाज उठवण्याची
डोळस होण्याची.. कान उघडे ठेवून ऐकण्याची
खूप झाल्या आहेत माकडचेष्टा!!!!
जरी आम्ही ठेवतो, कानावर,
जरी आम्ही ठेवतो,
कानावर, डोळ्यावर, तोंडावर हात
तरी आम्ही शेअर करतो
समोरची घटना एकमेकांत.
काहीच्या काही लिहिलंय. सुचत नाहीये.
चंबू , मला पहिल्या चारोळीत जे
चंबू , मला पहिल्या चारोळीत जे म्हणायचंय तसंच काहीसं मनस्विता यांनी लिहिलंय.
बोलून न बोलल्यासारखं म्हणजे जिथे बोलून आपल्या अंगाशी काही येत नाही अशा ठिकाणी बोलून आपण आपली भडास तेवढी काढतो. ताजा अनुभव : सोसायटीची एजीएम आणि तिथे मूग गिळून बसणार्यांच्या नंतरच्या खासगी चर्चा. हाच प्रकार अगदी प्रत्येक बाबतीत होतो. जिथे बोलायचे तिथे आपण बोलत नाही.
ठेवलेत आता बंद, डोळे, तोंड
ठेवलेत आता बंद,
डोळे, तोंड आणि कान,
गोठल्या आता संवेदना,
आणि थिजले हे मन.
वर्षानुवर्षे शतकानुशतके सांगत
वर्षानुवर्षे शतकानुशतके
सांगत आले विद्वान
अरे,मनुजा आता तरी
खरेच पहा, बोल आणि ऐक देऊन कान